शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जागतिक मानसिक आरोग्य दिन : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे राखाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 08:47 IST

शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात.

मुंबई - शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तत्व जगातील सर्वच समाजांमध्ये व सर्व स्तरांत रुजण्याची आवश्यकता आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून समजला जातो. यंदा कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य अशी संकल्पना घेऊन या दिवशी विविध कार्यक्रमांचे आणि व्याख्यानांचे आयोजन जगभरात केले जात आहे. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशन या दिनाचे आयोजन आणि प्रत्येक वर्षाच्या संकल्पनेची निवड करत असते.कामाच्या ठिकाणी असणारे मानसिक आरोग्य व्यक्तींमधील परस्पर संबंध आणि कामाचा ताण यावर अवलंबून असते. यातील प्रत्येक बाबीचा आपल्या कामाच्या जागी वर्तनावर व कामावर परिणाम होत असतो. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशनने यंदा ही संकल्पना निवडण्यामागे हेच कारण आहे. या संकल्पनेद्वारे कामाच्या ठिकाणी येणारे तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न व प्रत्येक कर्मचा-यानं आपल्या प्रश्नांबाबत खुलेपणाने इतरांशी बोलणे अपेक्षित आहे. फेडरेशनच्या मते 10 कर्मचा-यांपैकी 6 कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीची माहिती इतरांपासून लपवत राहतात. सिल्व्हर रिबन या सिंगापूरमधील एनजीओच्या निरिक्षणांनुसार, कार्यालयातील 23.4 टक्के कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीबद्दल कधीही तोंड उघडत नाहीत कारण त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटत असते तर माझी स्थिती इतरांना समजणारच नाही असा ग्रह 12.8 टक्के लोक करुन घेतात आणि या कारणांमुळे ते कधीच आपल्या प्रश्नांबाबत, भीतीबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत बोलत नाहीत.

मेंटल हेल्थ फाऊंडेशन या संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 65 टक्के लोक कामाच्या ठिकाणी घाबरलेले असतात, आपल्या वरिष्ठांशी मानसिक आरोग्याबाबत बोलायला त्यांना भीती वाटत असते. तसेच एक तृतियांश लोकांना मानसिक प्रश्न त्रास देत असतात आणि त्याबाबत ते कधीही जवळच्या व्यक्तीशी किंवा आप्तेष्टांशी बोलत नाहीत असेही या संस्थेच्या निरीक्षणातून दिसून आले आहे. बहुतांश लोकांनी आपण मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला कामावर ठेवणे पसंत करणार नाही अशी माहिती निरिक्षणांत नोंदवली आहे. यामुळेच कामाच्या ठिकाणी खुलेपणा असणे, मानसिक प्रश्न किंवा काळजी या मुद्द्यांवर वरिष्ठांशी बोलणे, कार्यालय व कर्मचारी यांच्यामध्ये संवादाचा वेगळा दुवा स्थापन करणे असे उपाय कंपन्यांनी करावेत, असे उपाय तज्ज्ञ सुचवतात.

टॅग्स :Healthआरोग्य