शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका तर झाली पण आता त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय? 

By भाग्यश्री कांबळे | Updated: November 30, 2023 16:47 IST

मानसिक आरोग्यतज्ञांच्या मते, प्राथमिक उपचारानंतर कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं..

भाग्यश्री कांबळे

उत्तराखंडमधील उत्तरकाशीस्थित सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका झाली. तब्बल १६ दिवस ४१ कामगार त्या बोगद्यात अडकल्याची माहिती होती. १२ नोव्हेंबरपासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. शिवाय कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर कामगारांची सुटका झाली. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं रुग्णालय तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी अँब्युलन्सही होत्या. कारण मुख्य रुग्णालय हे ३० किमीच्या अंतरावर होते. पण या काळात कामगारांना जास्त दुखापत झाली नसली तरी, तज्ज्ञांच्या मते, शारीरिक यासह मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते. 

यासंदर्भात मानसा ग्लोबल फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थच्या संस्थापक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्वेता शर्मा सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे शारीरिक चेकअप व्हायलाच हवे. शिवाय मानसिक आरोग्यावरही लक्ष द्यायला हवे. कारण १६ दिवस बोगद्यात अडकल्याने त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमी झाली असेल. कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे काउंसलिंग करायला हवे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ठाऊक नाही, त्यांनी १६ दिवस बोगद्यात कसे काढलेत. त्यामुळे त्यांना फक्त प्रेरणा नसून, सोबत इच्छाशक्तीही वाढवण्याची गरज आहे.'

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ निमेश देसाई सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांना डिप्रेशन, स्ट्रेस, पॅनिक अटॅक, एंग्जायटी, निद्रानाश किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होण्याचा धोका वाढू शकतो. कारण १६ दिवस जगापासून वेगळं राहणं साहजिक त्यांच्यासाठी आवाहनात्मक ठरलं असेल. मुख्य म्हणजे बोगद्यातून बाहेर पडण्याविषयी त्यांच्या मनात भीती घोंघावत असणारच. शिवाय त्यांच्या मनात दरड कोसळणे, वारंवार वाईट स्वप्ने, बोगद्यात अडकण्याची चिंता, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना याचा त्रास झालाच असेल. त्यामुळे कामगारांनी मनमोकळेपणाने त्यांचे अनुभव शेअर करणं गरजेचं आहे.'

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडHealthआरोग्य