शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका तर झाली पण आता त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय? 

By भाग्यश्री कांबळे | Updated: November 30, 2023 16:47 IST

मानसिक आरोग्यतज्ञांच्या मते, प्राथमिक उपचारानंतर कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं..

भाग्यश्री कांबळे

उत्तराखंडमधील उत्तरकाशीस्थित सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका झाली. तब्बल १६ दिवस ४१ कामगार त्या बोगद्यात अडकल्याची माहिती होती. १२ नोव्हेंबरपासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. शिवाय कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर कामगारांची सुटका झाली. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं रुग्णालय तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी अँब्युलन्सही होत्या. कारण मुख्य रुग्णालय हे ३० किमीच्या अंतरावर होते. पण या काळात कामगारांना जास्त दुखापत झाली नसली तरी, तज्ज्ञांच्या मते, शारीरिक यासह मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते. 

यासंदर्भात मानसा ग्लोबल फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थच्या संस्थापक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्वेता शर्मा सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे शारीरिक चेकअप व्हायलाच हवे. शिवाय मानसिक आरोग्यावरही लक्ष द्यायला हवे. कारण १६ दिवस बोगद्यात अडकल्याने त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमी झाली असेल. कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे काउंसलिंग करायला हवे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ठाऊक नाही, त्यांनी १६ दिवस बोगद्यात कसे काढलेत. त्यामुळे त्यांना फक्त प्रेरणा नसून, सोबत इच्छाशक्तीही वाढवण्याची गरज आहे.'

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ निमेश देसाई सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांना डिप्रेशन, स्ट्रेस, पॅनिक अटॅक, एंग्जायटी, निद्रानाश किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होण्याचा धोका वाढू शकतो. कारण १६ दिवस जगापासून वेगळं राहणं साहजिक त्यांच्यासाठी आवाहनात्मक ठरलं असेल. मुख्य म्हणजे बोगद्यातून बाहेर पडण्याविषयी त्यांच्या मनात भीती घोंघावत असणारच. शिवाय त्यांच्या मनात दरड कोसळणे, वारंवार वाईट स्वप्ने, बोगद्यात अडकण्याची चिंता, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना याचा त्रास झालाच असेल. त्यामुळे कामगारांनी मनमोकळेपणाने त्यांचे अनुभव शेअर करणं गरजेचं आहे.'

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडHealthआरोग्य