शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 11:31 IST

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिणं, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही.

महिलांनी कितीही फिट राहायचा विचार केला तरी वयोमानानुसार  हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्समुळे होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. पण वेळेवर लक्ष दिल्यास या समस्येपासून वाचता येऊ शकतं.  अनियमीत जीवनशैली, खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणं, झोपेची कमतरता यांमुळे महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिण, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्मोन्सचे बदल लवकर होत असतात. मेनोपॉज सुद्धा अशीच स्थिती असते. जेव्हा महिलांचं शरीर एका वेगळ्या बदलांमधून जात असतं. महिलांच्या आयुष्यात मेनोपॉज हा असा कालावधी असतो. ज्यावेळी मासिक पाळी येणं पूर्णपणे बंद होतं. ४५ ते ५५ या वयोगटात हा बदल  होतो.

ही प्रकीया प्रत्येक महिलेल्या शरीरात वेगवेगळ्या टाईम ड्यूरेशननुसार होत असते. महिलांच्या शरीरातील मेनोपॉजची प्रक्रिया २ वर्षात पूर्ण होते. काही महिलांना १० वर्षांचा कालावधी सुद्धा लागू शकतो. मेनोपॉज सुरू झाल्यानंतर कधी पिरियड्स येतात तर कधी येत  नाहीत. काहीवेळा ब्लिडींग जास्त होतं. तर काहीवेळा खूप कमी होतं. या दरम्यान मूड स्विंग्स बदलणं, थकवा येणं, राग येणं, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. 

मेनोपॉजच्या दरम्यान वजन वाढणं तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक असू शकतं. त्यामुळे शरीरातील मध्यभाग म्हणजेच पोट, कंबर, मांड्याचा भाग वाढत जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यात रक्तवाहिन्याचे आजार, टाईप २ डायबिटीस आणि श्वासांसंबंधी आजारांचा समावेश असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा सुद्धा यात समावेश आहे.

मेनोपॉजच्यावेळी महिलांच्या पोटाची, मागच्या भागाची, मांड्याची चरबी वाढत जाते. हार्मोनल बदलांमुळे हा बदल होतो. वाढतं वय आणि महिलांची जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरते. वाढत्या वयात शरीरातील फॅट मसल्समध्ये सुद्धा जातं. त्यामुळे मसल्सचा टाईटनेस कमी होतो.

उपाय

मेनोपॉजमध्ये वाढत्या वयाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही करावं लागणार नाही. फक्त रोज व्यायाम करावा लागेल. योगा किंवा डान्स केला तरी चालू शकेल.

महिलांना वयात ३० ते ४० वर्षात जितक्या कॅलरीजची आवश्यकता असते.  त्यापेक्षा कमी कॅलरीज ५० वयात आवश्यक असतात. त्यासाठी जंक फूड, बाहेरचं खाणं, कोल्ड्रींग्स, गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायला हवं.

या कालावधीत महिलांना खूप एकटेपणा आणि हेल्पलेस वाटत असतं. त्यामुळे ताण-तणाव येतो. ही समस्या टाळण्यासाठी नातेवाईकांना, कुटुंबियांना वेळ द्या. मित्र मैत्रिणींशी गप्पा मारून ताण-तणाव घालवण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्स