शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 11:31 IST

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिणं, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही.

महिलांनी कितीही फिट राहायचा विचार केला तरी वयोमानानुसार  हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्समुळे होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. पण वेळेवर लक्ष दिल्यास या समस्येपासून वाचता येऊ शकतं.  अनियमीत जीवनशैली, खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणं, झोपेची कमतरता यांमुळे महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिण, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्मोन्सचे बदल लवकर होत असतात. मेनोपॉज सुद्धा अशीच स्थिती असते. जेव्हा महिलांचं शरीर एका वेगळ्या बदलांमधून जात असतं. महिलांच्या आयुष्यात मेनोपॉज हा असा कालावधी असतो. ज्यावेळी मासिक पाळी येणं पूर्णपणे बंद होतं. ४५ ते ५५ या वयोगटात हा बदल  होतो.

ही प्रकीया प्रत्येक महिलेल्या शरीरात वेगवेगळ्या टाईम ड्यूरेशननुसार होत असते. महिलांच्या शरीरातील मेनोपॉजची प्रक्रिया २ वर्षात पूर्ण होते. काही महिलांना १० वर्षांचा कालावधी सुद्धा लागू शकतो. मेनोपॉज सुरू झाल्यानंतर कधी पिरियड्स येतात तर कधी येत  नाहीत. काहीवेळा ब्लिडींग जास्त होतं. तर काहीवेळा खूप कमी होतं. या दरम्यान मूड स्विंग्स बदलणं, थकवा येणं, राग येणं, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. 

मेनोपॉजच्या दरम्यान वजन वाढणं तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक असू शकतं. त्यामुळे शरीरातील मध्यभाग म्हणजेच पोट, कंबर, मांड्याचा भाग वाढत जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यात रक्तवाहिन्याचे आजार, टाईप २ डायबिटीस आणि श्वासांसंबंधी आजारांचा समावेश असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा सुद्धा यात समावेश आहे.

मेनोपॉजच्यावेळी महिलांच्या पोटाची, मागच्या भागाची, मांड्याची चरबी वाढत जाते. हार्मोनल बदलांमुळे हा बदल होतो. वाढतं वय आणि महिलांची जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरते. वाढत्या वयात शरीरातील फॅट मसल्समध्ये सुद्धा जातं. त्यामुळे मसल्सचा टाईटनेस कमी होतो.

उपाय

मेनोपॉजमध्ये वाढत्या वयाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही करावं लागणार नाही. फक्त रोज व्यायाम करावा लागेल. योगा किंवा डान्स केला तरी चालू शकेल.

महिलांना वयात ३० ते ४० वर्षात जितक्या कॅलरीजची आवश्यकता असते.  त्यापेक्षा कमी कॅलरीज ५० वयात आवश्यक असतात. त्यासाठी जंक फूड, बाहेरचं खाणं, कोल्ड्रींग्स, गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायला हवं.

या कालावधीत महिलांना खूप एकटेपणा आणि हेल्पलेस वाटत असतं. त्यामुळे ताण-तणाव येतो. ही समस्या टाळण्यासाठी नातेवाईकांना, कुटुंबियांना वेळ द्या. मित्र मैत्रिणींशी गप्पा मारून ताण-तणाव घालवण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्स