शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

...म्हणून केळीच्या पानांवर जेवण करणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:04 IST

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे.

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेषकरून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केळीच्या पानांवर जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर समजलं जातं. या पानांचा उपयोग फक्त जेवण्यासाठीच नाही तर जेवण शिजवण्यासाठीही करण्यात येतो. या पानांना सर्वाधिक हायजेनिक आणि आरोग्यदायी मानण्यात येतं. या पानांवर एकाच वेळी सर्व पदार्थ ठेवता येतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? याच पानांचा जेवण वाढण्यासाठी उपयोग का करण्यात येतो? 

केळीच्या पानांवर जेवण्याचे फायदे :

अ‍ॅन्टीऑक्सिडंट 

केळीच्या पानांमध्ये प्राकृतिक अ‍ॅन्टीऑक्सिडंट म्हणजेच पॉलीपेनॉल्स आढळून येतात. हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स अनेक वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये आढळून येतात. जर तुम्ही केळीच्या पानांवर जेवण वाढत असाल तर ते पदार्थ केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट त्या पदार्थांमध्ये शोषले जातात. जे आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. 

जेवणाची चव वाढवतात

केळीच्या पानांवर एक प्रकारची वॅक्स कोटींग असते. ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते. यांवर गरम पदार्थ वाढल्याने पानांवर असलेलं वॅक्स कोटींग विरघळून जातं आणि पदार्थांची चव वाढवतात. 

हायजेनिक

केळीच्या पानांना स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज नसते. ही फक्त पाण्याने स्वच्छ धुतल्यास लगेच स्वच्छ होतात. सामान्य भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे त्यांच्यामध्ये काही जंतू राहण्याची शक्यता असते. परंतु केळीच्या पानांवर जेवल्याने तुम्हाला फायदाच होतो. 

केमिक्सपासून सुटका

तुम्ही डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ करा किंवा स्वतःच्या हाताने साबणाच्या मदतीने भांडी स्वच्छ करा. या केमिकल्सचे ट्रेसेस तुमच्या भांड्यांवरही तसेच राहतात. केळीच्या पानांवर कोणतेही केमिकल्स नसतात आणि आरोग्यासाठीही घातक नसतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स