शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...म्हणून केळीच्या पानांवर जेवण करणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:04 IST

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे.

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेषकरून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केळीच्या पानांवर जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर समजलं जातं. या पानांचा उपयोग फक्त जेवण्यासाठीच नाही तर जेवण शिजवण्यासाठीही करण्यात येतो. या पानांना सर्वाधिक हायजेनिक आणि आरोग्यदायी मानण्यात येतं. या पानांवर एकाच वेळी सर्व पदार्थ ठेवता येतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? याच पानांचा जेवण वाढण्यासाठी उपयोग का करण्यात येतो? 

केळीच्या पानांवर जेवण्याचे फायदे :

अ‍ॅन्टीऑक्सिडंट 

केळीच्या पानांमध्ये प्राकृतिक अ‍ॅन्टीऑक्सिडंट म्हणजेच पॉलीपेनॉल्स आढळून येतात. हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स अनेक वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये आढळून येतात. जर तुम्ही केळीच्या पानांवर जेवण वाढत असाल तर ते पदार्थ केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट त्या पदार्थांमध्ये शोषले जातात. जे आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. 

जेवणाची चव वाढवतात

केळीच्या पानांवर एक प्रकारची वॅक्स कोटींग असते. ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते. यांवर गरम पदार्थ वाढल्याने पानांवर असलेलं वॅक्स कोटींग विरघळून जातं आणि पदार्थांची चव वाढवतात. 

हायजेनिक

केळीच्या पानांना स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज नसते. ही फक्त पाण्याने स्वच्छ धुतल्यास लगेच स्वच्छ होतात. सामान्य भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे त्यांच्यामध्ये काही जंतू राहण्याची शक्यता असते. परंतु केळीच्या पानांवर जेवल्याने तुम्हाला फायदाच होतो. 

केमिक्सपासून सुटका

तुम्ही डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ करा किंवा स्वतःच्या हाताने साबणाच्या मदतीने भांडी स्वच्छ करा. या केमिकल्सचे ट्रेसेस तुमच्या भांड्यांवरही तसेच राहतात. केळीच्या पानांवर कोणतेही केमिकल्स नसतात आणि आरोग्यासाठीही घातक नसतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स