शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 10:32 IST

अनेकांना जेवण केल्यानंतरही काही वेळातच भूक लागते. याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. पण यामागे काहीतरी कारण असू शकतं.

अनेकांना जेवण केल्यानंतरही काही वेळातच भूक लागते. याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. पण यामागे काहीतरी कारण असू शकतं. पण असं नेहमीच होत असेल तर याचं कारण जाणून घेणे आणि ज्या चुका तुम्ही करत आहात त्या न करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. 

नाश्ता कमी करणे

जर तुम्ही नाश्ता हलक्या पदार्थांचा केला असेल तर भूक लागणारच. सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा मानला जोता. त्यामुळे नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नाश्त्यात पौष्टीक आहार घेतला तर दिवसभर तुम्हाला थोडं थोडं खाण्याची इच्छा होणार नाही. सोबतच याने तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जीही मिळेल. पण जर नाश्ता हलका आणि कमी केला असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागेल.  

घाई घाईत खाणे

काहीही खात असताना जर ते योग्यप्रकारे खाल्लं नाही तर जेवण केल्यावर तुम्हाला पुन्हा भूक लागणार. जेवण करताना जर तुम्ही घाई घाईने खात असाल तर पुन्हा भूक लागण्याचं हे प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे काहीही खाताना ते हळूहळू आणि चाऊन चाऊन खावं. याने तुम्ही खाल्लेले पदार्थांची पचनक्रिया चांगली होते. त्यासोबतच त्यांच्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला ऊर्जाही मिळेल. 

प्रोटीन आणि फायबरची कमतरता

आपल्या शरीरासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या पदार्थांमधून योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर घेत नसाल तर तुम्हाला सतत भूक लागण्याची समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही प्रोटीन आणि फायबर हे तत्व असलेले पदार्थ सेवन करता तेव्हा तुमच्या पोटातून असे हार्मोन्स निघतात जे तुमची भूक शांत करतात. 

जास्त चहा पिणे

जर तुम्हाला पुन्हा पुन्हा चहा पिण्याची सवय असेल तर सतत भूक लागण्याची शक्यता अधिक असते. जास्त चहा प्यायल्याने भूक मरते पण तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. चहामध्ये असलेलं निकोटीन व्यक्तीची भूक वेगळ्या प्रकारे वाढवतं. अशांना मसालेदार खाण्याची जास्त आवड होते. 

सॉफ्ट ड्रिंक आणि सोडा

अधिक कोल्ड ड्रिंक आणि सोडा पिणाऱ्यांची पचनक्रिया प्रभावित होत असते. हे पेय सतत पिणाऱ्यांना सतत भूक लागू शकते. अनेक अभ्यासातही हे समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने भूक जास्त लागते. कारण यात हाय-फ्रक्टोज कॉर्न सीरपचं प्रमाण अधिक असतं. याने रक्तप्रवाह आणि शारीरिक हालचाली वाढतात तसेच भूकही लागते. 

कमी पाणी पिणे

योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. हा भूक शांत करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेकदा योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होतं. अशात भूक लागते. पण मुळात तुम्हाला भूक लागलेली नसते. पाणी कमी प्यायल्याने असं वाटत असतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न