शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 10:32 IST

अनेकांना जेवण केल्यानंतरही काही वेळातच भूक लागते. याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. पण यामागे काहीतरी कारण असू शकतं.

अनेकांना जेवण केल्यानंतरही काही वेळातच भूक लागते. याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. पण यामागे काहीतरी कारण असू शकतं. पण असं नेहमीच होत असेल तर याचं कारण जाणून घेणे आणि ज्या चुका तुम्ही करत आहात त्या न करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. 

नाश्ता कमी करणे

जर तुम्ही नाश्ता हलक्या पदार्थांचा केला असेल तर भूक लागणारच. सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा मानला जोता. त्यामुळे नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नाश्त्यात पौष्टीक आहार घेतला तर दिवसभर तुम्हाला थोडं थोडं खाण्याची इच्छा होणार नाही. सोबतच याने तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जीही मिळेल. पण जर नाश्ता हलका आणि कमी केला असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागेल.  

घाई घाईत खाणे

काहीही खात असताना जर ते योग्यप्रकारे खाल्लं नाही तर जेवण केल्यावर तुम्हाला पुन्हा भूक लागणार. जेवण करताना जर तुम्ही घाई घाईने खात असाल तर पुन्हा भूक लागण्याचं हे प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे काहीही खाताना ते हळूहळू आणि चाऊन चाऊन खावं. याने तुम्ही खाल्लेले पदार्थांची पचनक्रिया चांगली होते. त्यासोबतच त्यांच्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला ऊर्जाही मिळेल. 

प्रोटीन आणि फायबरची कमतरता

आपल्या शरीरासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या पदार्थांमधून योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर घेत नसाल तर तुम्हाला सतत भूक लागण्याची समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही प्रोटीन आणि फायबर हे तत्व असलेले पदार्थ सेवन करता तेव्हा तुमच्या पोटातून असे हार्मोन्स निघतात जे तुमची भूक शांत करतात. 

जास्त चहा पिणे

जर तुम्हाला पुन्हा पुन्हा चहा पिण्याची सवय असेल तर सतत भूक लागण्याची शक्यता अधिक असते. जास्त चहा प्यायल्याने भूक मरते पण तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. चहामध्ये असलेलं निकोटीन व्यक्तीची भूक वेगळ्या प्रकारे वाढवतं. अशांना मसालेदार खाण्याची जास्त आवड होते. 

सॉफ्ट ड्रिंक आणि सोडा

अधिक कोल्ड ड्रिंक आणि सोडा पिणाऱ्यांची पचनक्रिया प्रभावित होत असते. हे पेय सतत पिणाऱ्यांना सतत भूक लागू शकते. अनेक अभ्यासातही हे समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने भूक जास्त लागते. कारण यात हाय-फ्रक्टोज कॉर्न सीरपचं प्रमाण अधिक असतं. याने रक्तप्रवाह आणि शारीरिक हालचाली वाढतात तसेच भूकही लागते. 

कमी पाणी पिणे

योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. हा भूक शांत करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेकदा योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होतं. अशात भूक लागते. पण मुळात तुम्हाला भूक लागलेली नसते. पाणी कमी प्यायल्याने असं वाटत असतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न