शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आपला मेंदू ‘विसरून जातो’, तो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:03 IST

Brain: पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो.

- डॉ. श्रुती पानसे(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)‘तू याच रस्त्याने आलास ना तेव्हा तुला इकडून जाणारी एक रिक्षा दिसली का?’ ‘रिक्षा? मला बऱ्याच गाड्या दिसल्या.. त्यात रिक्षा होती का.. आठवत नाही नक्की..’ असं आपण म्हणू. आणि खरंच त्या गाड्यांमध्ये रिक्षा होती की नाही, हे आपल्याला आठवणारही नाही.

मात्र हेही तितकंच खरं आणि योग्य आहे की पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो. त्यामुळे एक काय, अगदी चार-पाच रिक्षा त्या रस्त्यावरून गेलेल्या असल्या तरी आपल्याला एकही आठवणार नाही. याचं कारण मेंदूला ते त्याक्षणी महत्त्वाचं वाटलेलं नाही.

एखाद्या दुकानात आपण गेलेलो असताना आपल्या शेजारी कोण उभं होतं, हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याची तितकीशी गरज नाही. सिनेमात तीन तास शेजारी बसलेल्या माणसाला मध्यंतरात बघितलं तरी त्या एकाचाही चेहरा आठवणार नाही. मात्र एक आहे, दुकानात उभ्या असलेल्या त्या शेजाऱ्याने काही आवश्यक मदत केली असेल तर तो माणूस लक्षात राहतो. सिनेमात शेजारी बसलेल्या माणसाने कॉमेंट्स केल्या असतील तर तोही लक्षात राहू शकतो.

मानवी मनाची ही सहज प्रवृत्ती आहे, की आपल्याला जे महत्त्वाचं वाटत नाही तिथे आपण लक्ष देत नाही. समजा, आपण रोज ठरावीक रस्त्यावरून जातो, त्यातल्या कोणत्याही एका लहानशा रस्त्यावर नेमकी किती दुकानं आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. अनेक क्रिकेट मॅचेस आपण बघतो. काही अविस्मरणीय खेळ्याही बघितलेल्या असतात, पण त्या सगळ्या लक्षात राहत नाहीत.याचाच अर्थ जे बिनमहत्त्वाचं आहे, त्याक्षणी मेंदूला जे बिन महत्त्वाचं वाटतं त्याचं ओझं विनाकारण मेंदू स्वत:वर घेत नाही. हे खूपच चांगलं आहे.इथे एक मात्र लक्षात घ्यायला हवं की, त्याच रस्त्यावरच्या दुकानांमध्ये पेपर टाकणारे विक्रेते दुकानांची संख्या आणि क्रिकेट विश्लेषक अविस्मरणीय खेळ्या नक्कीच आणि नीट लक्षात ठेवतील; कारण तो त्यांच्या कामाचा आणि म्हणूनच महत्त्वाचा भाग आहे!( shruti.akrodcourses@gmail.com)

टॅग्स :Healthआरोग्यscienceविज्ञान