शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आपला मेंदू ‘विसरून जातो’, तो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:03 IST

Brain: पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो.

- डॉ. श्रुती पानसे(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)‘तू याच रस्त्याने आलास ना तेव्हा तुला इकडून जाणारी एक रिक्षा दिसली का?’ ‘रिक्षा? मला बऱ्याच गाड्या दिसल्या.. त्यात रिक्षा होती का.. आठवत नाही नक्की..’ असं आपण म्हणू. आणि खरंच त्या गाड्यांमध्ये रिक्षा होती की नाही, हे आपल्याला आठवणारही नाही.

मात्र हेही तितकंच खरं आणि योग्य आहे की पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो. त्यामुळे एक काय, अगदी चार-पाच रिक्षा त्या रस्त्यावरून गेलेल्या असल्या तरी आपल्याला एकही आठवणार नाही. याचं कारण मेंदूला ते त्याक्षणी महत्त्वाचं वाटलेलं नाही.

एखाद्या दुकानात आपण गेलेलो असताना आपल्या शेजारी कोण उभं होतं, हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याची तितकीशी गरज नाही. सिनेमात तीन तास शेजारी बसलेल्या माणसाला मध्यंतरात बघितलं तरी त्या एकाचाही चेहरा आठवणार नाही. मात्र एक आहे, दुकानात उभ्या असलेल्या त्या शेजाऱ्याने काही आवश्यक मदत केली असेल तर तो माणूस लक्षात राहतो. सिनेमात शेजारी बसलेल्या माणसाने कॉमेंट्स केल्या असतील तर तोही लक्षात राहू शकतो.

मानवी मनाची ही सहज प्रवृत्ती आहे, की आपल्याला जे महत्त्वाचं वाटत नाही तिथे आपण लक्ष देत नाही. समजा, आपण रोज ठरावीक रस्त्यावरून जातो, त्यातल्या कोणत्याही एका लहानशा रस्त्यावर नेमकी किती दुकानं आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. अनेक क्रिकेट मॅचेस आपण बघतो. काही अविस्मरणीय खेळ्याही बघितलेल्या असतात, पण त्या सगळ्या लक्षात राहत नाहीत.याचाच अर्थ जे बिनमहत्त्वाचं आहे, त्याक्षणी मेंदूला जे बिन महत्त्वाचं वाटतं त्याचं ओझं विनाकारण मेंदू स्वत:वर घेत नाही. हे खूपच चांगलं आहे.इथे एक मात्र लक्षात घ्यायला हवं की, त्याच रस्त्यावरच्या दुकानांमध्ये पेपर टाकणारे विक्रेते दुकानांची संख्या आणि क्रिकेट विश्लेषक अविस्मरणीय खेळ्या नक्कीच आणि नीट लक्षात ठेवतील; कारण तो त्यांच्या कामाचा आणि म्हणूनच महत्त्वाचा भाग आहे!( shruti.akrodcourses@gmail.com)

टॅग्स :Healthआरोग्यscienceविज्ञान