शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आपला मेंदू ‘विसरून जातो’, तो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:03 IST

Brain: पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो.

- डॉ. श्रुती पानसे(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)‘तू याच रस्त्याने आलास ना तेव्हा तुला इकडून जाणारी एक रिक्षा दिसली का?’ ‘रिक्षा? मला बऱ्याच गाड्या दिसल्या.. त्यात रिक्षा होती का.. आठवत नाही नक्की..’ असं आपण म्हणू. आणि खरंच त्या गाड्यांमध्ये रिक्षा होती की नाही, हे आपल्याला आठवणारही नाही.

मात्र हेही तितकंच खरं आणि योग्य आहे की पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो. त्यामुळे एक काय, अगदी चार-पाच रिक्षा त्या रस्त्यावरून गेलेल्या असल्या तरी आपल्याला एकही आठवणार नाही. याचं कारण मेंदूला ते त्याक्षणी महत्त्वाचं वाटलेलं नाही.

एखाद्या दुकानात आपण गेलेलो असताना आपल्या शेजारी कोण उभं होतं, हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याची तितकीशी गरज नाही. सिनेमात तीन तास शेजारी बसलेल्या माणसाला मध्यंतरात बघितलं तरी त्या एकाचाही चेहरा आठवणार नाही. मात्र एक आहे, दुकानात उभ्या असलेल्या त्या शेजाऱ्याने काही आवश्यक मदत केली असेल तर तो माणूस लक्षात राहतो. सिनेमात शेजारी बसलेल्या माणसाने कॉमेंट्स केल्या असतील तर तोही लक्षात राहू शकतो.

मानवी मनाची ही सहज प्रवृत्ती आहे, की आपल्याला जे महत्त्वाचं वाटत नाही तिथे आपण लक्ष देत नाही. समजा, आपण रोज ठरावीक रस्त्यावरून जातो, त्यातल्या कोणत्याही एका लहानशा रस्त्यावर नेमकी किती दुकानं आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. अनेक क्रिकेट मॅचेस आपण बघतो. काही अविस्मरणीय खेळ्याही बघितलेल्या असतात, पण त्या सगळ्या लक्षात राहत नाहीत.याचाच अर्थ जे बिनमहत्त्वाचं आहे, त्याक्षणी मेंदूला जे बिन महत्त्वाचं वाटतं त्याचं ओझं विनाकारण मेंदू स्वत:वर घेत नाही. हे खूपच चांगलं आहे.इथे एक मात्र लक्षात घ्यायला हवं की, त्याच रस्त्यावरच्या दुकानांमध्ये पेपर टाकणारे विक्रेते दुकानांची संख्या आणि क्रिकेट विश्लेषक अविस्मरणीय खेळ्या नक्कीच आणि नीट लक्षात ठेवतील; कारण तो त्यांच्या कामाचा आणि म्हणूनच महत्त्वाचा भाग आहे!( shruti.akrodcourses@gmail.com)

टॅग्स :Healthआरोग्यscienceविज्ञान