शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला स्वप्न का आणि कशी पडतात? जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:54 IST

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का?

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का? असेल तर आपल्याला ही स्वप्न का आठवत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊया की आपल्याला स्वप्न का पडतात आणि आपण ती का विसरतो.

आपल्याला स्वप्न का पडतात?आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये एक रॅपिड आय मूव्हमेंट नावाचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. याच कालावधीत स्वप्न पडतात. स्वप्नांच्या संबंधात अनेक शास्त्रीय संशोधन झालेली आहेत.एका थियरीनुसार झोपेत असताना देखील आपला मेंदु सक्रिय असतो. मात्र त्यावेळी त्यातील लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.

स्वप्नांना लक्षात कसं ठेवता येतं?जेव्हा आपण स्वप्न बघत असतो त्यावेळी लक्षात ठेवणारं ब्रेन केमिकल नॉरपेनेफ्रिन आणि ब्रेन इलेक्ट्रिक अॅक्टीव्हीटी सर्वात कमी सक्रिय असतात. त्यामुळे स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. जे स्वप्न बघून आपण त्वरित झोपेतून उठतो ती स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते.स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला रात्री पडणारं स्वप्न लक्षात ठेवायचं आहे. जर झोपण्यापूर्वी तुमचा असा विचार असेल तर सकाळी उठल्यावर स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बेडवरून न उठता स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला तुमचे स्वप्न आठवेल.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य