शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:04 IST

उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. 

- डॉ. नितीन पाटणकर; जीवनशैली आरोग्यतज्ज्ञ

पं तप्रधान नरेंद्र मोदी एका नवरात्री दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. ते नवरात्रीत कडक उपास करतात. फक्त पाणी आणि लिंबूपाणी, ते पण मर्यादित वेळा. त्या दौऱ्यात अनेक सभा, जागतिक नेत्यांसोबत भेटी आणि इतर कामांचा प्रचंड ताण असतानादेखील पंतप्रधानांनी आपला उपवास चालू ठेवला होता. ते बघून अनेकांनी नवरात्रीत उपवास सुरू केले. पंतप्रधानांचे उपवास माहीत नसतानादेखील भारतात अनेक लोक नवरात्रात उपवास करीतच होते. त्यांच्या उपवासाच्या बातमीनंतर हे एक फॅड बनले. 

इतर उपवासांप्रमाणे विशिष्ट गोष्टी खाऊन उपवास करणे हे सर्वात सोपे आहे. थोडा जास्त कठीण उपवास म्हणजे फक्त फळांवर राहणे. फक्त लिंबूपाणी किंवा फक्त पाणी पिऊन राहणे हा सर्वात कठीण उपवास. सर्वात कठीण उपवास कुणी करू नये?गरोदर स्त्रिया, स्तनपान चालू असेल तर, बारा वर्षांखालील मुलं, सत्तरीच्यावरील व्यक्ती, मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीचे आजार असलेल्या व्यक्ती, आजारी व्यक्ती, नुकत्याच आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, भरपूर व्यायाम करणाऱ्या किंवा कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, वरचेवर प्रवास करावा लागत असेल तर तसेच खाण्यासोबत ज्यांना औषधे घ्यायची असतात अशा व्यक्ती. 

दुर्गामातेबद्दल श्रद्धा आणि परंपरा यांच्या मिश्रणातून नवरात्रीत उपास केले जातात. कुणी ‘उपवास तब्येतीकरता चांगले’ म्हणून करतात. तब्येतीसाठी उपवास करायचे असतील तर दर आठवड्याला उपवास करणे जास्त चांगले. ती तयारी काही वर्ष केली तर मग सुरुवातीस दोन दिवस मग तीन, असे करीत १० वर्षांनंतर सलग नऊ दिवस उपवास केला तरच उपवासाचे फायदे मिळू शकतात. एरवी तीन  दिवसांपेक्षा जास्त दिवस कडकडीत उपवास केला तर नंतरच्या दिवसात वजन वाढवण्याकडे शरीराचा कल असतो.

शास्त्र काय सांगते?  व्यायाम, उपवास किंवा कुठलेही बदल यांची सुरुवात नेहमी छोट्या प्रमाणात करावी, त्यात हळूहळू वाढ करावी, असे शास्त्र सांगते. सवय नसताना अचानक काही करण्याने अपाय होण्याचीच शक्यता जास्त. अगदी छोटी सुरुवात, हळूहळू वाढ करताना जर काही त्रास जाणवला तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हरकत नाही.       कुणी सांगेल की, सुरुवातीस त्रास होतो मग सवय होते. यात खोटे काही नाही पण सारासार विवेक बुद्धी वापरून ‘स्वत:साठी कसा उपवास करावा किंवा करावा की न करावा’ हे प्रत्येकाने ठरवायला हवे. एकाला जमले म्हणजे सगळ्यांना जमेल असे नाही.

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री