शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर 'असा' निष्काळजीपणा करत असाल; तर वेळीच सावध व्हा

By manali.bagul | Updated: December 14, 2020 12:54 IST

Women Care Tips in Marathi : मासिक पाळीच्या दिवसात अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

(Image Credit- chapelhillobgyn)

साधारणपणे महिला  हिवाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करतात. महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवसात गरम पाण्यानेच अंघोळ करायला हवी. जेणेकरून तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना जाणवणार नाहीत. घरोघरच्या महिलांना सकाळच्यावेळी कामाची घाई असते. अशा स्थितीत अनेकदा थंड पाण्याने अंघोळ केली जाते. असं करण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  मासिक पाळीच्या दिवसात  अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर  हात स्वच्छ धुवून घ्या

अंघोळ करताना पॅड बदलण्याच्या आधी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ करून घ्या. असं केल्याने नुकसानकारक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो. मासिक पाळीच्यावेळी अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करा. पाणी कोमट असावे जास्त गरम असून नये जेणेकरून त्वचेला नुकसान पोहोचून त्वचा जळणार नाही. गरम पाण्याने वेदनेपासून आराम मिळतो. गरम पाण्याने मसल्सची लवचीकता वाढते. अंघोळ करताना गरम पाण्यात सेंधा मीठ घाला.

चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

मीठ वेदना निवारक असते तसंच त्वचेतील रोम छिद्रांमधील घाण साफ होते. वेदनादेखील कमी होतात. पीरियड्स दरम्यान आंघोळ केल्यावर शरीरात मोहरीचे तेल किंवा नारळ तेल लावा. हे आपल्या शरीरावर एक नैसर्गिक थर निर्माण करेल, तसेच शरीरास त्वरीत गरम करेल. तेल जास्त प्रमाणात लावू नका. नाहीतर कपडे तेलकट, खराब होऊ शकतात.

अंघोळ झाल्यावर गरम पाणी किंवा ग्रीन टी घ्या. असे केल्याने शरीर उबदार राहण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होईल. यावेळी दूधातून बनविलेले चहा पिणे टाळावे. आपण इच्छित असल्यास, आपण ब्लॅक टी पिऊ शकता. सकाळी या सर्वांबरोबर एक किंवा दोन बिस्किटे किंवा टोस्ट खा.

स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन वापरा

तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल ते धुवून उन्हात वाळवणार असाल तर कापड वापरायला काहीच हरकत नाही. फक्त काळजी एवढीच घ्यायला हवी की, अनेकजणी कुणाला दिसु नये म्हणून अंधारात, कपडय़ांच्या खाली हे कापड वाळत घालतात ते नीट वाळत नाही, निजर्तुक होत नाही. कडक होतं ते कापड वापरून त्वचेला इजा होते. चालता येत नाही. त्याअवस्थेत मुली काम करतात. त्यातून वेदना होतात. इन्फेक्शन्स वाढतात.

CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....

त्यामुळे कापड जर वापरणारच असाल तर स्वच्छ उन्हात वाळवलेलंच कापड वापरा. खेडय़ातच नाही तर शहरातही नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे. याविषयातले जाणकारही आता सांगू लागले आहेत की पुर्वीचा कापडाचा पर्याय अधिक सोयीस्कर होता. मोठय़ा शहरात नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचे प्रश्न गंभीर होत आहेत. असे असताना जर तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल, तर ते  कापड वापरण्यात चूक काही नाही. स्वच्छता हा मुद्दा आहे, फॅशन हा नाही.

एकच नॅपकिन किती काळ वापरायचा.? दिवसाला किमान किती नॅपकिन वापरायचे.?

नॅपकिन वापरण्याचा उद्देशच मुळात स्वच्छता पाळणे हा आहे. त्यामुळे दिवसाला किमान 3 नॅपकिन्स याप्रमाणे दर आठ तासानंतर एक नॅपकिन बदलायलाच हवा. ज्या मुलींना रक्तस्त्राव कमी होतो त्या एकच नॅपकिन दीर्घकाळ होतात. जे रक्त नॅपकिनमध्ये साठवलं जात त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. गर्भाशय आणि योनीमार्गाची त्वचा नाजुक असते त्यातुन जंतुसंसर्ग होऊ शकतो. लैंगिक संबंधातून झालेले संसर्ग त्यामुळे वाढू शकतात. म्हणून नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायलाच हवी. नॅपकिन वापरतोय ते फारस खराब नाही असे समजुन अनेक मुली तेच ते नॅपकिन वापरतात ते कपडा वापरण्याहूनही अधिक धोकादायक आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य