शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर 'असा' निष्काळजीपणा करत असाल; तर वेळीच सावध व्हा

By manali.bagul | Updated: December 14, 2020 12:54 IST

Women Care Tips in Marathi : मासिक पाळीच्या दिवसात अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

(Image Credit- chapelhillobgyn)

साधारणपणे महिला  हिवाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करतात. महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवसात गरम पाण्यानेच अंघोळ करायला हवी. जेणेकरून तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना जाणवणार नाहीत. घरोघरच्या महिलांना सकाळच्यावेळी कामाची घाई असते. अशा स्थितीत अनेकदा थंड पाण्याने अंघोळ केली जाते. असं करण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  मासिक पाळीच्या दिवसात  अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. 

सॅनिटरी नॅपकिन बदलण्याआधी, नंतर  हात स्वच्छ धुवून घ्या

अंघोळ करताना पॅड बदलण्याच्या आधी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ करून घ्या. असं केल्याने नुकसानकारक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो. मासिक पाळीच्यावेळी अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करा. पाणी कोमट असावे जास्त गरम असून नये जेणेकरून त्वचेला नुकसान पोहोचून त्वचा जळणार नाही. गरम पाण्याने वेदनेपासून आराम मिळतो. गरम पाण्याने मसल्सची लवचीकता वाढते. अंघोळ करताना गरम पाण्यात सेंधा मीठ घाला.

चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

मीठ वेदना निवारक असते तसंच त्वचेतील रोम छिद्रांमधील घाण साफ होते. वेदनादेखील कमी होतात. पीरियड्स दरम्यान आंघोळ केल्यावर शरीरात मोहरीचे तेल किंवा नारळ तेल लावा. हे आपल्या शरीरावर एक नैसर्गिक थर निर्माण करेल, तसेच शरीरास त्वरीत गरम करेल. तेल जास्त प्रमाणात लावू नका. नाहीतर कपडे तेलकट, खराब होऊ शकतात.

अंघोळ झाल्यावर गरम पाणी किंवा ग्रीन टी घ्या. असे केल्याने शरीर उबदार राहण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होईल. यावेळी दूधातून बनविलेले चहा पिणे टाळावे. आपण इच्छित असल्यास, आपण ब्लॅक टी पिऊ शकता. सकाळी या सर्वांबरोबर एक किंवा दोन बिस्किटे किंवा टोस्ट खा.

स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन वापरा

तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल ते धुवून उन्हात वाळवणार असाल तर कापड वापरायला काहीच हरकत नाही. फक्त काळजी एवढीच घ्यायला हवी की, अनेकजणी कुणाला दिसु नये म्हणून अंधारात, कपडय़ांच्या खाली हे कापड वाळत घालतात ते नीट वाळत नाही, निजर्तुक होत नाही. कडक होतं ते कापड वापरून त्वचेला इजा होते. चालता येत नाही. त्याअवस्थेत मुली काम करतात. त्यातून वेदना होतात. इन्फेक्शन्स वाढतात.

CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....

त्यामुळे कापड जर वापरणारच असाल तर स्वच्छ उन्हात वाळवलेलंच कापड वापरा. खेडय़ातच नाही तर शहरातही नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे. याविषयातले जाणकारही आता सांगू लागले आहेत की पुर्वीचा कापडाचा पर्याय अधिक सोयीस्कर होता. मोठय़ा शहरात नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचे प्रश्न गंभीर होत आहेत. असे असताना जर तुम्ही स्वच्छ कापड वापरणार असाल, तर ते  कापड वापरण्यात चूक काही नाही. स्वच्छता हा मुद्दा आहे, फॅशन हा नाही.

एकच नॅपकिन किती काळ वापरायचा.? दिवसाला किमान किती नॅपकिन वापरायचे.?

नॅपकिन वापरण्याचा उद्देशच मुळात स्वच्छता पाळणे हा आहे. त्यामुळे दिवसाला किमान 3 नॅपकिन्स याप्रमाणे दर आठ तासानंतर एक नॅपकिन बदलायलाच हवा. ज्या मुलींना रक्तस्त्राव कमी होतो त्या एकच नॅपकिन दीर्घकाळ होतात. जे रक्त नॅपकिनमध्ये साठवलं जात त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. गर्भाशय आणि योनीमार्गाची त्वचा नाजुक असते त्यातुन जंतुसंसर्ग होऊ शकतो. लैंगिक संबंधातून झालेले संसर्ग त्यामुळे वाढू शकतात. म्हणून नॅपकिन बदलण्याची दक्षता घ्यायलाच हवी. नॅपकिन वापरतोय ते फारस खराब नाही असे समजुन अनेक मुली तेच ते नॅपकिन वापरतात ते कपडा वापरण्याहूनही अधिक धोकादायक आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य