शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासात मळमळ किंवा उलटीसारखं वाटण्याची 'ही' कारणे तुम्हाला माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 11:43 IST

अनेकदा काही लोकांना प्रवास करताना मळमळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या होता. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आणि घाबरल्यासारखं होणे अशाही काही समस्या होतात.

(Image Credit : irishexaminer.com)

अनेकदा काही लोकांना प्रवास करताना मळमळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या होता. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आणि घाबरल्यासारखं होणे अशाही काही समस्या होतात. अनेकांना या समस्या होतात, पण याचं कारण त्यांना माहीत नसतं. याचं मुख्य कारण असू शकतं मेंदूपर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे. आज आम्ही तुम्हाला प्रवासात उलटी होणे, मळमळ होणे याची काही कारणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत.

मोशन सिकनेस

(Image Credit : drivespark.com)

मोशन सिकनेस त्या प्रक्रियेला म्हटलं जातं जेव्हा शरीराच्या क्रिया आणि मेंदूचा ताळमेळ बसत नाही. आपल्या शरीरातील सर्वच इंद्रिये मेंदूशी कनेक्ट असतात. या इंद्रियांच्या हालचालींवर मेंदू प्रतिक्रिया देतो. पण जेव्हा बस किंवा कारमध्ये प्रवास करताना आपले डोळे, नाक आणि कान एकत्र काम करतात. अशात अनेकदा मेंदू आणि इंद्रियांमध्ये ताळमेळ होऊ शकत नाही. ज्याचा उलटा प्रभाव आपल्या शरीरावर दिसू लागतो.

मानेची नस दबणे

(Image Credit : newsroom.unsw.edu.au)

जेव्हा आपण बस किंवा कारमध्ये प्रवास करतो तेव्हा सीट आरामदायक असेलच असं नसतं. आपली मान बराचवेळ एकाच स्थितीत असते. ज्यामुळे मानेची नस दबली जाते. मानेची नस ही थेट मेंदूशी जोडलेली असते, त्यामुळे ही नस दबल्याने मेंदू असहज होतो आणि यामुळे अस्वस्थता जाणवू लागते.

ऑक्सिजनची कमतरता

गाडीमध्ये सामान्यपणे खिडक्यांचे काच बंद असतात त्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. या कारणाने सुद्धा काही लोकांना उलटी होते. त्यासोबतच अनेकजण पूर्ण श्वास घेत नाहीत. जेव्हा ते मोकळ्या जागेत असतात, तेव्हा त्यांना अशी कोणतीही समस्या होत नाही. पण जसेही ते एखाद्या बंद ठिकाणावर जातात, तेव्हा त्यांना त्रास होतो.

पोटात रसायन तयार होणं

(Image Credit : home-remedies.wonderhowto.com)

जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा बसल्याने आपले गुडघे फोल्ड झालेले असतात आणि जेव्हा गाडीला पुन्हा पुन्हा ब्रेक मारला जातो, तेव्हा पोटावर दबाव पडतो. याने पोटात अ‍ॅसिड तयार होऊ लागतं. जास्त वेळ अशाच स्थितीत प्रवास केला तर आंबट ढेकर, पोटात दुखणे आणि मळमळ होणे अशा समस्या होऊ लागतात.

काय कराल उपाय?

1) बस किंवा कारमधील पेट्रोल-डिझेलच्या वासाची समस्या दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लिंबू. प्रवास करत असताना सोबत एक लिंबू ठेवा. किंवा लिंबाचा रस सोबत ठेवा. 

२) मळमळ होण्याची समस्या दूर कऱण्यासाठी आल्याचा तुकडा चघळा. ही क्रिया बसमध्ये बसण्याच्या १० मिनिटे आधी करा. प्रवासात पुन्हा त्रास होत असेल तर पुन्हा आल्याचा तुकडा चघळा. 

३) प्रवासा करण्याआधी फार जास्त तेलाचे किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच फार जास्तही काही खाऊ नका. असं केल्याने खाल्लेलं योग्यप्रकारे पचन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला मळमळ वाटू शकतं. त्यामुळे प्रवासाआधी हलकं जेवण करा. 

४) प्रवास करण्याआधी मोठा श्वास घ्या. याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. याने तुम्हाला अस्वस्थथा आणि मळमळ होणार नाही.

५) तसेच मळमळ किंवा उलटी येत असेल तर सोबत लवंग, वेलची ठेवा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सTravel Tipsट्रॅव्हल टिप्स