शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:14 IST

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याबरोबरच लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचा रस, ताक अशा गोष्टी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशातच लठ्ठपणा ही आजकाल समस्या बनली आहे. जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित चुकांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक लिंबू पाणी पितात. मात्र लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

एका ग्लास पाण्यात मध मिसळून लिंबाचा रस पिणं खूप फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असतं. हे फ्री रेडिकल्सपासून लढण्यासाठी मदत करतं. यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा. त्यात व्हिटॅमिन सी तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

लिंबू पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यादरम्यान लिंबू पाणी प्यायला हवं. या वेळेत लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पाणी प्यायल्याने शरीराचं अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं. यामुळेच नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तहान लागते. पुन्हा पुन्हा पाणी प्यावसं वाटतं.

सतत गरम होतं असल्याने, घाम येत असल्याने शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते काही आजारांचं कारण असू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तहान भागवण्यासाठी अनेक ग्लास पाणी पितात. थंड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक आणि सतत पाणी पिऊनही त्यांना घशाला कोरड पडल्याचं जाणवतं. या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाऊ नये, कारण ते धोकादायक असू शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य