शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:14 IST

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याबरोबरच लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचा रस, ताक अशा गोष्टी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशातच लठ्ठपणा ही आजकाल समस्या बनली आहे. जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित चुकांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक लिंबू पाणी पितात. मात्र लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

एका ग्लास पाण्यात मध मिसळून लिंबाचा रस पिणं खूप फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असतं. हे फ्री रेडिकल्सपासून लढण्यासाठी मदत करतं. यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा. त्यात व्हिटॅमिन सी तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

लिंबू पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यादरम्यान लिंबू पाणी प्यायला हवं. या वेळेत लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पाणी प्यायल्याने शरीराचं अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं. यामुळेच नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तहान लागते. पुन्हा पुन्हा पाणी प्यावसं वाटतं.

सतत गरम होतं असल्याने, घाम येत असल्याने शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते काही आजारांचं कारण असू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तहान भागवण्यासाठी अनेक ग्लास पाणी पितात. थंड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक आणि सतत पाणी पिऊनही त्यांना घशाला कोरड पडल्याचं जाणवतं. या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाऊ नये, कारण ते धोकादायक असू शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य