शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाज्या स्टीम करून खाव्यात की उकडून, काय जास्त फायदेशीर? डायटिशिअनने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 11:38 IST

How to make vegetable : भाज्या स्टीम करून खाव्या की उकडून खाव्यात? हा तर मुख्य प्रश्न आहे. अशात न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याचं उत्तर दिलं आहे. 

How to make vegetable : आपल्या रोजच्या आहारात भाज्यांना मुख्य स्थान असतं. वेगवेगळ्या भाज्यांमधून शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, खनिज आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. वेगवेगळ्या भाज्यांचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच शरीराचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सही नष्ट होतात. मात्र, भाज्यांबाबत नेहमीच अनेकांना असा प्रश्न पडतो की, भाज्या कशा पद्धतीने खाल्ल्या तर त्यातून जास्त फायदे मिळतात? भाज्या शिवजण्याची योग्य पद्धत कोणती आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. भाज्या स्टीम करून खाव्या की उकडून खाव्यात? हा तर मुख्य प्रश्न आहे. अशात न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याचं उत्तर दिलं आहे. 

भाज्या खाण्याची योग्य पद्धत

डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी सांगितलं की, "जेव्हा तुम्ही भाजी बनवण्यासाठी किंवा एखादं सूप बनवण्यासाठी भाज्या उकडता तेव्हा भाजीतील पोषक तत्व पाण्यात मिक्स होतात. जर तुम्ही या पाण्याचा वापर एखाद्या वेगळ्या पदार्थात करत असाल तर चांगले पोषक तत्व मिळू शकतात. उकडलेल्या भाज्यांचा फायदा असा मिळतो की, अनेक भाज्यांमध्ये ओक्सालेट्स असतात आणि जेव्हा आपण भाज्या उकडून खातो तेव्हा हे ओक्सालेट्स ८० टक्के कमी होतात". 

अशात डायटिशिअनने सांगितलं की, जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भाज्या तुम्ही उकडूनच खाल्ल्या पाहिजेत. पण याचं एक नुकसान असंही आहे की, ५० टक्के अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स या प्रोसेसमध्ये निघून जातात.

पोषक तत्व निघून जाऊ नये म्हणून सगळ्यात चांगली पद्धत ही आहे की, भाज्या स्टीम करून खाव्यात. जेव्हा भाज्या स्टीम करता तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की, वापरलं जाणारं पाणी भाज्यांना लागणार नाही. असं झालं तर भाज्या उकडण्यासारखंच होईल. डायटिशिअननुसार, ही पद्धत भाजी बनवण्याची बेस्ट पद्धत आहे. खासकरून ब्रोकली खाण्याची ही बेस्ट पद्धत आहे. ब्रोकली २ मिनिटे स्टीम करा. त्यानंतर त्यावर थोडं मीठ आणि काळी मिरे टाकून सेवन करावं.

तिसरी पद्धत आहे भाज्या तळण्याची. एका पॅनमध्ये तेल टाकून भाज्या काही वेळ परतवून घेतल्या जातात आणि त्यांचं सेवन केलं जातं. यात पोषक तत्व जास्त राहतात. अनेक भाज्यांमध्ये फॅट सोल्यूबल व्हिटॅमिन असतात जे एब्जॉर्ब करण्यासाठी फॅट्सची गरज असते. उदाहरण द्यायचं तर गाजर, रताळीसारख्या गोष्टीमध्ये फॅट सोल्यूबल व्हिटॅमिन भरपूर असतं. या गोष्टी तुम्ही दोन मिनिटे तळूण खाऊ शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य