शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जेवणानंतर फक्त २ मिनिटं करा शतपावली; लठ्ठपणा, मधुमेह अन् गंभीर विकारांना कायमचा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:17 IST

रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळ फेरफटका मारणं किंवा शतपावली करणं अत्यंत आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केलंत तर उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, जठरासंबंधी आजार होण्याचा धोका कायम आहे.

संतुलित आहार नसणं आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. धकाधकीच्या जीवनात जीवनशैली पूर्णपणे बिघडून गेली आहे. जेवण झाल्यानंतर लगेच झोपणं किंवा दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने धोका वाढत चालला आहे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्यासाठी जात असाल तर स्थुलतेसह अनेक आजार जडण्याची भीती असते. याचा थेट परिणाम तुमच्या पचनक्रियेवर पडू शकतो. रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळ फेरफटका मारणं किंवा शतपावली करणं अत्यंत आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केलंत तर उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, जठरासंबंधी आजार होण्याचा धोका कायम आहे.

जेवण झाल्यानंतर लगेच चालणं चांगलं की वाईट, जेवणानंतर किती वेळेपर्यंत फेरफटका मारायला हवा, जेवणानंतर चालण्याने काय फायदे होतात असे प्रश्न अनेकांना पडतात. दरम्यान, जेवणानंतर 15 मिनिटं फेरफटका मारल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं एका अभ्यासात वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. टाइप-2 डायबेटिसचा धोका कमी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. केवळ 2 मिनिटं चालूनही शरीराला चांगला फायदा मिळू शकतो.

जेवण झाल्यानंतर फक्त 2 ते 5 मिनिटं चालल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास फायदा होऊ शकतो, असं एका स्पोर्ट्स मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणात म्हटलं आहे. यात सात अभ्यास मांडण्यात आले आहेत. जेवण झाल्यानंतर बसून राहणं किंवा झोपणं तसंच काही वेळापर्यंत चालल्याने शरीरावर काय प्रभाव पडतो यावर विचार केला गेला. यात इन्शुलिन-रक्तातील साखरेचा स्तर याची तुलना करण्यात आली.

अभ्यासात काय आलं समोर?आरोग्याच्या दृष्टीने उचललं गेलेलं छोट्यातछोटं पाऊलही खूप महत्त्वाचं ठरतं. याचा बऱ्याच प्रमाणात फायदा होत असल्याचं ह्यूस्टन मेथोडिस्ट रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ (Heart Specialist) डॉ. केरशॉ पटेल यांनी म्हटलंय. सात अभ्यासात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. जेवणानंतर काही मिनिटे चालल्याने रक्तातील साखर कमी करण्यास मदत होऊ शकते. या अभ्यासात सहभागी झालेल्यांना जेवणानंतर सोफ्यावर झोपण्याऐवजी काही वेळासाठी फेरफटका मारण्यास सांगितलं गेलं. यात सुरुवातीला ब्लड शुगरचा स्तर वाढलेला होता; पण हळूहळू तो कमी कमी होत गेला.

डायबेटिसमध्ये रुग्णांच्या रक्तातील साखरेचं वाढतं प्रमाण रोखणं हे त्यांच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा मोठा घटक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढणं किंवा कमी होणं हे टाइप-2 डायबेटिसचं लक्षण आहे. उभे राहिल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी ठेवण्यास मदत मिळते. पण चालल्यामुळे अधिक फायदा होतो, असं डॉ. केरशॉ पटेल यांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स