शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
3
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
4
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
5
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
6
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
7
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
8
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
9
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
10
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
11
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
12
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
13
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
14
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
15
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
16
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
17
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
18
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
19
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
20
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:42 IST

दहशतवाद त्याच्या मूळ स्वरूपानुसार, तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्याच्या उद्देशानेच केला जातो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ

दहशतवाद हा फक्त जीवितहानी किंवा मालमत्तेची नासधूस यापुरता मर्यादित नसतो. त्याचा सर्वात खोल परिणाम माणसाच्या मनावर होतो. लोकांमध्ये भीती निर्माण करणे, असुरक्षितता पसरवणे, मानसिक समतोल बिघडवणे हेच दहशतवादाचे प्रमुख उद्दिष्ट. त्यामुळे त्याचा परिणाम पीडितांवरच नाही, तर समाजातील अनेक थरांवर दीर्घकाळ जाणवतो.

दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी, बचावलेले लोक किंवा मृतांचे नातेवाईक यांच्यावर तीव्र मानसिक परिणाम होऊ शकतात. काही लोक गोंधळलेले वाटतात, लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, आठवणीत गडबड होते किंवा विचार नीट करता येत नाही. काहींना थकवा येतो, झोप येत नाही किंवा शरीरात सतत ताण जाणवतो. चिंता, नैराश्य, अपराधीपणा, राग किंवा वास्तव नाकारण्यासारख्या भावना येऊ शकतात. यासोबतच काही लोक एकटे राह लागतात, उदास आणि निष्क्रिय होतात, व्यसनांकडे वळतात किंवा रागीट वर्तन करू लागतात. या लोकांमध्ये पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) दिसून येतो, ज्यामध्ये त्या घटनेचे सतत स्वप्न पडणे, आठवणींनी त्रस्त होणे, भीतीने गोंधळून जाणे आणि सतत सावध राहण्याची प्रवृत्ती दिसते.

काही लोकांना मानसिक धक्का बसतो. वारंवार अशा बातम्या पाहणे, ऐकणे किंवा सोशल मीडियावर दिसणारी घायाळ दृश्य भावनिक ट्रॉमा निर्माण करू शकते. त्यातून झोप न लागणे, अस्वस्थता आणि कोणतीही हिंसक घटना होईल, अशी भीती वाटते. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. घटनेचे आरोपी विशिष्ट धर्माशी, समुदायाशी जोडले गेले, तर समाजात संशय, द्वेष वाढतो. घृणास्पद भावना, वांशिक तणाव आणि विभाजनवादी वृत्ती जन्म घेते.

अशा स्थितीत काय करावे?

मानसिक आघात झालेल्यांना समजून घेणे, सुरक्षिततेची भावना, भावनिक आधार देणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी समुपदेशन, थेरपी, कधी कधी औषधोपचार आवश्यक ठरतो. कुटुंब, मित्र आणि समाजाने त्यांना आधार देणे, त्यांच्याशी संयमाने वागणे महत्त्वाचे आहे. ध्यान, योग, प्रार्थना यांसारख्या उपायांनीही मानसिक स्थैर्य मिळू शकते.

टॅग्स :Healthआरोग्य