शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:42 IST

दहशतवाद त्याच्या मूळ स्वरूपानुसार, तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्याच्या उद्देशानेच केला जातो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ

दहशतवाद हा फक्त जीवितहानी किंवा मालमत्तेची नासधूस यापुरता मर्यादित नसतो. त्याचा सर्वात खोल परिणाम माणसाच्या मनावर होतो. लोकांमध्ये भीती निर्माण करणे, असुरक्षितता पसरवणे, मानसिक समतोल बिघडवणे हेच दहशतवादाचे प्रमुख उद्दिष्ट. त्यामुळे त्याचा परिणाम पीडितांवरच नाही, तर समाजातील अनेक थरांवर दीर्घकाळ जाणवतो.

दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी, बचावलेले लोक किंवा मृतांचे नातेवाईक यांच्यावर तीव्र मानसिक परिणाम होऊ शकतात. काही लोक गोंधळलेले वाटतात, लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, आठवणीत गडबड होते किंवा विचार नीट करता येत नाही. काहींना थकवा येतो, झोप येत नाही किंवा शरीरात सतत ताण जाणवतो. चिंता, नैराश्य, अपराधीपणा, राग किंवा वास्तव नाकारण्यासारख्या भावना येऊ शकतात. यासोबतच काही लोक एकटे राह लागतात, उदास आणि निष्क्रिय होतात, व्यसनांकडे वळतात किंवा रागीट वर्तन करू लागतात. या लोकांमध्ये पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) दिसून येतो, ज्यामध्ये त्या घटनेचे सतत स्वप्न पडणे, आठवणींनी त्रस्त होणे, भीतीने गोंधळून जाणे आणि सतत सावध राहण्याची प्रवृत्ती दिसते.

काही लोकांना मानसिक धक्का बसतो. वारंवार अशा बातम्या पाहणे, ऐकणे किंवा सोशल मीडियावर दिसणारी घायाळ दृश्य भावनिक ट्रॉमा निर्माण करू शकते. त्यातून झोप न लागणे, अस्वस्थता आणि कोणतीही हिंसक घटना होईल, अशी भीती वाटते. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. घटनेचे आरोपी विशिष्ट धर्माशी, समुदायाशी जोडले गेले, तर समाजात संशय, द्वेष वाढतो. घृणास्पद भावना, वांशिक तणाव आणि विभाजनवादी वृत्ती जन्म घेते.

अशा स्थितीत काय करावे?

मानसिक आघात झालेल्यांना समजून घेणे, सुरक्षिततेची भावना, भावनिक आधार देणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी समुपदेशन, थेरपी, कधी कधी औषधोपचार आवश्यक ठरतो. कुटुंब, मित्र आणि समाजाने त्यांना आधार देणे, त्यांच्याशी संयमाने वागणे महत्त्वाचे आहे. ध्यान, योग, प्रार्थना यांसारख्या उपायांनीही मानसिक स्थैर्य मिळू शकते.

टॅग्स :Healthआरोग्य