शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 05:45 IST

युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

बंगळुरू: २०३० सालापर्यंत भारतामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या कालावधीपर्यंत झालेल्या दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदरोगतज्ज्ञ डॉ.सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याकडे नीट लक्ष देणे, उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करणे, तसेच खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण राखणे, व्यसनांपासून दूर राहणे आदी उपाय योजले, तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. डॉ. सी.एन. मंजुनाथ हे श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेचे संचालक आहेत.

डॉ.सी.एन. मंजुनाथ म्हणाले की, युवक, तसेच किशोरवयीन मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) आयोजिलेल्या एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमाचे उद्घाटन एचएएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी केले. 

पक्षाघातही मोठा शत्रू

जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू हे हृदयविकार व पक्षाघातामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी ३० लाख लोक हृदयविकार व पक्षाघाताने मरण पावतात. त्यातील ४० टक्के लोक हे ५५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. गेल्या २६ वर्षांत भारतात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे.

निम्मे रुग्ण पन्नाशीतले

भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर २५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.

ही काळजी घ्या

- व्यसनांपासून दूर राहा- उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करा- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाIndiaभारतBengaluruबेंगळूर