शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 05:45 IST

युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

बंगळुरू: २०३० सालापर्यंत भारतामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या कालावधीपर्यंत झालेल्या दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदरोगतज्ज्ञ डॉ.सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याकडे नीट लक्ष देणे, उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करणे, तसेच खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण राखणे, व्यसनांपासून दूर राहणे आदी उपाय योजले, तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. डॉ. सी.एन. मंजुनाथ हे श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेचे संचालक आहेत.

डॉ.सी.एन. मंजुनाथ म्हणाले की, युवक, तसेच किशोरवयीन मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) आयोजिलेल्या एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमाचे उद्घाटन एचएएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी केले. 

पक्षाघातही मोठा शत्रू

जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू हे हृदयविकार व पक्षाघातामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी ३० लाख लोक हृदयविकार व पक्षाघाताने मरण पावतात. त्यातील ४० टक्के लोक हे ५५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. गेल्या २६ वर्षांत भारतात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे.

निम्मे रुग्ण पन्नाशीतले

भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर २५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.

ही काळजी घ्या

- व्यसनांपासून दूर राहा- उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करा- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाIndiaभारतBengaluruबेंगळूर