शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सावध व्हा, काळजी घ्या; आपले हृदय जपा, अन्यथा... २०३०पर्यंत भारतात हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 05:45 IST

युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

बंगळुरू: २०३० सालापर्यंत भारतामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या कालावधीपर्यंत झालेल्या दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदरोगतज्ज्ञ डॉ.सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याकडे नीट लक्ष देणे, उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करणे, तसेच खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण राखणे, व्यसनांपासून दूर राहणे आदी उपाय योजले, तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. डॉ. सी.एन. मंजुनाथ हे श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेचे संचालक आहेत.

डॉ.सी.एन. मंजुनाथ म्हणाले की, युवक, तसेच किशोरवयीन मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) आयोजिलेल्या एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमाचे उद्घाटन एचएएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी केले. 

पक्षाघातही मोठा शत्रू

जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू हे हृदयविकार व पक्षाघातामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी ३० लाख लोक हृदयविकार व पक्षाघाताने मरण पावतात. त्यातील ४० टक्के लोक हे ५५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. गेल्या २६ वर्षांत भारतात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे.

निम्मे रुग्ण पन्नाशीतले

भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर २५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.

ही काळजी घ्या

- व्यसनांपासून दूर राहा- उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करा- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाIndiaभारतBengaluruबेंगळूर