शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्यात हे पाच पदार्थ ठेवतील तुम्हाला "कुल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:45 IST

उन्हाळा म्हटलं की बाजारातले आईस्क्रीम, थंडपेय आपल्याला आठवतात. पण त्यापेक्षा शरीराच्या आतून थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करण्याची गरज असते. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला न भूलता या पाच थंड गुणधर्माच्या पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश करा आणि उन्हाळ्याचे आजार दूर पळवा. 

पुणे : उन्हाळा म्हटलं की बाजारातले आईस्क्रीम, थंडपेय आपल्याला आठवतात. पण त्यापेक्षा शरीराच्या आतून थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करण्याची गरज असते. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला न भूलता या पाच थंड गुणधर्माच्या पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश करा आणि उन्हाळ्याचे आजार दूर पळवा. 

गुलकंद : चवीला गोड, स्वादिष्ट असणाऱ्या गुलकंदाची चव प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी घ्यायला हवी. थंड दुधात किंवा थेट पण गुलकंदाचे सेवन आवर्जून करावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पचनाचे विकार कमी होतात. 

जिऱ्याचे पाणी :हे ऐकायला जरी नवीन असले तरी रात्रभर एका ग्लासात चमचाभर जिरे भिजत घालून त्या पाण्याचे अनशापोटी सेवन करावे. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हे पाणी प्यायल्यावर जिरे चावून खावेत. त्यामुळे अधिक आराम पडतो. 

सब्जा आणि तुळशीचे बी : सब्जा आणि तुळशीचे बी यापैकी काहीतरी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन करावे. हा सर्वात खात्रीशीर उपाय असून उन्हाळी लागलेल्या व्यक्तीने तर दर तासाला असे पाणी प्यावे. 

ताक : ताक हे पृथ्वीवरचे अमृत मानले जाते. विशेषतः जेवताना ताकाचा समावेश अवश्य करा. त्यात हिंग आणि काळे मीठ घालावे. ताक दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायल्यास असे ताक प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. 

कोथिंबीर : खूप जणांना माहिती नाही पण कोथिंबीर थंड धर्माची असते. कोथिंबीर वाटून केलेला रस हा उष्णतेचे विकार आणि पित्तावर गुणकारी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कोथिंबिरीचे सेवन वाढवा. अगदी रस नाही केला तर जेवताना कोथिंबीर धुवून, चिरून खाल्ली तरी उन्हाचा त्रास कमी होईल.  

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स