शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Diabetes मधुमेहाबद्दल आहेत 'या' अफवा...तुम्हीही कधीतरी फसले असणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 18:31 IST

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं.

Diabetes गेल्या काही काळापासून मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले आहे. अगदी तरुण वयातही मधुमेहाचे निदान होत आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या गरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. याला अनेक कारणे असु शकतात. मधुमेह हा आनुवंशिक असु शकतो मात्र नेहमीच असे होत नाही. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, वाढते वजन हे देखील कारणीभुत ठरते. 

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं. बघुया मधुमेहाबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे ज्यावर तुम्हीही कधीतरी विश्वास ठेवलाच असेल.

कुटुंबात कोणाला मधुमेह नाही तर धोका नाही

हे खरे आहे की मधुमेह बऱ्याचदा आनुवंशिक असतो. आई वडील, भाऊ बहिण यांच्यापैकी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही धोका अधिक असतो. मात्र जर कुटुंबात कोणालाही मधुमेह नसेल तर तुम्हालाही होणार नाही हे चुकीचे आहे. स्थुलता, अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणे, शारिरीक कार्य कमी असणे यामुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी भात, बटाटा खाऊ नये

मधुमेहासंदर्भात अनेक पथ्य आहेत मात्र ते सगळेच खरे नाहीत. भात आणि बटाटा यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते म्हणून ते अजिबात खाऊ नये. मात्र या गोष्टी १०० टक्के वर्ज्य नाहीत. कार्बोहायड्रेट शरीरात ऊर्जा निर्माण करतात. ते नसेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटचे नियंत्रित सेवन करु शकता.

साखरेचे प्रमाण योग्य झाल्यानंतर मधुमेहाचे औषधे घेण्याची गरज नाही

मधुमेहाचे अनेक रुग्ण ही चुक करतात. साखर कंट्रोल मध्ये आल्यानंतर स्वत:च गोळ्या, इन्सुलिन घेणे बंद करतात. डॉक्टर या सवयीला खुपच गंभीर समजतात. मधुमेह पूर्ण बरा होत नाही, गोळ्यांनीच तो नियंत्रणात राहतो. अशावेळी साखरेचे प्रमाण अचानक झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. काही अवयव निकामी देखील होऊ शकतात. डॉक्टरांना न सांगता औषधे बंद करु नये.

मधुमेह केवळ पचन आणि रक्ताची समस्या आहे

पचनक्रियेत होणाऱ्या त्रासामुळे मधुमेह होतो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामध्ये डोळे, किडनी, यकृत यांना धोका असतो. त्यामुळे हे केवळ एखाद्या अवयवापुरते मर्यादित राहत नाही तर हळूहळू इतर अवयवांनाही धोका असतो. म्हणून मधुमेहाचे उपचार बंद करु नये.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स