शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

Diabetes मधुमेहाबद्दल आहेत 'या' अफवा...तुम्हीही कधीतरी फसले असणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 18:31 IST

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं.

Diabetes गेल्या काही काळापासून मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले आहे. अगदी तरुण वयातही मधुमेहाचे निदान होत आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या गरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. याला अनेक कारणे असु शकतात. मधुमेह हा आनुवंशिक असु शकतो मात्र नेहमीच असे होत नाही. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, वाढते वजन हे देखील कारणीभुत ठरते. 

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं. बघुया मधुमेहाबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे ज्यावर तुम्हीही कधीतरी विश्वास ठेवलाच असेल.

कुटुंबात कोणाला मधुमेह नाही तर धोका नाही

हे खरे आहे की मधुमेह बऱ्याचदा आनुवंशिक असतो. आई वडील, भाऊ बहिण यांच्यापैकी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही धोका अधिक असतो. मात्र जर कुटुंबात कोणालाही मधुमेह नसेल तर तुम्हालाही होणार नाही हे चुकीचे आहे. स्थुलता, अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणे, शारिरीक कार्य कमी असणे यामुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी भात, बटाटा खाऊ नये

मधुमेहासंदर्भात अनेक पथ्य आहेत मात्र ते सगळेच खरे नाहीत. भात आणि बटाटा यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते म्हणून ते अजिबात खाऊ नये. मात्र या गोष्टी १०० टक्के वर्ज्य नाहीत. कार्बोहायड्रेट शरीरात ऊर्जा निर्माण करतात. ते नसेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटचे नियंत्रित सेवन करु शकता.

साखरेचे प्रमाण योग्य झाल्यानंतर मधुमेहाचे औषधे घेण्याची गरज नाही

मधुमेहाचे अनेक रुग्ण ही चुक करतात. साखर कंट्रोल मध्ये आल्यानंतर स्वत:च गोळ्या, इन्सुलिन घेणे बंद करतात. डॉक्टर या सवयीला खुपच गंभीर समजतात. मधुमेह पूर्ण बरा होत नाही, गोळ्यांनीच तो नियंत्रणात राहतो. अशावेळी साखरेचे प्रमाण अचानक झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. काही अवयव निकामी देखील होऊ शकतात. डॉक्टरांना न सांगता औषधे बंद करु नये.

मधुमेह केवळ पचन आणि रक्ताची समस्या आहे

पचनक्रियेत होणाऱ्या त्रासामुळे मधुमेह होतो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामध्ये डोळे, किडनी, यकृत यांना धोका असतो. त्यामुळे हे केवळ एखाद्या अवयवापुरते मर्यादित राहत नाही तर हळूहळू इतर अवयवांनाही धोका असतो. म्हणून मधुमेहाचे उपचार बंद करु नये.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स