शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऍसिडिटी दूर पळवण्यासाठी हे उपाय करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:49 IST

सतत फास्टफूडचं सेवन, खाण्याच्या अनियमित वेळा, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन ऍसिडिटीला आमंत्रण देत असते.

पुणे : सतत फास्टफूडचं सेवन, खाण्याच्या अनियमित वेळा, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन ऍसिडिटीला आमंत्रण देत असते. ऍसिडिटी अर्थात आम्लपित्त कधीतरी होत असेल तर हरकत नाही मात्र रोजच त्रास होणार असेल तर मात्र तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे. मात्र अनेकदा बाहेर असताना ऍसिडिटीमुळे अस्वस्थ व्हायला सुरुवात होते आणि गोळ्या घेतल्या जातात. पण काही घरगुती उपाय केले तरी हा त्रास कमी होऊ शकतो.तेव्हा ऍसिडिटीचा समूळ नाश करण्यासाठी या उपाययोजना करा. 

भरपूर पाणी प्या : कोमट किंवा थंड पाणी पिणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. साधारण दोन ग्लास पाणी घोटघोट प्यायल्याने छातीतली जळजळ कमी होते. या पाण्यात आवडत  असल्यास बडीशेपची पावडर अर्धा चमचा टाका. त्यामुळे पाण्याला फ्लेवर तर येईलच पण जळजळही आटोक्यात येईल. 

जीरे : छोटासा वाटत असला तरी हा उपाय गुणकारी आहे. चमचाभर जीरे चावून खाणे किंवा थंड पाण्यात जिरे पावडर घालून प्यायल्यास जळजळ कमी होते. 

आवळा : सर्वांनाच माहिती असणारा हा उपाय आहे. ऍसिडिटी झाल्यास आवळा काळे मीठ लावून कच्चा खाता येईल. आवळा नसेल तर सरबत पिण्याचाही पर्याय आहे. इतकेच नव्हे तर जेवणानंतर आवळा सुपारी चघळल्यानेही ऍसिडिटी होत नाही. 

तुळशीचे पान : जळजळ दूर होण्याचा हा उत्तम उपाय आहे. थोडीशी जरी जळजळ झाली तरी चार तुळशीची पाने धुवून खाल्ल्यास आराम पडतो. 

 गूळ : आम्लपित्तावर गूळ उपयोगी ठरतो. जेवण झाल्यावर १० मिनिटांनी गुळाचा लहानसा तुकडा खाऊन त्यावर थोडस पाणी प्यायल्यास ऍसिडिटीची समस्या उद्भवत नाही. 

थंड दूध : ऍसिडिटी झाल्यावर कपभर थंड दूध पिताना त्यात कोणत्याही फ्लेवरची पावडर घालू नये. तसेच दुधात साखर घालणेही टाळावे. गायीचे दूध फ्रीजमध्ये थंड करून आणि आवडत असल्यास एक चमचा तूप घालून प्यावे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmedicineऔषधं