शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

या पावसाळ्यात तुमचे पोट विकारांपासून ठेवा दूर, आजपासूनच फॉलो करा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:49 IST

पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...

पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. टायफाइड, डायरिया, काविळीची साथ पसरते. अस्वच्छता, अशुद्ध पाणी आणि उघड्यावरचे पदार्थ यांच्यामुळे पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...

उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळापावसाळ्याच्या दिवसात तिखट कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. वडा तसेच भज्यांबरोबर दिली जाणारी ओली चटणी आरोग्याला घातक ठरू शकते. बराच काळ उघण्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. उघड्या पदार्थांवर फिरणाऱ्या माशा रोगराईचा प्रसार करतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

पाणी उकळून प्यापावसाळ्याच्या दिवसात पचनसंस्था आणि जठराचे काम मंदावते. परिणामी शरीरात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाणी उकळूनच प्या. पाणी उकळल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात. पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक आजार हे पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.

अन्न पदार्थ ताजे खाया दिवसांमध्ये अन्नपदार्थ जास्त प्रमाणात शिजवून घ्यावेत. जास्त शिजवलेल्या अन्नात जंतूंची वाढ होण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. स्वयंपाक तयार होऊन जास्त वेळ झाला असेल, तर अन्न पुन्हा गरम करा. जेणेकरून त्यात जंतू वाढण्याची शक्‍यता कमी होते. तसेच पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते.

तांदळाचे पाणी प्यातांदूळ शिजविताना अनेकजण त्याचे उकळते पाणी फेकून देतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. या तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. यात अँटीइंफ्लेमेटरी, अँटीफंगल, अँटीऑक्सीडेंट असे गुणधर्म असतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका दुर होतो. तांदळाचे पाणी पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स