शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

या पावसाळ्यात तुमचे पोट विकारांपासून ठेवा दूर, आजपासूनच फॉलो करा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:49 IST

पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...

पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. टायफाइड, डायरिया, काविळीची साथ पसरते. अस्वच्छता, अशुद्ध पाणी आणि उघड्यावरचे पदार्थ यांच्यामुळे पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...

उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळापावसाळ्याच्या दिवसात तिखट कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. वडा तसेच भज्यांबरोबर दिली जाणारी ओली चटणी आरोग्याला घातक ठरू शकते. बराच काळ उघण्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. उघड्या पदार्थांवर फिरणाऱ्या माशा रोगराईचा प्रसार करतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

पाणी उकळून प्यापावसाळ्याच्या दिवसात पचनसंस्था आणि जठराचे काम मंदावते. परिणामी शरीरात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाणी उकळूनच प्या. पाणी उकळल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात. पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक आजार हे पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.

अन्न पदार्थ ताजे खाया दिवसांमध्ये अन्नपदार्थ जास्त प्रमाणात शिजवून घ्यावेत. जास्त शिजवलेल्या अन्नात जंतूंची वाढ होण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. स्वयंपाक तयार होऊन जास्त वेळ झाला असेल, तर अन्न पुन्हा गरम करा. जेणेकरून त्यात जंतू वाढण्याची शक्‍यता कमी होते. तसेच पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते.

तांदळाचे पाणी प्यातांदूळ शिजविताना अनेकजण त्याचे उकळते पाणी फेकून देतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. या तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. यात अँटीइंफ्लेमेटरी, अँटीफंगल, अँटीऑक्सीडेंट असे गुणधर्म असतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका दुर होतो. तांदळाचे पाणी पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स