शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

घामाच्या वासानं लाज वाटतेय, लोकांमध्ये मिसळण्यास संकोच वाटतो मग या गोष्टी करून पाहाच!

By admin | Updated: June 30, 2017 18:09 IST

शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो.पण सोप्या उपायांनी तो घालवताही येतो.

- माधुरी पेठकरघामचा वास येतो यामुळे अनेकांना लाज वाटते.लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. आणि आपल्यापासून लोकं घामाच्या वासामुळे दूर पळतात या भावनेनं तर अपमानित व्हायला होतं. शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो. अनेकजण डिओडरन्ट वापरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा परिणाम फार कमी वेळ टिकतो. या समस्येवर उपाय कोणत्याही आर्टिफिशिअलपध्दतीनं न करता काही नैसर्गिक घटकांचा वापर करून, आहारात आणि राहाणीमानात बदल करूनही शरीराची दुर्गंधी घालवता येते.

 

हे करून बघाव्हाइट व्हिनेगर1 ) शरीराला दुर्गंधी येत असेल तर व्हाइट व्हिनेगर वापरून पाहावं. व्हाइट व्हिनेगरमध्ये कापूस बुडवावा आणि तो काखेत फिरवावा. 2) स्प्रेच्या बाटलीत व्हाइट व्हिनेगर ओतून ते स्प्रेसारखं वापरावं. आंघोळ झाल्यानंतर व्हाइट व्हिनेगरचा स्प्रे काखेत मारावा. व्हाइट व्हिनेगर वापरल्यानंतर डिओडरन्ट वापरू नये.3) एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात व्हाइट व्हिनेगर घालावं. त्या पाण्यानं काख स्वच्छ करावी.लिंबाचा रस1) लिंबामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जंतू आटोक्यात राहातात. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना व्हिनेगर चालत नाही. पण ते लिबांचा रस वापरू शकतात. 2) लिंबू चिरून घेवून त्याचे दोन भाग करावेत. अर्धा लिबू घेवून तो दोन्ही काखेत घासावा. लिंबू घासण्याऐवजी लिंबाचा रस काढून तो कापसाच्या बोळ्यानं काखेत लावावा. रात्री झोपण्याआधी लावला तरी चालतो. 3) ज्यांना घाम जास्त येतो आणि शरीराल दुर्गंधीही जास्त येते त्यांनी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून वापरल्यास दुर्गंधी दूर होते. बेकिंग सोड्यामुळे घाम शोषला जातो आणि जंतूही निघून जातात. यासाठी अधर््या लिंबाचा रस घेवून पेस्ट होईल इतका बेकिंग सोडा त्यात मिसळावा. आंघोळीच्या आधी ही पेस्ट काखेत लावावी. 5-10 मीनिटं ती तशीच राहू द्यावी. नंतर पाण्यानं धुवावी.

 

टी ट्री आॅइल1) टी ट्री ही अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल आणि अ‍ॅण्टिसेप्टिक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या तेलामुळे बुरशी आणणाऱ्या जंतूंचा नाश होतो. या वनस्पतीला गोड वास येतो. त्यामुळे या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग डिओडरन्ट सारखाही करता येतो. 2) मात्र ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते त्यांना हे तेल लावल्यानं चुरचुरतं. म्हणून त्यांनी हे न वापरता इतर उपाय करावा. आणि ज्यांना चालतं त्यांनी दोन मोठे चमचे पाणी घ्यावं. त्यात या तेलाचे दोन थेंब मिसळावे. कापसाच्या बोळ्यानं ते पाणी काखेत लावावं. 3) ते डिओडरन्टसारखं वापरायचं असल्यास स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरावं. आणि पाण्याच्या मापानुसार तेलाचे थेंब मिसळावेत. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी काखेत स्प्रे करावं.

 

गव्हाच्या तृणाचा रसगव्हाच्या तृणाचा रस चवीनं अगदीच उग्र असतो. पण हा रस नियमित सेवन केल्यानं शरीराची दुर्गंधी जाते. सुरूवात करताना थोडा थोडा तृणरस घ्यावा. एक कप पाण्यात गव्हाचा तृणरस मिसळून ते पाणी रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी घ्यावा.टोमॅटोचा रसटोमॅटोतही अ‍ॅण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. आयुर्वेदातही टोमॅटोच्या रसाचा उपयोग शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करता येतो असं म्हटलं आहे. अनेक वनौषधी तज्ञ्ज्ञांच्या मते टोमॅटोचा रस दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास शरीराला उत्तम फायदा होतो. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी टोमॅटो वापरताना 8- 10 टोमॅटो घ्यावेत. ते सोलून त्याचा गर काढावा. गरातून रस काढून तो एक बादलीभर पाण्यात मिसळावा. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी. शरीराला दुर्गंधी येत नाही.

 

  

 

काय खावं प्यावं आणि काय घालावं?दुर्गंधी शरीरातून येते तेव्हा केवळ बाह्य उपचार करून भागत नाही तर आपण काय खातो पितो याकडे लक्ष देवून त्याबाबतचे नियम पाळणंही गरजेचं आहे. तसेच आपण कपडे बूट कसे घालतो, शरीरस्वच्छतेच्या आपल्या सवयी काय आहेत याकडे लक्ष देवून त्यात बदल करणंही आवश्यक आहे.1 ) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही शरीरास दुर्गंधी येत नाही. 2) आहारात प्रथिनं, कडधान्यं, तंतूमय पदार्थ, आरोग्यदायी फॅटस, ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या यांचा समावेश करावा. 3) पचण्यास अवघड पदार्थ कमी खावेत. किंवा खाऊच नये. हे पदार्थ शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात. 4) मैदायुक्त पदार्थ, रिफाइन्ड साखर खाऊ नये. प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाऊ नये. 5) अतिमसालेदार ( कांदा, लसूण) जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.6) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी चहा कॉफीचं प्रमाण आटोक्यात ठेवावं. शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावं.7) पुदिना, कोथिंबीर, पार्सली, ओरिगॅनो या वनस्पतींचा समावेश पदार्थात करावा. 8 ) बडीशेप चावून खावी.9) रोज आंघोळ करावी. आंघोळीचा साबण उग्र नसावा. साबण जास्त लावू नये. नैसर्गिक तत्वांचा उपयोग केलेला सौम्य साबण आंघोळीसाठी वापरावा.10) न धुतलेले कपडे वापरू नये.11) घट्ट बूट घालू नये. जास्त वेळ बूट घालू नये. बुटांऐवजी सॅण्डल्स वापराव्यात. 12) काखेतले केस नियमिपणे काढून टाकावेत. 13) राग आणि ताण नियंत्रणात ठेवावा. या दोन गोष्टींमुळेही जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीरास दुर्गंधी येते. 14) गुदमरवणारे घट्ट कपडे न वापरता सैल कपडे वापरावेत.