शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

घामाच्या वासानं लाज वाटतेय, लोकांमध्ये मिसळण्यास संकोच वाटतो मग या गोष्टी करून पाहाच!

By admin | Updated: June 30, 2017 18:09 IST

शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो.पण सोप्या उपायांनी तो घालवताही येतो.

- माधुरी पेठकरघामचा वास येतो यामुळे अनेकांना लाज वाटते.लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. आणि आपल्यापासून लोकं घामाच्या वासामुळे दूर पळतात या भावनेनं तर अपमानित व्हायला होतं. शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो. अनेकजण डिओडरन्ट वापरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा परिणाम फार कमी वेळ टिकतो. या समस्येवर उपाय कोणत्याही आर्टिफिशिअलपध्दतीनं न करता काही नैसर्गिक घटकांचा वापर करून, आहारात आणि राहाणीमानात बदल करूनही शरीराची दुर्गंधी घालवता येते.

 

हे करून बघाव्हाइट व्हिनेगर1 ) शरीराला दुर्गंधी येत असेल तर व्हाइट व्हिनेगर वापरून पाहावं. व्हाइट व्हिनेगरमध्ये कापूस बुडवावा आणि तो काखेत फिरवावा. 2) स्प्रेच्या बाटलीत व्हाइट व्हिनेगर ओतून ते स्प्रेसारखं वापरावं. आंघोळ झाल्यानंतर व्हाइट व्हिनेगरचा स्प्रे काखेत मारावा. व्हाइट व्हिनेगर वापरल्यानंतर डिओडरन्ट वापरू नये.3) एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात व्हाइट व्हिनेगर घालावं. त्या पाण्यानं काख स्वच्छ करावी.लिंबाचा रस1) लिंबामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जंतू आटोक्यात राहातात. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना व्हिनेगर चालत नाही. पण ते लिबांचा रस वापरू शकतात. 2) लिंबू चिरून घेवून त्याचे दोन भाग करावेत. अर्धा लिबू घेवून तो दोन्ही काखेत घासावा. लिंबू घासण्याऐवजी लिंबाचा रस काढून तो कापसाच्या बोळ्यानं काखेत लावावा. रात्री झोपण्याआधी लावला तरी चालतो. 3) ज्यांना घाम जास्त येतो आणि शरीराल दुर्गंधीही जास्त येते त्यांनी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून वापरल्यास दुर्गंधी दूर होते. बेकिंग सोड्यामुळे घाम शोषला जातो आणि जंतूही निघून जातात. यासाठी अधर््या लिंबाचा रस घेवून पेस्ट होईल इतका बेकिंग सोडा त्यात मिसळावा. आंघोळीच्या आधी ही पेस्ट काखेत लावावी. 5-10 मीनिटं ती तशीच राहू द्यावी. नंतर पाण्यानं धुवावी.

 

टी ट्री आॅइल1) टी ट्री ही अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल आणि अ‍ॅण्टिसेप्टिक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या तेलामुळे बुरशी आणणाऱ्या जंतूंचा नाश होतो. या वनस्पतीला गोड वास येतो. त्यामुळे या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग डिओडरन्ट सारखाही करता येतो. 2) मात्र ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते त्यांना हे तेल लावल्यानं चुरचुरतं. म्हणून त्यांनी हे न वापरता इतर उपाय करावा. आणि ज्यांना चालतं त्यांनी दोन मोठे चमचे पाणी घ्यावं. त्यात या तेलाचे दोन थेंब मिसळावे. कापसाच्या बोळ्यानं ते पाणी काखेत लावावं. 3) ते डिओडरन्टसारखं वापरायचं असल्यास स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरावं. आणि पाण्याच्या मापानुसार तेलाचे थेंब मिसळावेत. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी काखेत स्प्रे करावं.

 

गव्हाच्या तृणाचा रसगव्हाच्या तृणाचा रस चवीनं अगदीच उग्र असतो. पण हा रस नियमित सेवन केल्यानं शरीराची दुर्गंधी जाते. सुरूवात करताना थोडा थोडा तृणरस घ्यावा. एक कप पाण्यात गव्हाचा तृणरस मिसळून ते पाणी रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी घ्यावा.टोमॅटोचा रसटोमॅटोतही अ‍ॅण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. आयुर्वेदातही टोमॅटोच्या रसाचा उपयोग शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करता येतो असं म्हटलं आहे. अनेक वनौषधी तज्ञ्ज्ञांच्या मते टोमॅटोचा रस दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास शरीराला उत्तम फायदा होतो. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी टोमॅटो वापरताना 8- 10 टोमॅटो घ्यावेत. ते सोलून त्याचा गर काढावा. गरातून रस काढून तो एक बादलीभर पाण्यात मिसळावा. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी. शरीराला दुर्गंधी येत नाही.

 

  

 

काय खावं प्यावं आणि काय घालावं?दुर्गंधी शरीरातून येते तेव्हा केवळ बाह्य उपचार करून भागत नाही तर आपण काय खातो पितो याकडे लक्ष देवून त्याबाबतचे नियम पाळणंही गरजेचं आहे. तसेच आपण कपडे बूट कसे घालतो, शरीरस्वच्छतेच्या आपल्या सवयी काय आहेत याकडे लक्ष देवून त्यात बदल करणंही आवश्यक आहे.1 ) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही शरीरास दुर्गंधी येत नाही. 2) आहारात प्रथिनं, कडधान्यं, तंतूमय पदार्थ, आरोग्यदायी फॅटस, ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या यांचा समावेश करावा. 3) पचण्यास अवघड पदार्थ कमी खावेत. किंवा खाऊच नये. हे पदार्थ शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात. 4) मैदायुक्त पदार्थ, रिफाइन्ड साखर खाऊ नये. प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाऊ नये. 5) अतिमसालेदार ( कांदा, लसूण) जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.6) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी चहा कॉफीचं प्रमाण आटोक्यात ठेवावं. शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावं.7) पुदिना, कोथिंबीर, पार्सली, ओरिगॅनो या वनस्पतींचा समावेश पदार्थात करावा. 8 ) बडीशेप चावून खावी.9) रोज आंघोळ करावी. आंघोळीचा साबण उग्र नसावा. साबण जास्त लावू नये. नैसर्गिक तत्वांचा उपयोग केलेला सौम्य साबण आंघोळीसाठी वापरावा.10) न धुतलेले कपडे वापरू नये.11) घट्ट बूट घालू नये. जास्त वेळ बूट घालू नये. बुटांऐवजी सॅण्डल्स वापराव्यात. 12) काखेतले केस नियमिपणे काढून टाकावेत. 13) राग आणि ताण नियंत्रणात ठेवावा. या दोन गोष्टींमुळेही जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीरास दुर्गंधी येते. 14) गुदमरवणारे घट्ट कपडे न वापरता सैल कपडे वापरावेत.