शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

घामाच्या वासानं लाज वाटतेय, लोकांमध्ये मिसळण्यास संकोच वाटतो मग या गोष्टी करून पाहाच!

By admin | Updated: June 30, 2017 18:09 IST

शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो.पण सोप्या उपायांनी तो घालवताही येतो.

- माधुरी पेठकरघामचा वास येतो यामुळे अनेकांना लाज वाटते.लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. आणि आपल्यापासून लोकं घामाच्या वासामुळे दूर पळतात या भावनेनं तर अपमानित व्हायला होतं. शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो. अनेकजण डिओडरन्ट वापरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा परिणाम फार कमी वेळ टिकतो. या समस्येवर उपाय कोणत्याही आर्टिफिशिअलपध्दतीनं न करता काही नैसर्गिक घटकांचा वापर करून, आहारात आणि राहाणीमानात बदल करूनही शरीराची दुर्गंधी घालवता येते.

 

हे करून बघाव्हाइट व्हिनेगर1 ) शरीराला दुर्गंधी येत असेल तर व्हाइट व्हिनेगर वापरून पाहावं. व्हाइट व्हिनेगरमध्ये कापूस बुडवावा आणि तो काखेत फिरवावा. 2) स्प्रेच्या बाटलीत व्हाइट व्हिनेगर ओतून ते स्प्रेसारखं वापरावं. आंघोळ झाल्यानंतर व्हाइट व्हिनेगरचा स्प्रे काखेत मारावा. व्हाइट व्हिनेगर वापरल्यानंतर डिओडरन्ट वापरू नये.3) एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात व्हाइट व्हिनेगर घालावं. त्या पाण्यानं काख स्वच्छ करावी.लिंबाचा रस1) लिंबामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जंतू आटोक्यात राहातात. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना व्हिनेगर चालत नाही. पण ते लिबांचा रस वापरू शकतात. 2) लिंबू चिरून घेवून त्याचे दोन भाग करावेत. अर्धा लिबू घेवून तो दोन्ही काखेत घासावा. लिंबू घासण्याऐवजी लिंबाचा रस काढून तो कापसाच्या बोळ्यानं काखेत लावावा. रात्री झोपण्याआधी लावला तरी चालतो. 3) ज्यांना घाम जास्त येतो आणि शरीराल दुर्गंधीही जास्त येते त्यांनी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून वापरल्यास दुर्गंधी दूर होते. बेकिंग सोड्यामुळे घाम शोषला जातो आणि जंतूही निघून जातात. यासाठी अधर््या लिंबाचा रस घेवून पेस्ट होईल इतका बेकिंग सोडा त्यात मिसळावा. आंघोळीच्या आधी ही पेस्ट काखेत लावावी. 5-10 मीनिटं ती तशीच राहू द्यावी. नंतर पाण्यानं धुवावी.

 

टी ट्री आॅइल1) टी ट्री ही अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल आणि अ‍ॅण्टिसेप्टिक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या तेलामुळे बुरशी आणणाऱ्या जंतूंचा नाश होतो. या वनस्पतीला गोड वास येतो. त्यामुळे या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग डिओडरन्ट सारखाही करता येतो. 2) मात्र ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते त्यांना हे तेल लावल्यानं चुरचुरतं. म्हणून त्यांनी हे न वापरता इतर उपाय करावा. आणि ज्यांना चालतं त्यांनी दोन मोठे चमचे पाणी घ्यावं. त्यात या तेलाचे दोन थेंब मिसळावे. कापसाच्या बोळ्यानं ते पाणी काखेत लावावं. 3) ते डिओडरन्टसारखं वापरायचं असल्यास स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरावं. आणि पाण्याच्या मापानुसार तेलाचे थेंब मिसळावेत. आंघोळ झाल्यानंतर ते पाणी काखेत स्प्रे करावं.

 

गव्हाच्या तृणाचा रसगव्हाच्या तृणाचा रस चवीनं अगदीच उग्र असतो. पण हा रस नियमित सेवन केल्यानं शरीराची दुर्गंधी जाते. सुरूवात करताना थोडा थोडा तृणरस घ्यावा. एक कप पाण्यात गव्हाचा तृणरस मिसळून ते पाणी रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी घ्यावा.टोमॅटोचा रसटोमॅटोतही अ‍ॅण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. आयुर्वेदातही टोमॅटोच्या रसाचा उपयोग शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करता येतो असं म्हटलं आहे. अनेक वनौषधी तज्ञ्ज्ञांच्या मते टोमॅटोचा रस दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास शरीराला उत्तम फायदा होतो. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी टोमॅटो वापरताना 8- 10 टोमॅटो घ्यावेत. ते सोलून त्याचा गर काढावा. गरातून रस काढून तो एक बादलीभर पाण्यात मिसळावा. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी. शरीराला दुर्गंधी येत नाही.

 

  

 

काय खावं प्यावं आणि काय घालावं?दुर्गंधी शरीरातून येते तेव्हा केवळ बाह्य उपचार करून भागत नाही तर आपण काय खातो पितो याकडे लक्ष देवून त्याबाबतचे नियम पाळणंही गरजेचं आहे. तसेच आपण कपडे बूट कसे घालतो, शरीरस्वच्छतेच्या आपल्या सवयी काय आहेत याकडे लक्ष देवून त्यात बदल करणंही आवश्यक आहे.1 ) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही शरीरास दुर्गंधी येत नाही. 2) आहारात प्रथिनं, कडधान्यं, तंतूमय पदार्थ, आरोग्यदायी फॅटस, ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या यांचा समावेश करावा. 3) पचण्यास अवघड पदार्थ कमी खावेत. किंवा खाऊच नये. हे पदार्थ शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात. 4) मैदायुक्त पदार्थ, रिफाइन्ड साखर खाऊ नये. प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाऊ नये. 5) अतिमसालेदार ( कांदा, लसूण) जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.6) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी चहा कॉफीचं प्रमाण आटोक्यात ठेवावं. शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावं.7) पुदिना, कोथिंबीर, पार्सली, ओरिगॅनो या वनस्पतींचा समावेश पदार्थात करावा. 8 ) बडीशेप चावून खावी.9) रोज आंघोळ करावी. आंघोळीचा साबण उग्र नसावा. साबण जास्त लावू नये. नैसर्गिक तत्वांचा उपयोग केलेला सौम्य साबण आंघोळीसाठी वापरावा.10) न धुतलेले कपडे वापरू नये.11) घट्ट बूट घालू नये. जास्त वेळ बूट घालू नये. बुटांऐवजी सॅण्डल्स वापराव्यात. 12) काखेतले केस नियमिपणे काढून टाकावेत. 13) राग आणि ताण नियंत्रणात ठेवावा. या दोन गोष्टींमुळेही जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीरास दुर्गंधी येते. 14) गुदमरवणारे घट्ट कपडे न वापरता सैल कपडे वापरावेत.