शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

उभं राहून पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:40 IST

How To Drink Water: आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

How To Drink Water: तुम्ही नेहमीच घरातील वयोवृद्धांकडून ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. पण सामान्य बाब समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कुणी सांगितलेलं अचानक आठवलं तरी आपण बसून पाणी पित नाही. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण हे उगाच सांगितलं जात नाही, त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

किडनीची समस्या

उभं राहून पाणी पिणं आपल्या किडनीसाठी नुकसानकारक आहे. कारण उभं राहून पाणी पिलात तर ते ब्लड सेल्सपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि रक्तात विषारी पदार्थ वाढतात. किडनी रक्तातील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी लघवी तयार करते. जास्त अशुद्धी असल्याने किडनीचं काम वाढतं. त्यामुळे किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

पचनक्रिया प्रभावित होते

उभं राहून पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचतं. याने ग्रासनळीत समस्या होऊ शकते. अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत राहते. याने पचनासंबंधी समस्या होत नाहीत.

श्वसनावर वाईट परिणाम

उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या अन्ननलिकेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या श्वासनलिकेत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही. त्यामुळे श्वसन तंत्र आणि फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. याने हार्ट प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता असते.

संधीवाताची समस्या

उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्याचं प्रेशर पोटाच्याही खाली जाऊन थांबतं. ज्यामुळे हाडं आणि जॉइंट्सवर वाईट परिणाम होतो. सोबतच हाडे कमजोर होणं सुरू होतं. अशात कमजोर हाडांमुळे संधिवातसारखी समस्या होण्याचीही शक्यता असते.

बसून का प्यावं पाणी?

पाणी पिण्यासाठी बसण्याची पोजिशन सर्वात योग्य आहे. अशाप्रकारे पाणी प्यायलात तर पचन योग्यप्रकारे होतं. जेव्हा कुणी बसून पाणी पितं तेव्हा ते आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचतं. पाणी कोशिकांपर्यंत पोहोचून टॉक्सिन शरीरातून बाहेर काढतं. तसेच पाण्याचं अवशोषण चांगल्याप्रकारे झालं तर रक्तही साफ होतं. शरीर फीट राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य