शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थंडीत दही खावं की टाळावं?; आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतं बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:30 IST

उन्हाळ्यात दही खायची सवय झालेली असताना अचानक दही खाणं सोडायचं तसं अवघडच. तरी थंडीत दह्याचे सेवन घातक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

ऋतू बदलला की आहारात बदल करणे हे आलेच. थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे रोजच्या जेवणातील काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. ताज्या ताज्या भाज्या आणि गरम पदार्थ थंडीत खायला मजा येते. मात्र काही पदार्थ टाळावेही लागतात. जसे की दही. उन्हाळ्यात दही खायची सवय झालेली असताना अचानक दही खाणं सोडायचं तसं अवघडच. तरी थंडीत दह्याचे सेवन घातक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. आधीच वातावरण थंड आणि त्यात दही खाल्ले तर घसा खराब होण्याची आणि परिणामी सर्दी होण्याची शक्यता असते.दही खाण्याबाबत आयुर्वेदाचा सल्ला काय?

आयुर्वेदात सांगितले आहे की थंडीत दही खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे. दही मूळत: थंड असते ज्यामुळे सर्दी आणि इतर आजार उद्भवू शकतात. जर आधीच सर्दी असेल तर दह्यामुळे आणखी गंभीर आजार होणे स्वाभाविक आहे. जर नवीन आजारांना आमंत्रण द्यायचे नसेल तर काही महिने दह्यापासून दूर राहिलेले बरे.महत्वाचे म्हणजे घशाशी असलेला कफ दही खाल्ल्याने आणखीनच वाढण्याची शक्यता असते. ज्यांना दमा आहे त्यांनी सुद्धा दह्याचे सेवन करू नये अशी माहिती वैद्य परीक्षित शेवडे यांनी दिली.विज्ञान सांगते दही खाण्याचे फायदे

याउलट विज्ञानात मात्र काही प्रमाणात दह्याचे सेवन चालेल असा सल्ला दिला आहे. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियमचे प्रणाम अधिक असते. तसेच दह्यात बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.दुपारच्या जेवणात काही प्रमाणात दही खाणे उत्तमच मात्र सर्दी आणि कफचा त्रास असल्यास दही टाळणे योग्य. 

याचा अर्थ थंडीत आपली तब्येत बघूनच दही खायचे की नाही हे ठरवा. दही कितीही आवडत असले तरी आजाराला निमंत्रण देऊ नका एवढेच.

टॅग्स :Ayurvedic Home Remediesघरगुती उपाय