शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

थंडीत दही खावं की टाळावं?; आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतं बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:30 IST

उन्हाळ्यात दही खायची सवय झालेली असताना अचानक दही खाणं सोडायचं तसं अवघडच. तरी थंडीत दह्याचे सेवन घातक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

ऋतू बदलला की आहारात बदल करणे हे आलेच. थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे रोजच्या जेवणातील काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. ताज्या ताज्या भाज्या आणि गरम पदार्थ थंडीत खायला मजा येते. मात्र काही पदार्थ टाळावेही लागतात. जसे की दही. उन्हाळ्यात दही खायची सवय झालेली असताना अचानक दही खाणं सोडायचं तसं अवघडच. तरी थंडीत दह्याचे सेवन घातक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. आधीच वातावरण थंड आणि त्यात दही खाल्ले तर घसा खराब होण्याची आणि परिणामी सर्दी होण्याची शक्यता असते.दही खाण्याबाबत आयुर्वेदाचा सल्ला काय?

आयुर्वेदात सांगितले आहे की थंडीत दही खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे. दही मूळत: थंड असते ज्यामुळे सर्दी आणि इतर आजार उद्भवू शकतात. जर आधीच सर्दी असेल तर दह्यामुळे आणखी गंभीर आजार होणे स्वाभाविक आहे. जर नवीन आजारांना आमंत्रण द्यायचे नसेल तर काही महिने दह्यापासून दूर राहिलेले बरे.महत्वाचे म्हणजे घशाशी असलेला कफ दही खाल्ल्याने आणखीनच वाढण्याची शक्यता असते. ज्यांना दमा आहे त्यांनी सुद्धा दह्याचे सेवन करू नये अशी माहिती वैद्य परीक्षित शेवडे यांनी दिली.विज्ञान सांगते दही खाण्याचे फायदे

याउलट विज्ञानात मात्र काही प्रमाणात दह्याचे सेवन चालेल असा सल्ला दिला आहे. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियमचे प्रणाम अधिक असते. तसेच दह्यात बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.दुपारच्या जेवणात काही प्रमाणात दही खाणे उत्तमच मात्र सर्दी आणि कफचा त्रास असल्यास दही टाळणे योग्य. 

याचा अर्थ थंडीत आपली तब्येत बघूनच दही खायचे की नाही हे ठरवा. दही कितीही आवडत असले तरी आजाराला निमंत्रण देऊ नका एवढेच.

टॅग्स :Ayurvedic Home Remediesघरगुती उपाय