शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:31 IST

शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे.

(Image Credit : NewsClick)

अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. सोबतच या धुरामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या संबंधित आजारांचा धोकाही अनेक पटीने वाढला आहे. 

५ वर्षांपेक्षा लहान लहान मुलांना ARI चा धोका

रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर आणि याने होणाऱ्या प्रदूषणाने प्रभावित क्षेत्रात राहणारे लोक खासकरून ५ वर्षाखालील लहान मुलं-मुलींमध्ये या धुरामुळे एक्यूट रेस्पिरेट्री इन्फेक्शन(ARI) चा धोका अधिक वाढला आहे. हा रिसर्च यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतात शेतातील कचरा जाळल्यावर आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबाबत पहिल्यांदाच अशाप्रकारची माहिती समोर आली आहे. 

कसा केला रिसर्च? 

अभ्यासकांनी दावा केला आहे की, शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे साधारण २१ हजार कोटी रूपये नुकसानाच्या जाळ्यात पंजाब, हरयाणा आणि दिल्ली आहे. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक वयोगटातील साधारण २ लाख ५० हजार लोकांच्या आरोग्यासंबंधी डेटा आणि नासाच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतात लावण्यात आलेल्या आगीच्या घटनांचे फोटो या आधारावर हा रिसर्च करण्यात आला. 

आणि रूग्णांची संख्या वाढू लागते

या रिसर्चमध्ये हे सांगण्यात आले आहे की, जेव्हा  हरयाणा पंजाबमध्ये शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यास सुरूवात होते, रुग्णालयात ARI ची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागते. तसेच या रिपोर्टमध्ये फटाके, गाड्या इत्यादींपासून होणाऱ्या प्रदूषणाचेही देखील उल्लेख करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  हिवाळ्यात शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यामुळे काही दिवस दिल्लीमध्ये Pm म्हणजेच पर्टिक्यूलेट मॅटरचा स्तर WHO च्या मानकांपेक्षा २० टक्के अधिक वाढतो. 

यावर उपाय काय?

क्रॉप बर्निंग म्हणजेच शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्याच्या प्रक्रियेला पर्याय शोधण्यासाठी उपाय तर आहेत. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळणे बंद केले तर याने केवळ पैशांचीच बचत होईल असे नाही तर उत्तर भारतात अकाली मृत्यू आणि अपंगता यांची आकडेवारीही कमी करता येईल.  

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सNew Delhiनवी दिल्लीPunjabपंजाब