शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:31 IST

शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे.

(Image Credit : NewsClick)

अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. सोबतच या धुरामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या संबंधित आजारांचा धोकाही अनेक पटीने वाढला आहे. 

५ वर्षांपेक्षा लहान लहान मुलांना ARI चा धोका

रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर आणि याने होणाऱ्या प्रदूषणाने प्रभावित क्षेत्रात राहणारे लोक खासकरून ५ वर्षाखालील लहान मुलं-मुलींमध्ये या धुरामुळे एक्यूट रेस्पिरेट्री इन्फेक्शन(ARI) चा धोका अधिक वाढला आहे. हा रिसर्च यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतात शेतातील कचरा जाळल्यावर आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबाबत पहिल्यांदाच अशाप्रकारची माहिती समोर आली आहे. 

कसा केला रिसर्च? 

अभ्यासकांनी दावा केला आहे की, शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे साधारण २१ हजार कोटी रूपये नुकसानाच्या जाळ्यात पंजाब, हरयाणा आणि दिल्ली आहे. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक वयोगटातील साधारण २ लाख ५० हजार लोकांच्या आरोग्यासंबंधी डेटा आणि नासाच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतात लावण्यात आलेल्या आगीच्या घटनांचे फोटो या आधारावर हा रिसर्च करण्यात आला. 

आणि रूग्णांची संख्या वाढू लागते

या रिसर्चमध्ये हे सांगण्यात आले आहे की, जेव्हा  हरयाणा पंजाबमध्ये शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यास सुरूवात होते, रुग्णालयात ARI ची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागते. तसेच या रिपोर्टमध्ये फटाके, गाड्या इत्यादींपासून होणाऱ्या प्रदूषणाचेही देखील उल्लेख करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  हिवाळ्यात शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यामुळे काही दिवस दिल्लीमध्ये Pm म्हणजेच पर्टिक्यूलेट मॅटरचा स्तर WHO च्या मानकांपेक्षा २० टक्के अधिक वाढतो. 

यावर उपाय काय?

क्रॉप बर्निंग म्हणजेच शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्याच्या प्रक्रियेला पर्याय शोधण्यासाठी उपाय तर आहेत. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळणे बंद केले तर याने केवळ पैशांचीच बचत होईल असे नाही तर उत्तर भारतात अकाली मृत्यू आणि अपंगता यांची आकडेवारीही कमी करता येईल.  

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सNew Delhiनवी दिल्लीPunjabपंजाब