शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:31 IST

शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे.

(Image Credit : NewsClick)

अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. सोबतच या धुरामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या संबंधित आजारांचा धोकाही अनेक पटीने वाढला आहे. 

५ वर्षांपेक्षा लहान लहान मुलांना ARI चा धोका

रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर आणि याने होणाऱ्या प्रदूषणाने प्रभावित क्षेत्रात राहणारे लोक खासकरून ५ वर्षाखालील लहान मुलं-मुलींमध्ये या धुरामुळे एक्यूट रेस्पिरेट्री इन्फेक्शन(ARI) चा धोका अधिक वाढला आहे. हा रिसर्च यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतात शेतातील कचरा जाळल्यावर आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबाबत पहिल्यांदाच अशाप्रकारची माहिती समोर आली आहे. 

कसा केला रिसर्च? 

अभ्यासकांनी दावा केला आहे की, शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे साधारण २१ हजार कोटी रूपये नुकसानाच्या जाळ्यात पंजाब, हरयाणा आणि दिल्ली आहे. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक वयोगटातील साधारण २ लाख ५० हजार लोकांच्या आरोग्यासंबंधी डेटा आणि नासाच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतात लावण्यात आलेल्या आगीच्या घटनांचे फोटो या आधारावर हा रिसर्च करण्यात आला. 

आणि रूग्णांची संख्या वाढू लागते

या रिसर्चमध्ये हे सांगण्यात आले आहे की, जेव्हा  हरयाणा पंजाबमध्ये शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यास सुरूवात होते, रुग्णालयात ARI ची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागते. तसेच या रिपोर्टमध्ये फटाके, गाड्या इत्यादींपासून होणाऱ्या प्रदूषणाचेही देखील उल्लेख करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  हिवाळ्यात शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यामुळे काही दिवस दिल्लीमध्ये Pm म्हणजेच पर्टिक्यूलेट मॅटरचा स्तर WHO च्या मानकांपेक्षा २० टक्के अधिक वाढतो. 

यावर उपाय काय?

क्रॉप बर्निंग म्हणजेच शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्याच्या प्रक्रियेला पर्याय शोधण्यासाठी उपाय तर आहेत. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळणे बंद केले तर याने केवळ पैशांचीच बचत होईल असे नाही तर उत्तर भारतात अकाली मृत्यू आणि अपंगता यांची आकडेवारीही कमी करता येईल.  

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सNew Delhiनवी दिल्लीPunjabपंजाब