शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पावसाळी ‘पोटदुखी’  असे करा उपाय; आजार टाळायचे असतील तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 06:26 IST

अनेक वेळा आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये ई-कोलाय नावाचे जिवाणू पोटात आढळून आल्याचे दिसून येत असते

पावसाळा म्हटला की, आल्हाददायक प्रसन्न वातावरण, चोहोबाजूला निसर्गाचे नवे रूप असे काहीसे चित्र आपल्यासमोर उभे राहते. मात्र, पाऊस काही आजारही सोबत घेऊन येतो. त्याला सर्वसाधारण भाषेत आपण पावसाळी आजार असे म्हणतो. कारण पावसात या आजाराचे प्रमाण वाढलेले आढळून येते. पावसाळ्यात विशेष करून डासांशी संबंधित आजारांमध्ये ज्या प्रमाणात वाढ होते तशीच पोटाच्या विकारात मोठ्या संख्येने वाढ होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रो आजाराचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते.

हा आजार उघड्यावरचे खाद्यपदार्थ आणि दूषित पाण्यातून झालेला संसर्ग यामुळे होतो. पावसाळ्यात भेडसावणारा हा आजार कुणाला झाला तर त्या रुग्णाची अवस्था बिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी पोटदुखीपासून वेळीच सावध राहण्याची गरज आहे.पोटाच्या विकारांमध्ये विशेष करून अपचन होणे, जुलाब, उलट्या, मळमळ होणे, पोटफुगी, तसेच खाण्याची इच्छा न होणे यासारखे प्रकार पावसाळ्यात होतात. त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये किंवा कोणतेही रस्त्यावरचे ज्यूस पिऊ नये. कारण त्यात दूषित पाणी असल्यास त्यामधील सूक्ष्म जंतू पोटात जाऊन पचनक्रियेत बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो गरम पदार्थ खावेत, थंड पदार्थ टाळावेत. रस्त्यावर, उघड्यावर मिळणारे हिरवी चटणी लावलेले सँडविच, पाणीपुरी यासारखे खाणे टाळावे. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. 

अनेक वेळा आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये ई-कोलाय नावाचे जिवाणू पोटात आढळून आल्याचे दिसून येत असते. दूषित पाण्यामध्ये हा जिवाणू आढळून येत असतो. या जिवाणूने पोटात प्रवेश केल्यानंतर पोटाचे कार्य बिघडवून विविध पोटविकारांना आमंत्रण देत असतो. अशा विकाराच्या आजारांवरील उपचारासाठी काही काळ अँटिबायोटिक्स घ्यावी लागतात. पावसाळ्यात कावीळ होण्याची शक्यता असते. त्यामध्ये हिपेटायटिस ए आणि ई ही कावीळ दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे होते.

पावसाळी आजार टाळायचे असतील तर...वॉशरूममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. जेवण योग्य पद्धतीने शिजवून घ्यावे आणि चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. घरचे ताजे अन्न खावे. संतुलित आहार घ्यावा. व्यायाम करावा, सोबत योग केला पाहिजे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.तणावाचा परिणामसुद्धा शरीरातील पचनसंस्थेवर होत असतो. पोटविकाराच्या व्याधी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधी घेऊ नये.

डॉ. अमित मायदेव, चेअरमन, इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोसायन्स, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स