शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडीला सुरुवात, हिवाळ्यातील आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:59 IST

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे.

- रीना चव्हाणवातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे. आरोग्याचा विचार करता ऋतू कोणताही असला तरी शरीराला पाण्याची नेहमीच गरज असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा आणि पावसाळ्यात बाहेरील वातावरण थंड असल्याने तहान कमी लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो; पण त्यामुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यासाठी दररोज गरजेएवढे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळेच हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाण्याऐवजी तुम्ही आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असणाºया पदार्थांचे सेवन करू शकता. जेणेकरून शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्याबरोबर शारीरिक स्वास्थ टिकून राहील.दहीसर्दी, खोकला, ताप आदी आजार या हंगामात डोके वर काढतात. त्यामुळे हिवाळा आहे दही खाऊ नका. उन्हाळ्यात दही खाणे चांगले, असे बरेच जण सांगतात; पण हिवाळ्यात सकाळच्या नाष्ट्यात दही किंवा लस्सी घेतल्याने तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते, कारण त्यात ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. तसेच यातील कॅल्शिअममुळे हाडेसुद्धा मजबूत होतात.पालकपालकमध्ये प्रोटीन, विटॅमीन, आयर्नबरोबर पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात याचा नक्की समावेश असावा. पालक भाजी किंवा सूप घेतल्याने शरीरातील पाण्याची कमरता दूर होईल.तांदूळतांदूळ वा भात आहारातील मुख्य घटक आहे. कारण त्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही, मग कोणताही ऋतू असो. शिजवलेल्या तांदळात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कार्बोहायड्रेट सारखे महत्त्वपूर्ण घटक असतात.ब्रोकोलीपोषक घटनांबरोबरच ब्रोकोलीमध्ये ८९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ब्रोकोली नुसती उकडून खाल्ली, तरी आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर असते.फळसफरचंदामुळे ८९ टक्के पाणी असून फायबर, विटॅमीन सी, कॅल्शिअम बरोबर अन्य पोषक घटकांचा यात समावेश असतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. संत्र आणि मोसंबी यांच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्या, तरी पोषक तत्त्वांबरोबर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अननस, दाक्षे, ब्ल्यू बेरी, स्टॉबेरी, कलिंगड यांच्या सेवनानेही हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण होईल.लिंबूलिंबामध्ये विटॅमीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळेच आहारात सलाड, फळांबरोबर लिंबाचा समावेश गरजेचा.सलाडगाजर, काकडी, मुळा, टोमॅटो यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात यांचा नेहमी समावेश असावा.

टॅग्स :Healthआरोग्य