शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडीला सुरुवात, हिवाळ्यातील आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:59 IST

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे.

- रीना चव्हाणवातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे. आरोग्याचा विचार करता ऋतू कोणताही असला तरी शरीराला पाण्याची नेहमीच गरज असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा आणि पावसाळ्यात बाहेरील वातावरण थंड असल्याने तहान कमी लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो; पण त्यामुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यासाठी दररोज गरजेएवढे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळेच हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाण्याऐवजी तुम्ही आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असणाºया पदार्थांचे सेवन करू शकता. जेणेकरून शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्याबरोबर शारीरिक स्वास्थ टिकून राहील.दहीसर्दी, खोकला, ताप आदी आजार या हंगामात डोके वर काढतात. त्यामुळे हिवाळा आहे दही खाऊ नका. उन्हाळ्यात दही खाणे चांगले, असे बरेच जण सांगतात; पण हिवाळ्यात सकाळच्या नाष्ट्यात दही किंवा लस्सी घेतल्याने तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते, कारण त्यात ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. तसेच यातील कॅल्शिअममुळे हाडेसुद्धा मजबूत होतात.पालकपालकमध्ये प्रोटीन, विटॅमीन, आयर्नबरोबर पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात याचा नक्की समावेश असावा. पालक भाजी किंवा सूप घेतल्याने शरीरातील पाण्याची कमरता दूर होईल.तांदूळतांदूळ वा भात आहारातील मुख्य घटक आहे. कारण त्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही, मग कोणताही ऋतू असो. शिजवलेल्या तांदळात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कार्बोहायड्रेट सारखे महत्त्वपूर्ण घटक असतात.ब्रोकोलीपोषक घटनांबरोबरच ब्रोकोलीमध्ये ८९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ब्रोकोली नुसती उकडून खाल्ली, तरी आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर असते.फळसफरचंदामुळे ८९ टक्के पाणी असून फायबर, विटॅमीन सी, कॅल्शिअम बरोबर अन्य पोषक घटकांचा यात समावेश असतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. संत्र आणि मोसंबी यांच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्या, तरी पोषक तत्त्वांबरोबर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अननस, दाक्षे, ब्ल्यू बेरी, स्टॉबेरी, कलिंगड यांच्या सेवनानेही हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण होईल.लिंबूलिंबामध्ये विटॅमीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळेच आहारात सलाड, फळांबरोबर लिंबाचा समावेश गरजेचा.सलाडगाजर, काकडी, मुळा, टोमॅटो यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात यांचा नेहमी समावेश असावा.

टॅग्स :Healthआरोग्य