शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

​उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 14:46 IST

फेब्रूवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीस, हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. या काळात वातावरणाचे तपमान हळूहळू वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि आपल्या अंगाची तलखी सुरू होते.

फेब्रूवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीस, हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. या काळात वातावरणाचे तपमान हळूहळू वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि आपल्या अंगाची तलखी सुरू होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपयर्ंत सगळ्यांनाच या उन्हाळ्याचा त्रस होत असतो. या काळात अनेक प्रकारचे आजार आणि विकार उद्भवू शकतात, जसे शरीरातील पाणी व क्षार कमी होणो, संसर्गजन्य आजार, डोळ्यांचे विकार, तसेच मूत्रमार्गाचे, पोटाचे, त्वचेचे आदी विकार उद्भवतात. * उन्हाळ्यात कडक उन्हापासून स्वंरक्षण करण्यासाठी टोपी, रूमाल, दुपट्टा, गॉगल आदी वस्तू वापराव्यात, शिवाय उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबुजाचा रस, आइसक्रिम, कैरीचे पन्हे, कोकम शरबत यासारखी शरीरास थंडावा देणारी द्रव्य आदींचे सेवन करावे. * अति उन्हामूळे शरीरात शुष्कता येत असल्याने शरीरातील पाणी व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी खरबुज, टरबुज यासारख्या थंडावा देणा:या फळांचे सेवन करणो हितकारक ठरते.  * उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी बाहेर पडायचे अगोदर आपापली आवड व सोयीनुसार टोपी, पांढरा दुपट्टा, रूमाल व उन्हाचा गॉगल घेवून उन्हापासून बचाव निश्चित करावा. उन्हात बाहेर निघण्या अगोदर एसी, कुलरची थंड हवा घेणो टाळावे. तसेच बहुतांश काम सकाळी व संध्याकाळी आटोपून घेतलेली बरी.  * उन्हात भरपूर फिरल्यानंतर थंड पेये पिवून लगेच परत उन्हात जाणो टाळावे. दररोज उन्हात फिरणो आवश्यक असणा:यांनी याची विशेष दक्षता घ्यावी. उन्हात दिवसभर किवा जास्त वेळ फिरायचे असल्यास प्रत्येक अध्र्या तासानंतर सावलीत थांबुन थंड पाणी प्यावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होवून उन लागत नाही. * ऊन्हाळ्यात बाजारातील पेयांपेक्षा घरगुती पदार्थांचे सेवन हितकारक असते. उन्हाळ्यात आजारी पडू नये यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ, पेय घेणो टाळावे. उन्हाळ्यात लिंबु शरबत, कैरीचे पन्हे, कोकम शरबत, अननस व मोसंबीचा रस, आइस्क्रिम यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारे पदार्थ घरात ठेवणो आवश्यक आहे.* उन्हात फिरल्यावर उलट्या, जीव मळमळ करणो, चक्कर येणो यासारखे लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यावेत. उन्हाळ्यात उन लागून आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठी उपाशी पोटी घराबाहेर निघू नये. * उन्हाळ्यात जेवणांत कांद्याचा वापर करावा. ग्रामीण भागात उन लागु नये यासाठी लोक पगडी, टोपी किवा शर्टच्या खिशात कांदा ठेवतात. उन लागल्यास घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस काढूण हाता-पायाचे तळव्यांवर लावतात. उन्हाळ्यातील पेहरावही ऋतुमानानुसार बदलत असतो. * हिवाळ्यातील गरम कपडे पेटीबंद होवून सुंदर दिसण्या सोबतच उन परावर्तीत करणारे व हवा खेळती ठेवून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे कपडे घालावे. उन्हाळा म्हणजे घामाचा वैताग. उन्हाळ्यात थंड राहणारे कॉटनचे कपडे घालावे. पेहराव शेरवाणी, कुर्ता-पायजामा, शर्ट-पँट ऑकेजन नुसार कोणताही, फक्त तो शरीरास सहायक असायला पाहिजे. * उन्हाच्या तीव्र झोतामुळे डोळ्यांची जळजळ होवून नये यासाठी उन्हाचा गॉगल वापरणो फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात बर्फ गोळा, कुल्फी, आइसकांडी, खाण्याचा मोह बहुतेकांना आवरत नाही आणि येथेच फसगत होते. बर्फ बनविण्याची प्रक्रिया, व सार्वजनिक ठिकाणची पेये, बनवितांना वापरण्यात येणारे पाणी, व एकंदरीत स्वच्छता याचा तालमेळ नसतो. यातून उन्हाळ्यात पसरणा:या रोगांच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.