शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

निर्मात्यांनी प्रोफेशनल वागण्याची गरज- अनिकेत विश्वासराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:06 IST

   पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा , आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने मराठी चित्रपटसृष्टीत कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले.

           पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, फक्त लढ म्हणा , आंधळी कोशिंबीर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, यासारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनय साकारून अनिकेत विश्वासरावने मराठी चित्रपटसृष्टीत कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. सुधिर मिश्रा यांच्या चमेली या चित्रपटातून डेब्यु करणाºया या अभिनेत्याने  पाहता पाहता रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची मोहोर उमटविली. तरूणींच्या गळ््यातील ताईत बनलेला चॉकलेट बॉय  म्हणजेच अनिकेत विश्वासराव मराठी इंडस्ट्रीमध्ये काय बदल घडायला हवेत  यावर सेलिब्रीटी  रिर्पोटरच्या माध्यमातून  संवाद साधत आहेत.                                                 आजकाल निर्माते केवळ हौस म्हणून चित्रपट बनवित आहेत. ही अत्यंत चुकिची बाब आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळे चांगले विषय येण्याची गरज आहे. त्यामुळे फक्त आवड म्हणून चित्रपट काढणे आणि  त्याच दृष्टीने सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन निर्मात्यांनी बदलायला पाहिजे. चित्रपटाकडे केवळ मनी मेकिंग बिझनेस म्हणून न पाहता प्रोफेशनली पाहायला पाहिजे.कोणताही सिनेमा चांगला दर्जेदार असणे गरजेचे असते. चांगल्या चित्रपटांना सपोर्ट करण्याची गरज आहे. पोस्टर गर्लचा विषय चांगला होता. तो चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या समोर प्रेझेंट झाला म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे सिनेमाच्या बजेट पेक्षा सिनेमाची कुवत पाहिली पाहिजे. आज कट्यार, नटसम्राट हे चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत त्यामूळे अशा सिनेमांना नक्कीच  अ‍ॅप्रिशिएट करायला पाहिजेतकलाकार चित्रपटांमध्ये काम करताना अतिशय मेहनत घेतात. जीव ओतून अभिनय करतात. परंतू काही वेळेस असे होते की, प्रोड्यूसर अचानक दोन - तीन वर्षात तो सिनेमा रिलिज करतात. अश्या प्रकारचे अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लागतात आणि जातात. त्याचा फारसा इम्पॅक्ट राहत नाहीत. त्यामूळे निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपट हा माझा सिनेमा म्हणूनच पाहिला पाहिजे. त्यांनी प्रोफेशनल अ‍ॅप्रोच ठेवला पाहिजे.                                   चित्रपटाची निमीर्ती करताना त्यामागे असंख्य जणांचे हात लागले असतात. त्यामुळे तो चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सर्व गोष्टींचे योग्य रितीने प्लॅनिंग करण्याची आवश्यकता असते. सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन. निर्मात्यांनी योग्य रितीने सर्व माध्यमांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यासाठी स्ट्रॅटॅजी प्लॅन करण्याची आवश्यकता असते. कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील वेळ देतात परंतू वेळेत प्रमोशन सुरू झाले नाही तर कलाकारांच्या पुढील सिनेमाच्या तारखा त्यावेळी क्लॅश होतात. त्यावेळी कलाकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बॉलीवूड कडून मराठी चित्रपटसृष्टीने कामाचे  नियोजन  कसे करायचे हे शिकले पाहिजे. निर्मात्यांनी   चित्रपटांना ३०-४० लाख रूपये अनुदान मिळते म्हणून  सिनेमा बनवणे  हे कितपत योग्य आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. निर्मात्यांनी पैसा खर्च केला तर नक्कीच चांगला चित्रपट बनू शकेल. ६० ते ८० लाख रूपयांमध्ये आता चित्रपट बनत नाहीत. जास्त पैसा खर्च न करणाºया निर्मात्यांनी रिटन येणाºया पैशांची अपेक्षा करू नये.  खरेदी करताना  जो प्रोडक्ट चांगला आहे प्रोडक्ट आपण खरेदी करतो. त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराला चांगलेच काम करावे लागते. आपले प्रेक्षक हे सुजाण आहेत. त्यांना आपण गंडवू शकत नाहीत.