शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:19 IST

पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो.

Parenting Tips For Monsoon : पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पावसाळ्यात हवेतून होणारे आणि दूषित अन्न आणि पाण्यातून होणारे आजार असे दोन प्रकार आहेत. विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू यासारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते. ठराविक आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटात दुखणे यांचा समावेश आहे. या दिवसांत आढळणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमधील निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डेंग्यू रोखण्यासाठी...

डेंग्यू-मलेरिया साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणं आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जार, फुलदाण्या, वॉटर कूलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाका आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा अन्यथा डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू- मलेरियासारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

तज्ज्ञ सांगतात...

१) पावसाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. सकस, नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

२) मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. शासनाने लागू केलेल्या लसीकरण कार्यक्रमातील वयोमानानुसार लहान मुलांचे सर्व लसीकरण होणे आवश्यक आहे त्यामुळे घरात तसेच परिसरात स्वच्छता राखा.

सर्दी-खोकला-

वातावरणात बदल झाल्यावर रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांच्या आरोग्यावर तत्काळ परिणाम होतो. अनेक मुलांना या काळात सर्दी-खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.

काय काळजी घ्याल?

१) उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळा : मुलांना उकळलेले पाणी द्या, बाहेरच्या अन्न पदार्थाचे सेवन टाळा, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

२) स्वच्छता राखा या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या आणि स्वच्छतेच्या सवयीकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

३) खेळून आल्यानंतर हातपाय धुणे, स्वच्छ खाणे, पाणी उकळून पिणे या सवयी जोपासायला हव्यात.

टायफॉइड, कावीळची भीती-

पावसाळ्यात बाहेरील टायफॉइड, कावीळची भीती पाणी पिणे तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यावर पोटदुखी, जुलाब, टायफॉइड, कावीळ यांसारख्या आजारांची शक्यता अधिक असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सParenting Tipsपालकत्वMonsoon and Diseasesपावसाळा आणि पावसाळी आजारपणLifestyleलाइफस्टाइल