शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:56 IST

फळांनी वजन कमी नाही, वाढूही शकतं..

ठळक मुद्देफळं जास्त खाल, तर त्यानं कॅलरीज वाढतील.वजन कमी होण्याऐवजी वाढेल.कोणती फळं, कोणत्या प्रमाणात खावीत याकडे लक्ष हवं.जास्त फळं खाल्लीत तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.

- मयूर पठाडेफळं आरोग्याला चांगलीच असतात, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच कुठल्याही आजारपणात डॉक्टर सल्ला देतात तो फळं खाण्याचा. तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नसेल, ते आटोक्यात ठेवायचं असेल तर फळं खाल्ल्यानं वाढत्या वजनाचा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. पण..पण हे झालं अर्धसत्य. फळं आरोग्याला चांगली आहेत म्हणून तुम्ही नुसती फळंच खात बसलात, तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल फळांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजची संख्या वाढत जाईल आणि त्यामुळे अर्थातच वजनही वाढेल.म्हणजे ज्या कारणासाठी फलाहार सुरू केला, तोच त्याच्या मुळावर उठला!योग्य प्रमाणात नियमित फलाहार करायला काहीच हरकत नाही, पण त्यासोबत भाज्या, प्रोटिन्स, आणि होल ग्रेन्स यांचाही आहारात समावेश असायला हवा.फळांमध्ये तुलनेनं कमी कॅलरीज असतात, हे खरं, पण सर्वच फळांसाठी ते लागू नाही. शिवाय आपण किती फळं खातो त्यावरही त्यातून किती कॅलरीज आपल्या शरीरात जातात ते अवलंबून आहे.ताज्या फळामध्ये साधारणपणे १५ ते २० कॅलरीज असतात, पण पण तेच मध्यम आकाराचं सफरचंद तुम्ही घेतलं तर त्यात शंभर कॅलरीज असतात. आरोग्यदायी आहाराच्या प्रयत्नात तुम्ही रोज तीन सफरचंदं खाल्लीत तर तीनशे कॅलरीज झालेत की!ड्रायफ्रुट्समध्ये तर आणखीच जास्त कॅलरीज असतात.आपल्या शरीर आणि मनाचं योग्य संतुलन राखण्यासाठी रोज आपण फळं खाणं गरजेचंच आहे, त्यातून निश्चितच अपेक्षित परिणामही दिसून येईल, पण त्याचा अतिरेक झाला, तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.कोणत्या फळांनी वजन वाढेल?केळी, द्राक्षे, खजूर, ड्रायफ्रूटस, पेरू, आंबा, चिकू यासारखी फळं जास्त खाल्ली तर शरीरातील कॅलरीज वाढू शकतात.वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काय खावं?फळांच्या सोबत भाज्याही रोजच्या आहारात असल्या पाहिजेत. पालक, भोपळा, मुळा, काकडी, मशरूम्स.. यासारखा आहारही आपल्या भोजनात नियमित हवा.