शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:56 IST

फळांनी वजन कमी नाही, वाढूही शकतं..

ठळक मुद्देफळं जास्त खाल, तर त्यानं कॅलरीज वाढतील.वजन कमी होण्याऐवजी वाढेल.कोणती फळं, कोणत्या प्रमाणात खावीत याकडे लक्ष हवं.जास्त फळं खाल्लीत तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.

- मयूर पठाडेफळं आरोग्याला चांगलीच असतात, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच कुठल्याही आजारपणात डॉक्टर सल्ला देतात तो फळं खाण्याचा. तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नसेल, ते आटोक्यात ठेवायचं असेल तर फळं खाल्ल्यानं वाढत्या वजनाचा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. पण..पण हे झालं अर्धसत्य. फळं आरोग्याला चांगली आहेत म्हणून तुम्ही नुसती फळंच खात बसलात, तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल फळांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजची संख्या वाढत जाईल आणि त्यामुळे अर्थातच वजनही वाढेल.म्हणजे ज्या कारणासाठी फलाहार सुरू केला, तोच त्याच्या मुळावर उठला!योग्य प्रमाणात नियमित फलाहार करायला काहीच हरकत नाही, पण त्यासोबत भाज्या, प्रोटिन्स, आणि होल ग्रेन्स यांचाही आहारात समावेश असायला हवा.फळांमध्ये तुलनेनं कमी कॅलरीज असतात, हे खरं, पण सर्वच फळांसाठी ते लागू नाही. शिवाय आपण किती फळं खातो त्यावरही त्यातून किती कॅलरीज आपल्या शरीरात जातात ते अवलंबून आहे.ताज्या फळामध्ये साधारणपणे १५ ते २० कॅलरीज असतात, पण पण तेच मध्यम आकाराचं सफरचंद तुम्ही घेतलं तर त्यात शंभर कॅलरीज असतात. आरोग्यदायी आहाराच्या प्रयत्नात तुम्ही रोज तीन सफरचंदं खाल्लीत तर तीनशे कॅलरीज झालेत की!ड्रायफ्रुट्समध्ये तर आणखीच जास्त कॅलरीज असतात.आपल्या शरीर आणि मनाचं योग्य संतुलन राखण्यासाठी रोज आपण फळं खाणं गरजेचंच आहे, त्यातून निश्चितच अपेक्षित परिणामही दिसून येईल, पण त्याचा अतिरेक झाला, तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.कोणत्या फळांनी वजन वाढेल?केळी, द्राक्षे, खजूर, ड्रायफ्रूटस, पेरू, आंबा, चिकू यासारखी फळं जास्त खाल्ली तर शरीरातील कॅलरीज वाढू शकतात.वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काय खावं?फळांच्या सोबत भाज्याही रोजच्या आहारात असल्या पाहिजेत. पालक, भोपळा, मुळा, काकडी, मशरूम्स.. यासारखा आहारही आपल्या भोजनात नियमित हवा.