शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:56 IST

फळांनी वजन कमी नाही, वाढूही शकतं..

ठळक मुद्देफळं जास्त खाल, तर त्यानं कॅलरीज वाढतील.वजन कमी होण्याऐवजी वाढेल.कोणती फळं, कोणत्या प्रमाणात खावीत याकडे लक्ष हवं.जास्त फळं खाल्लीत तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.

- मयूर पठाडेफळं आरोग्याला चांगलीच असतात, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच कुठल्याही आजारपणात डॉक्टर सल्ला देतात तो फळं खाण्याचा. तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नसेल, ते आटोक्यात ठेवायचं असेल तर फळं खाल्ल्यानं वाढत्या वजनाचा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. पण..पण हे झालं अर्धसत्य. फळं आरोग्याला चांगली आहेत म्हणून तुम्ही नुसती फळंच खात बसलात, तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल फळांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजची संख्या वाढत जाईल आणि त्यामुळे अर्थातच वजनही वाढेल.म्हणजे ज्या कारणासाठी फलाहार सुरू केला, तोच त्याच्या मुळावर उठला!योग्य प्रमाणात नियमित फलाहार करायला काहीच हरकत नाही, पण त्यासोबत भाज्या, प्रोटिन्स, आणि होल ग्रेन्स यांचाही आहारात समावेश असायला हवा.फळांमध्ये तुलनेनं कमी कॅलरीज असतात, हे खरं, पण सर्वच फळांसाठी ते लागू नाही. शिवाय आपण किती फळं खातो त्यावरही त्यातून किती कॅलरीज आपल्या शरीरात जातात ते अवलंबून आहे.ताज्या फळामध्ये साधारणपणे १५ ते २० कॅलरीज असतात, पण पण तेच मध्यम आकाराचं सफरचंद तुम्ही घेतलं तर त्यात शंभर कॅलरीज असतात. आरोग्यदायी आहाराच्या प्रयत्नात तुम्ही रोज तीन सफरचंदं खाल्लीत तर तीनशे कॅलरीज झालेत की!ड्रायफ्रुट्समध्ये तर आणखीच जास्त कॅलरीज असतात.आपल्या शरीर आणि मनाचं योग्य संतुलन राखण्यासाठी रोज आपण फळं खाणं गरजेचंच आहे, त्यातून निश्चितच अपेक्षित परिणामही दिसून येईल, पण त्याचा अतिरेक झाला, तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.कोणत्या फळांनी वजन वाढेल?केळी, द्राक्षे, खजूर, ड्रायफ्रूटस, पेरू, आंबा, चिकू यासारखी फळं जास्त खाल्ली तर शरीरातील कॅलरीज वाढू शकतात.वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काय खावं?फळांच्या सोबत भाज्याही रोजच्या आहारात असल्या पाहिजेत. पालक, भोपळा, मुळा, काकडी, मशरूम्स.. यासारखा आहारही आपल्या भोजनात नियमित हवा.