शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हिरड्यांमधून येणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; वाचा हिरड्या निरोगी ठेवण्याचा सोपा उपाय

By manali.bagul | Updated: February 6, 2021 17:28 IST

Oral Health Tips in Marathi : जरी हिरड्यांतून रक्त बाहेर पडत असेल निरोगी राहण्यासाठी दात घासणे किंवा फ्लोसिंग करणे चांगले आहे.

व्हिटॅमिन सी च्या अभावांमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होतो असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे. नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन सर्वेक्षणातील आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना असे आढळले की रक्तातील  व्हिटॅमिन-सी पातळी कमी होते, त्यामुळे हिरड्यांचा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रेटिनल रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त होती.

या अभ्यासाचे  लेखक आणि वॉशिंग्टन स्कूल ऑफ डेंटिस्ट्री येथील ओरल हेल्थ विज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक फिलिप ह्यूगल म्हणतात की, ''हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि रेटिना हेमोरेजिंग मायक्रोव्हास्क्युलरच्या समस्येस सूचित करते म्हणून अभ्यासाचे निकाल महत्त्वपूर्ण आहेत.  ही कार्यप्रणाली मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांसह शरीराच्या लहान रक्तवाहिन्यांभोवती असते.

व्हिटॅमिन-सी प्लाझ्माच्या पातळीकडे लक्ष देऊन आणि काही घटकांची कमतरता दूर केल्यामुळे सूक्ष्म रक्तस्त्रावची समस्या संपूर्ण शरीरात कमी होऊ शकते. जरी हिरड्यांतून रक्त बाहेर पडत असेल निरोगी राहण्यासाठी दात घासणे किंवा फ्लोसिंग करणे चांगले आहे. यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

 लक्षणं

हिरड्यांच्या रक्तस्त्रावामुळे उद्भवत असलेल्या इतर लक्षणांमध्ये श्वासांचा घाणेरडा वास, सुस्तपणा, हिरड्यांना आलेली सूज, हिरड्या लाल किंवा जांभळ्या, सैल दात, तोंडाचा अल्सर यांचा समावेश आहे. त्याशिवाय हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याबरोबरच शरीरातील इतर प्रणालींशी संबंधित इतर लक्षणे देखील दिसू शकतात.

हाड आणि सांधेदुखी रक्ताच्या उलट्या, मानेतील मध्ये सूजलेल्या ग्रंथी (लिम्फॅडेनोपॅथी), भूक न लागणे, वजन कमी होणे, ताप, पाठदुखी, शरीराची कमकुवतपणा किंवा थकवा , झोपेच्या वेळी घाम येणे, नाकातून किंवा त्वचेतून रक्त येणे त्वचा पिवळसर होणे ही लक्षणं आहेत.

समस्या टाळण्यासाठी  कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी पुरेशा प्रमाणात आढळते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव झाल्यास, एक वाटी संत्राचा रस एक चिमूटभर जिरे पावडर आणि अर्धा चमचा साखर घालून प्या. काही दिवस सतत सेवन केल्यास त्रास कमी होतो आणि हिरड्यांची जळजळ देखील कमी होते.

लिंबू

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी असते जे हिरड्यासाठी चांगले असते. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. लिंबामध्ये आढळणारा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दात संसर्गास कारणीभूत ठरत नाही आणि एंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे हिरड्यांना सूज आणत नाही. हिरड्यांना रक्तस्त्राव झाल्यास आपल्या आहारात लिंबू घाला. आपल्याला हवे असल्यास, कोशिंबीरमध्ये लिंबाचा रस घालून सेवन करणं फायद्याचे ठरेल. कमी वयात सांधेदुखी अन् हाडं खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ गोष्टी, वेळीच जाणून घ्या

तोंडाच्या रोगांसाठी गाजर

पौष्टिक गाजरांमध्ये ए, डी, सी, बी 6 प्रथिने, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम इ. असते. गाजरचे औषधी गुणधर्म तोंडाच्या आजारांकरिता फायदेशीर ठरतात. गाजराची ताजी पाने चवल्याने हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो तेव्हा आराम मिळतो. या व्यतिरिक्त गाजरचा रस पिल्यास तोंडाचा अल्सर, हिरड्यांचा रक्तस्त्राव होण्यास आराम मिळतो. तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे  हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ

आवळा

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन-सी असते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याचे एक कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन-सीचा अभाव, ज्यामुळे हिरड्यांमध्ये सूज येणे आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने बॅक्टेरिया संक्रमणाशी लढण्याच्या गुणवत्ता वाढते आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते आणि शरीरातील व्हिटॅमिन-सी ची कमतरता दूर होते. 

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य