शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 12:03 IST

सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता...

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे अनेक बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. परिणामी अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या साधारण समस्या आहेत. अनेकदा या समस्या वातावरणातील बदलांमुळे होतात. हे इन्फेक्शन सामान्य असलं तरिही अनेक दिवस यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढचं नाहीतर यामुळे थकवाही जाणवतो. खरं तर पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया थैमान घालत असतात. अशातच सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता. 

आजारी पडण्याआधीच करा हा उपाय 

जास्तीत जास्त लोक आजारी पडल्यानंतरच वेगवेगळे उपाय करण्यासाठी तयार होतात. परंतु, जर तुम्ही वातावरणानुसार आधीच शरीर तयार केलं तर अनेक आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. जर तुम्ही आजारी पडण्याआधीच काही उपाय केले तर तुम्ही स्वतःला या समस्यांपासून दूर ठेवू शकता. तसेच आधीच उपाय केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून लढण्यासाठी शक्ती मिळते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय कराल? 

पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी एका अ‍ॅन्टी-वायरल डाएटची गरज असते. लसूण, कांदा, आलं, हळद यांसारखे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि मजबुत करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कांद्याचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या एका विशेष घरगुती उपायाबाबत सांगणार आहोत. 

कांदा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती 

कांदा जेवणाची चव वाढविण्यासाठी मदत करतो. परंतु, हा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या अनेक वायरल इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव करू शकता. त्यासाठी एक लहान कांदा घेऊन तो पातळ खापांमध्ये कापून घ्या. 

या खापा 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर हे मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करा. काही दिवसांपर्यंत नियमितपणे याचा वापर करा. सर्दी-खोकला यांपासून सुटका होण्यास मदत होईल. 

चव वाढविण्यासाठी यामध्ये तुम्ही मध एकत्र करू शकता. लक्षात ठेवा की, एका ठराविक प्रमाणात एकत्र करा. जास्त प्रमाणात मध टाकू नका. कांद्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट व्यतिरिक्त सल्फाइड, विटामिन आणि अ‍ॅन्टीव्हायरल गुणधर्म असतात. हे बंद नाक आणि सर्दी यांसारख्या समस्यांवर अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच घशातील टॉक्सिन्स दूर करण्यासाठीही मदत करतात. 

जर खोकल्यासोबत कफ झाला असेल तर काळी मिरी पावडर शुद्ध तूपासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. आल्याचे छोटे तुकडे करून घ्या आणि त्याचं मिठासोबत सेवन करा. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स