शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 12:03 IST

सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता...

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे अनेक बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. परिणामी अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या साधारण समस्या आहेत. अनेकदा या समस्या वातावरणातील बदलांमुळे होतात. हे इन्फेक्शन सामान्य असलं तरिही अनेक दिवस यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढचं नाहीतर यामुळे थकवाही जाणवतो. खरं तर पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया थैमान घालत असतात. अशातच सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता. 

आजारी पडण्याआधीच करा हा उपाय 

जास्तीत जास्त लोक आजारी पडल्यानंतरच वेगवेगळे उपाय करण्यासाठी तयार होतात. परंतु, जर तुम्ही वातावरणानुसार आधीच शरीर तयार केलं तर अनेक आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. जर तुम्ही आजारी पडण्याआधीच काही उपाय केले तर तुम्ही स्वतःला या समस्यांपासून दूर ठेवू शकता. तसेच आधीच उपाय केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून लढण्यासाठी शक्ती मिळते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय कराल? 

पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी एका अ‍ॅन्टी-वायरल डाएटची गरज असते. लसूण, कांदा, आलं, हळद यांसारखे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि मजबुत करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कांद्याचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या एका विशेष घरगुती उपायाबाबत सांगणार आहोत. 

कांदा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती 

कांदा जेवणाची चव वाढविण्यासाठी मदत करतो. परंतु, हा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या अनेक वायरल इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव करू शकता. त्यासाठी एक लहान कांदा घेऊन तो पातळ खापांमध्ये कापून घ्या. 

या खापा 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर हे मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करा. काही दिवसांपर्यंत नियमितपणे याचा वापर करा. सर्दी-खोकला यांपासून सुटका होण्यास मदत होईल. 

चव वाढविण्यासाठी यामध्ये तुम्ही मध एकत्र करू शकता. लक्षात ठेवा की, एका ठराविक प्रमाणात एकत्र करा. जास्त प्रमाणात मध टाकू नका. कांद्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट व्यतिरिक्त सल्फाइड, विटामिन आणि अ‍ॅन्टीव्हायरल गुणधर्म असतात. हे बंद नाक आणि सर्दी यांसारख्या समस्यांवर अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच घशातील टॉक्सिन्स दूर करण्यासाठीही मदत करतात. 

जर खोकल्यासोबत कफ झाला असेल तर काळी मिरी पावडर शुद्ध तूपासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. आल्याचे छोटे तुकडे करून घ्या आणि त्याचं मिठासोबत सेवन करा. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स