शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 12:03 IST

सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता...

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे अनेक बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. परिणामी अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या साधारण समस्या आहेत. अनेकदा या समस्या वातावरणातील बदलांमुळे होतात. हे इन्फेक्शन सामान्य असलं तरिही अनेक दिवस यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढचं नाहीतर यामुळे थकवाही जाणवतो. खरं तर पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया थैमान घालत असतात. अशातच सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता. 

आजारी पडण्याआधीच करा हा उपाय 

जास्तीत जास्त लोक आजारी पडल्यानंतरच वेगवेगळे उपाय करण्यासाठी तयार होतात. परंतु, जर तुम्ही वातावरणानुसार आधीच शरीर तयार केलं तर अनेक आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. जर तुम्ही आजारी पडण्याआधीच काही उपाय केले तर तुम्ही स्वतःला या समस्यांपासून दूर ठेवू शकता. तसेच आधीच उपाय केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून लढण्यासाठी शक्ती मिळते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय कराल? 

पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी एका अ‍ॅन्टी-वायरल डाएटची गरज असते. लसूण, कांदा, आलं, हळद यांसारखे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि मजबुत करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कांद्याचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या एका विशेष घरगुती उपायाबाबत सांगणार आहोत. 

कांदा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती 

कांदा जेवणाची चव वाढविण्यासाठी मदत करतो. परंतु, हा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या अनेक वायरल इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव करू शकता. त्यासाठी एक लहान कांदा घेऊन तो पातळ खापांमध्ये कापून घ्या. 

या खापा 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर हे मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करा. काही दिवसांपर्यंत नियमितपणे याचा वापर करा. सर्दी-खोकला यांपासून सुटका होण्यास मदत होईल. 

चव वाढविण्यासाठी यामध्ये तुम्ही मध एकत्र करू शकता. लक्षात ठेवा की, एका ठराविक प्रमाणात एकत्र करा. जास्त प्रमाणात मध टाकू नका. कांद्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट व्यतिरिक्त सल्फाइड, विटामिन आणि अ‍ॅन्टीव्हायरल गुणधर्म असतात. हे बंद नाक आणि सर्दी यांसारख्या समस्यांवर अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच घशातील टॉक्सिन्स दूर करण्यासाठीही मदत करतात. 

जर खोकल्यासोबत कफ झाला असेल तर काळी मिरी पावडर शुद्ध तूपासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. आल्याचे छोटे तुकडे करून घ्या आणि त्याचं मिठासोबत सेवन करा. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स