शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 13:12 IST

CoronaVirus News & latest Updates : या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधन सुरू आहे.

कोरोना व्हायरसनं गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. या जीवघेण्या व्हायरसशी लढण्यासाठी आतापर्यंत कोणतंही खास औषध किंवा लस लॉन्च करण्यात आलेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधन सुरू आहे. भारतातील युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी  कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्याबाबत दावा केला आहे. झाडाझुडूपांमधील केमिकल्सनं  कोरोना व्हायरसवर मात करता येऊ शकते. हे संशोधन  गुरू गोविंद युनिव्हर्सिटी(GGSIPU)  आणि  पंजाब युनिव्हर्सिटीमधील (PU)  प्राध्यापकांनी केलं आहे.

या संशोधनातून काय सिद्ध झाले

PU  सेंटर ऑफ बायोलॉजी सिस्टम्सचे प्रमुख आणि डॉक्टर अशोक कुमार तसंच GGSIPU चे डॉक्टर सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार  झाडांमध्ये ५० पायथोकेमिकल्स असतात. ज्यामुळे व्हायरसचा खात्मा करता येऊ शकतो.  पायथोकेमिकल्स झाडाचे असे तत्व आहे  जे  पानं, फळं, भाज्या, मुळं किंवा इतर भागांमध्ये असते. या तत्वांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यानंतर वापरात आणता येऊ शकतं. या संशोधनातून दिसून आले  की पायथोकेमिकल्स माणसांना व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.  

वन्य जीवांवर परिक्षण केलं जाईल

डॉक्टर सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार या संशोधनातून दिसून आलं की, रासायनिक तत्व कोरोना प्रोटीन्सवर आक्रमण करून त्यांना वाढण्यापासून रोखतात. कोरोना प्रोटिन्स इतर प्रोटिन्सच्या संपर्कात आल्यास निष्क्रिय झाल्याने संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो. हे परिक्षण कंम्प्यूटर मॉडेलवर करण्यात आलं होतं. यापुढील परिक्षण वन्यजीवांवर आणि माणसांवरही केलं जाणार आहे. त्यानंतर ही झाडांमधील  रासायनिक तत्व कोरोनाचा सामना करण्यासाठी किती प्रभावी ठरतात हे पाहिलं जाईल. हे संशोधन ३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय नियतकालिक फायटोमेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. 

कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात  लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराच्या परवानग्या देत असल्याचं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला होता.

परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल पूर्ण खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं होतं. अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा शेवट होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर होईल. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,' असं स्वामीनाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

हे पण वाचा-

CoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार? समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'

घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधन