शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

नुसतं खाण्यानं नाही तर पदार्थाच्या वासानंही वाढतं वजन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:37 IST

खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अमेरिकेतल्या बर्कलेमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया’ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला.

ठळक मुद्दे* वैद्यक शास्त्रातला नवा अभ्यास वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगतो.* पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो असं या संशोधकांचं म्हणणं आहे.* संशोधकांच्या मते संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध फक्त न फक्त कॅलरींशी लावणं चुकीचं आहे.

- माधुरी पेठकरखाण्याच्या आधी केवळ पदार्थाच्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं. खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो.समजा खाण्याच्या पदार्थांना वासच आला नसता तर आपण खाणं एन्जॉयच करू शकलो नसतो. पण आता वैद्यक शास्त्रातला नवा अभ्यास वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगतो.अमेरिकेतल्या बर्कलेमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया’ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला. वजन वाढवण्यात फक्त पदार्थांमधील कॅलरीजचाच हात नसतो तर पदार्थांचा वासही कारणीभूत ठरतो. हा पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो असं या संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी उंदरांचा उपयोग केला. त्यांनी त्यासाठी चांगली जाडजूड उंदरं निवडली. त्यांना असं आढळलं की ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत नाही त्यांचं वजन वास घेवू शकणार्या  उंदरांच्या तुलनेत झपाट्यानं कमी झालं. ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत होता त्यांचं वजन संशोधकांना वास न घेवू शकणार्या  उंदरांच्या तुलनेत वाढलेलंही आढळलं.

 

 

या संशोधनातून संशोधकांना एका गोष्टीवर विश्वास बसला की वास येण्याच्या प्रक्रियेमुळे कॅलरीज शरीरात साठून राहतात त्या जळत नाहीत आणि तेच कारण आहे ज्यामुळे वजन वाढतं.या संदर्भातलं हे पहिलं संशोधन आहे. हा अभ्यास करताना संशोधकांन एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की जर घाणेंद्रियांवर आणखी खोल काम केलं तर मेंदू ऊर्जा कशी साठवतो, कशी वापरतो आणि तो शरीरात ऊर्जेचं संतुलन कसं राखतो याचं नीट आकलन होवू शकेल.संशोधकांच्या या अभ्यासाचा उपयोग वयोमानानुसार भूक मंदावण्याच्या समस्येत, किंवा अपघात किंवा पार्किन्सन सारख्या आजरात निर्माण होणार्या खाण्याच्या समस्येत उपाय शोधण्यासाठी होवू शकतो. तसेच वजन कमी करणार्यानाही पुढे जावून या संशोधनाचा उपयोग होवू शकतो.संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध फक्त न फक्त कॅलरींशी लावणं चुकीचं आहे. या कॅलरीज शरीरात साठून राहण्याची वास येण्यासारखी कारणंही आहेत त्यांचाही विचार या प्रकारच्या समस्येत करणं गरजेचं आहे.या संशोधकांच्या मते या संशोधनाचा आधार घेत असं एखादं औषध शोधून काढायला हवं जे औषध वास घेण्याच्या क्रियेत ढवळाढवळ न करता वासाचा चयापचय क्रियेशी असलेला संबंध तोडेल. असं झालं तर ती नक्कीच आश्चर्याची गोष्ट असेल.या अभ्यासाचा आधार घेत संशोधक पुढे जावून असं औषध तयार करतीलही कदाचित. पण तोपर्यंत वजन वाढण्याच्या अनेक कारणांमध्ये पदार्थांचा वास हे हे ही एक कारण असतं हे तर समजलं.