शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

नुसतं खाण्यानं नाही तर पदार्थाच्या वासानंही वाढतं वजन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:37 IST

खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अमेरिकेतल्या बर्कलेमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया’ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला.

ठळक मुद्दे* वैद्यक शास्त्रातला नवा अभ्यास वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगतो.* पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो असं या संशोधकांचं म्हणणं आहे.* संशोधकांच्या मते संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध फक्त न फक्त कॅलरींशी लावणं चुकीचं आहे.

- माधुरी पेठकरखाण्याच्या आधी केवळ पदार्थाच्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं. खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो.समजा खाण्याच्या पदार्थांना वासच आला नसता तर आपण खाणं एन्जॉयच करू शकलो नसतो. पण आता वैद्यक शास्त्रातला नवा अभ्यास वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगतो.अमेरिकेतल्या बर्कलेमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया’ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला. वजन वाढवण्यात फक्त पदार्थांमधील कॅलरीजचाच हात नसतो तर पदार्थांचा वासही कारणीभूत ठरतो. हा पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो असं या संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी उंदरांचा उपयोग केला. त्यांनी त्यासाठी चांगली जाडजूड उंदरं निवडली. त्यांना असं आढळलं की ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत नाही त्यांचं वजन वास घेवू शकणार्या  उंदरांच्या तुलनेत झपाट्यानं कमी झालं. ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत होता त्यांचं वजन संशोधकांना वास न घेवू शकणार्या  उंदरांच्या तुलनेत वाढलेलंही आढळलं.

 

 

या संशोधनातून संशोधकांना एका गोष्टीवर विश्वास बसला की वास येण्याच्या प्रक्रियेमुळे कॅलरीज शरीरात साठून राहतात त्या जळत नाहीत आणि तेच कारण आहे ज्यामुळे वजन वाढतं.या संदर्भातलं हे पहिलं संशोधन आहे. हा अभ्यास करताना संशोधकांन एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की जर घाणेंद्रियांवर आणखी खोल काम केलं तर मेंदू ऊर्जा कशी साठवतो, कशी वापरतो आणि तो शरीरात ऊर्जेचं संतुलन कसं राखतो याचं नीट आकलन होवू शकेल.संशोधकांच्या या अभ्यासाचा उपयोग वयोमानानुसार भूक मंदावण्याच्या समस्येत, किंवा अपघात किंवा पार्किन्सन सारख्या आजरात निर्माण होणार्या खाण्याच्या समस्येत उपाय शोधण्यासाठी होवू शकतो. तसेच वजन कमी करणार्यानाही पुढे जावून या संशोधनाचा उपयोग होवू शकतो.संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध फक्त न फक्त कॅलरींशी लावणं चुकीचं आहे. या कॅलरीज शरीरात साठून राहण्याची वास येण्यासारखी कारणंही आहेत त्यांचाही विचार या प्रकारच्या समस्येत करणं गरजेचं आहे.या संशोधकांच्या मते या संशोधनाचा आधार घेत असं एखादं औषध शोधून काढायला हवं जे औषध वास घेण्याच्या क्रियेत ढवळाढवळ न करता वासाचा चयापचय क्रियेशी असलेला संबंध तोडेल. असं झालं तर ती नक्कीच आश्चर्याची गोष्ट असेल.या अभ्यासाचा आधार घेत संशोधक पुढे जावून असं औषध तयार करतीलही कदाचित. पण तोपर्यंत वजन वाढण्याच्या अनेक कारणांमध्ये पदार्थांचा वास हे हे ही एक कारण असतं हे तर समजलं.