शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मल्टी टास्किंग काळाची गरज; पण आरोग्यासाठी धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:05 IST

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात.

(Image credit : Be Brain Fit)

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मल्टी टास्किंग तसं पाहायला गेलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. सध्या मल्टी टास्किंग स्टाफची मागणीही वाढत आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी प्रत्येक कंपनी आटापिटा करत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक लोक आपल्या लाइफमध्ये मल्टी टास्किंग होऊ लागले आहेत. परंतु या सर्व गोष्टींमुळे मल्टी टास्किंग व्यक्तींच्या आरोग्यावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. जाणून घेऊया मल्टी टास्किंग असल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत...

मेंदूवर होतो परिणाम

काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांवरून मीडिया मल्टी टास्कर्सच्या डोक्यामध्ये हळूहळू ग्रे मॅटर कमी होत जातं. त्यामुळे बौद्धिक नियंत्रण क्षमता, भावनांवरील पकड आणि इच्छा शक्ती कमजोर होऊ लागते. 

स्मरणशक्ती कमजोर होते

2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून एक गोष्ट समोर आली की, क्रॉनिक मीडिया मल्टीटास्कर्सची वर्किंग मेमरी म्हणजेच एखाद्या कामादरम्यान संबंधित माहीती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि लॉन्ग-टर्म मेमरी म्हणजेच घटना आणि माहिती बराच वेळ लक्षात ठेवण्याची क्षमता कमजोर होते. 

आभास होण्याची समस्या

एका संशोधनानुसार, संशोधकांनी सात दिवसांपर्यंत मल्टी टास्किंग करणाऱ्या काही लोकांच्या घरी राहून त्यांचं निरिक्षण केलं, त्यांना असं दिसून आलं की, एखादी व्यक्ती जितकी जास्त मल्टीटास्किंग करते तेवढीचं तिच्या मनस्थितीमध्ये फरक दिसून येतो. एका मर्यादेनंतर त्यांच्या आभासमध्ये वाढ होते आणि त्यांना आवश्यक कामांसोबतच अनावश्यक कामांमधील फरक ओळखू शकत नाहीत. याशिवाय एक काम करताना मध्येच दुसरं काम करणं, विसरणं, चुका करणं यांसारख्या चुका करू लागतात. 

मल्टी टास्किंगमुळे होऊ शकतात दुर्घटना

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मागील काही दिवसांमध्ये जेव्हा न्यूयॉर्क शहरामध्ये जवळपास 1400 पायी चालणाऱ्या लोकांचा कार अॅक्सिडंट झाल्याची कारणं तपासण्यात आली त्यामागेही मल्टीटास्किंगचीच क्रेझ असल्याचे सिद्ध झाले. त्यातून असं समजलं की, 10 टक्के व्यक्तींच्या तुलनेमध्ये 20 टक्के तरूण मुलं पायी चालत असूनही दुर्घटनेची शिकार झाली होती. कारण त्यांचं संपूर्ण लक्ष मोबाइलमध्येच होतं. त्यामुळे पडणं, फ्रॅक्चर होणं यांसारख्या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या होत्या. 

पार्टनर आणि परिवाराच्या संबंधांवर परिणाम

एका साधारण समजानुसार, स्मार्टफोनमुळे नात्यांमधील , व्यक्तींमधील अंतर फार कमी झालं आहे. परंतु यामागे लपलेलं एक सत्य या संशोधनामधून समोर आलं. ज्यामध्ये दिलेल्या आकड्यांनुसार, हे स्पष्ट झालं की, स्मार्टफोनमुळे संबंध सुधारण्याऐवजी बिघडत आहेत. संशोधनाच्या भाषेमध्ये या समस्यांना टेक्नोफ्रेंकेस असं नाव देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स