शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

मल्टी टास्किंग काळाची गरज; पण आरोग्यासाठी धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:05 IST

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात.

(Image credit : Be Brain Fit)

बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मल्टी टास्किंग तसं पाहायला गेलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. सध्या मल्टी टास्किंग स्टाफची मागणीही वाढत आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी प्रत्येक कंपनी आटापिटा करत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक लोक आपल्या लाइफमध्ये मल्टी टास्किंग होऊ लागले आहेत. परंतु या सर्व गोष्टींमुळे मल्टी टास्किंग व्यक्तींच्या आरोग्यावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. जाणून घेऊया मल्टी टास्किंग असल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत...

मेंदूवर होतो परिणाम

काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांवरून मीडिया मल्टी टास्कर्सच्या डोक्यामध्ये हळूहळू ग्रे मॅटर कमी होत जातं. त्यामुळे बौद्धिक नियंत्रण क्षमता, भावनांवरील पकड आणि इच्छा शक्ती कमजोर होऊ लागते. 

स्मरणशक्ती कमजोर होते

2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून एक गोष्ट समोर आली की, क्रॉनिक मीडिया मल्टीटास्कर्सची वर्किंग मेमरी म्हणजेच एखाद्या कामादरम्यान संबंधित माहीती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि लॉन्ग-टर्म मेमरी म्हणजेच घटना आणि माहिती बराच वेळ लक्षात ठेवण्याची क्षमता कमजोर होते. 

आभास होण्याची समस्या

एका संशोधनानुसार, संशोधकांनी सात दिवसांपर्यंत मल्टी टास्किंग करणाऱ्या काही लोकांच्या घरी राहून त्यांचं निरिक्षण केलं, त्यांना असं दिसून आलं की, एखादी व्यक्ती जितकी जास्त मल्टीटास्किंग करते तेवढीचं तिच्या मनस्थितीमध्ये फरक दिसून येतो. एका मर्यादेनंतर त्यांच्या आभासमध्ये वाढ होते आणि त्यांना आवश्यक कामांसोबतच अनावश्यक कामांमधील फरक ओळखू शकत नाहीत. याशिवाय एक काम करताना मध्येच दुसरं काम करणं, विसरणं, चुका करणं यांसारख्या चुका करू लागतात. 

मल्टी टास्किंगमुळे होऊ शकतात दुर्घटना

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मागील काही दिवसांमध्ये जेव्हा न्यूयॉर्क शहरामध्ये जवळपास 1400 पायी चालणाऱ्या लोकांचा कार अॅक्सिडंट झाल्याची कारणं तपासण्यात आली त्यामागेही मल्टीटास्किंगचीच क्रेझ असल्याचे सिद्ध झाले. त्यातून असं समजलं की, 10 टक्के व्यक्तींच्या तुलनेमध्ये 20 टक्के तरूण मुलं पायी चालत असूनही दुर्घटनेची शिकार झाली होती. कारण त्यांचं संपूर्ण लक्ष मोबाइलमध्येच होतं. त्यामुळे पडणं, फ्रॅक्चर होणं यांसारख्या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या होत्या. 

पार्टनर आणि परिवाराच्या संबंधांवर परिणाम

एका साधारण समजानुसार, स्मार्टफोनमुळे नात्यांमधील , व्यक्तींमधील अंतर फार कमी झालं आहे. परंतु यामागे लपलेलं एक सत्य या संशोधनामधून समोर आलं. ज्यामध्ये दिलेल्या आकड्यांनुसार, हे स्पष्ट झालं की, स्मार्टफोनमुळे संबंध सुधारण्याऐवजी बिघडत आहेत. संशोधनाच्या भाषेमध्ये या समस्यांना टेक्नोफ्रेंकेस असं नाव देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स