शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

मृणाल म्हणतेय.... मराठी सिनेमाने ग्लोबल व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 00:03 IST

   सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मलांची सुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृ

      सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मलांची सुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणालने हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे करुन तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला. अवंतिका या मालिकेतून घराघरात पोहचलेली मृणाल सर्वांचीच लाडकी बनली अन पाहता पहाता छोटा पडदा देखील तिने काबीज केला. अभिनया नंतर मृणाल थेट वळली ते दिग्दर्शनाकडे, २०१४ साली प्रदर्शित झालेल्या रमा-माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले होते. मृणालचा हा अभिनेत्री ते दिग्दर्शक असा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास कौतुकास्पदच आहे. म्हणुनच लोकमत सीएनएक्सने मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत सेलिब्रिटी रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत         मराठी चित्रपट ग्लोबल झाले पाहीजेत. आपले चित्रपट जर जगभरातील प्रेक्षकांनी पहावे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला जागतिक रुप येणे महत्वाचे आहे. आपण सिनेमांचे मार्केर्टिंग जागतिक पातळीपर्यंत करणे आवश्यक आहे. आज युट्युब, इंटरनेटच्या माध्यामातून सिनेमा ग्लोबल होतोय, आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतोय. परंतू सिनेमा जगभरात पोहचण्यासाठी आपण नक्कीच अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.          मराठी चित्रपटांमधील विषय हे नक्कीच वेगळे असतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग देखील विखुरला गेला एहे. परंतू आपला मराठी रसिक हे क्लास आणि मास मध्ये नाही अडकले. आपल्या मराठी नाटक आणि सिनेमांना वेगळी परंपरा आहे. नाटक अन सिनेमांचे विषय हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांना काय आवडतेय तेच पाहतात. मराठी आॅडियन्स हा नक्कीच क्लास आणि मास मध्ये त्याकरीताच अडकलेला नाही.           ग्रामीण भागात एकतर थिएटर्सची उपलब्धता कमी आहे. त्या समस्येवर आपण विचार करायला पाहिजे. खेड्या-पाड्यात ग्रामीण भागात सिनेमा पोहचवायचा तर तो दाखविणार कु ठे हा प्रश्न आहेच. शिवाय ग्रामीण भागातील प्रेक्षकांची टेस्ट बदलणे गरजेचे आहे. त्यांना वेगळ््या विषयांवरील चित्रपट अपेक्षित असतात. परंतू आता बदलत्या काळानूसार मराठी सिनेमा बदलतोय अन वेगळे विषय आपल्याक डे येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण प्रेक्षकही चेंज होताना दिसतात. त्यामुळे आता सिनेमा ग्रामीण भागातही लवकरच पोहचेल यात शंका नाही.            एकाच वेळी मराठी इंडस्ट्रीमध्ये चार ते पाच सिनेम रिलिज होतात हे खरे आहे. परंतू या गोष्टीला आपण काहीच करु शकत नाही. प्रत्येकालाच असे वाटते की आपण सिनेमा करावा. मग ज्यावेळी रिलिजिंग ची डेट येते त्यावेळी कोणीच मागे हटत नाही. प्रेक्षकांना स्वत:ची चॉईस असते त्यातला कोणता सिनेमा पहायचा. आज आपल्याकडे एवढे न्युजपेपर आहेत कि त्यातले मला जे वाचण्यास योग्य वाटतात तेच चार पेपर मी वाचते. तसेच सिनेमांचे देखील आहे. परंतू चित्रपट रिलिझिंगचा हा प्रश्न कुठेतरी कंट्रोल झाला पाहीजे.               चित्रपटसृष्टी हिंदी असो किंवा मराठी त्यातील प्रत्येकानेच एकमेकांकडुन काहीतरी शिकायला पाहिजे. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काय चालु आहे यासाठी आपले कान, डोळे उघडे असले पाहीजेत. मला असे वाटते सगळ््यांनीच सगळ््यांकडुन सारे काही शिकावे. आज आपली मराठी चित्रपटसृष्टी बदलत आहे. ग्लोबल होत आहे. त्यामुळे मी अस म्हणीन कि बॉलीवुडने देखील मराठी चित्रपटसृष्टीकडुन नक्कीच काहीतरी शिकावे.