शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मिलो-जुलो! त्यानं तुमचा मेंदू तल्लख होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 08:18 IST

मूळ आपल्या मेंदूत आहे. आपले वंशज जसे कळपात राहणारे होते, तसेच आपणही आहोत.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com

माणूस हा खरोखर कळपात राहणारा प्राणी आहे. माणूस अनेकदा एकांतात काम करतो; पण जेव्हा त्या कामातून बाहेर येतो तेव्हा त्याला इतरांशी आसुसून गप्पा मारायच्या असतात. आपण काय केलं ते सांगायचं असतं. दुसऱ्यांनी काय केलं, तिसऱ्याचं काय चालू आहे हे ऐकायचं असतं, याचा अर्थ काम करताना एकांत हवा असतो आणि या एकांतात काय काय हुकलं, काय करता आलं नाही, ते सर्व भरूनही काढायचं असतं.

याचं मूळ आपल्या मेंदूत आहे. आपले वंशज जसे कळपात राहणारे होते, तसेच आपणही आहोत. इतरांशी गप्पा मारून, वेगवेगळ्या विषयांवर बोलून, सैरसपाटा करून आल्यावर, इतर कोणाकोणाचा विचार केल्यावर, इतर कोणाकोणाला आठवल्यावर, गाणी गुणगुणल्यावर, नवा-जुना सिनेमा, नाटक पाहिल्यावर, पुस्तकं वाचल्यावर, आवडलेल्या पुस्तकावर इतरांशी चर्चा केल्यावर, अशा अनेकानेक गोष्टी केल्यावर मेंदूत आनंदी रसायनं निर्माण होतात. ही रसायनं मेंदूत हालचाल निर्माण करतात. न्यूरॉन्सच्या नव्या जुळण्या तयार होतात. पूर्वी तयार झालेल्या जुळण्या अधिक ताकदवान होतात.

आता असंही होईल की कोणाला चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, समविचारी गट नसतील आणि त्यांना भेटून त्रासच जास्त होत असेल, तर काय करायचं, असा प्रश्नही निर्माण होत असेल. एकंदरीत अनेक वेळच्या अनुभवांनंतर कोणाला भेटून त्रास होत असेल तर कशाला, कोणाला भेटायला जायचं? त्यापेक्षा आपलं आपण बरं... कोणाला भेटायची गरज नाही, असं वाटू शकतं.

एकांत हाही खूप छान गोष्टी शिकवणारा असतो. स्वत:शी संवाद साधण्यासाठी या वेळेचा नक्कीच उपयोग होतो. मात्र, इतरांना भेटून, अनेकांच्यात मिसळून न्यूरॉन्समध्ये जे बदल होतात, ते सर्वांसाठीच लाभदायक असतात. अशात जर काही मतभेद झाले, वाद झाले तर त्यातूनही शिकण्यासारखं असतंच. अगदी टोकाला गेलं तरी या माणसाशी पुन: वाद घालायचे नाहीत, ही महत्त्वपूर्ण शिकवण तरी मिळतेच.

एकमेकांशी भेटलं की त्या प्रसंगाच्या आठवणी तयार होतात. त्या चांगल्या असोत किंवा वाईट, न्यूरॉन्सला काम मिळणं हे मेंदूतल्या आठवणींच्या भल्याचं असतं!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य