शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Mango Benefits : आंबे खाण्यापूर्वी पाण्यात बुडवून ठेवणं आवश्यक आहे का? ही आहे खाण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 20:33 IST

अनेकवेळा मनात प्रश्न येतो की लोकं खाण्यापूर्वी आंबे पाण्यात का बुडवून ठेवतात? ही केवळ आपली आवड आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे?

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. उन्हाळ्यात आंबा खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आंबे खाण्यापूर्वी पाण्यात टाकावेत हे आपण लहानपणापासून पाहत आणि ऐकत आलो आहोत. आंबा खाण्यापूर्वी १-२ तास पाण्यात ठेवला जातो. आंबे पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातील उष्णता कमी होते असं म्हटलं जातं.

आंब्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात जीवनसत्त्वे A, C, B6, फायबर, फोलेट, कॉपर, कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स असतात. याशिवाय हे फॅट फ्री, सोडियम फ्री आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे.

आंबे पाण्यात का ठेवतात?आंबे पाण्यात भिजवण्याचा मंत्र फार जुना आहे. असं केल्यानं अतिरिक्त फायटिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत होते. हे शरीरात उष्णता निर्माण होते. टरबूज, आंबा आणि पपई ही फळे शरीरात उष्णता निर्माण करतात, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. त्याच्या अति उष्णतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे डायरिया आणि स्किन इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी फळे पाण्यात भिजवल्याने नैसर्गिक उष्णता (प्रभाव) कमी होतो. अशा परिस्थितीत त्यांचं सेवन शरीरासाठी सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात बुडवून ठेवावे. जर हे शक्य नसेल तर किमान २५-३० मिनिटं तरी आंबे पाण्यात ठेवावे असं म्हटलं जातं.

आंबा खाण्याची योग्य पद्धतआंबा खाण्याचा उत्तम उपाय म्हणजे तो कापून खाणे. पण काहींना आमरसही आवडतो. आयुर्वेदानुसार आंबा आणि अन्य फळांसह एकत्र कधीही खाऊ नयेत. आंबा, एवोकॅडो, खजूर इत्यादी गोड, पूर्ण पिकलेल्या फळांसोबतच दूध घ्यावं. जेव्हा तुम्ही पिकलेला आंबा दुधात मिसळून खाता तेव्हा ते वात आणि पित्त शांत करते. ते चवदार असण्यासोबतच पौष्टिक देखील आहे. अशा परिस्थितीत आता या कडक उन्हात मँगोशेकचा आस्वादही घेऊ शकता.

टॅग्स :MangoआंबाHealthआरोग्य