शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

शेतकऱ्यांच्या सेवेत २४ तासही कमीच

By admin | Updated: March 10, 2016 00:16 IST

राजेश खराडे , बीड दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी

राजेश खराडे , बीडदुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी यामधला दुवा म्हणून काम करताना २४ तासही कमी पडतात. फक्त झोकून देऊन काम करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.वर्षभरापूर्वी येथील तालुका कृषी कार्यालयात योजनांचा लाभ घेण्याच्या प्रस्तावापेक्षा अधिकाऱ्याबद्दलच्या तक्रारी अर्जांची संख्या अधिक होती. केवळ शेतकरीच नव्हे तर कार्यालयातील कर्मचारीही मनमानी कारभाराला वैतागले होते. आठ महिन्यांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून दिलीप जाधव कारभार पाहत आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्याला जलयुक्त अभियनांतर्गत निधी मिळालेला नाही नियमित योजनांच्या आधारेच कामे झाली आहेत. एवढेच नाही तर यंदा जलयुक्त शिवार अभियनांतर्गतच्या कामांचे निविदाप्रमाणे वाटप होणार आहे. याची सुरूवातही बीड तालुका कृषी कार्यालयातूनच झाली आहे. १०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी ६० कामांना मंजुरीही मिळाली असल्याचे जाधव म्हणाले. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियनातून ४, महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी योजनेतून ५, भरड धान्य विकास कार्यक्रमातून १ अशी ३४ बाय ३४ ची शेततळी तर मनरेगांतर्गत ५८ शेततळी उभारली आहेत. खीळ बसलेली एकात्मिक पाणलोट विकासाच्या कामांना नव्याने सुरूवात करण्यात आली आहेत. प्रशासकीय योजनांच्या कामात तत्परता आणण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक असने गरजेचे आहे. शेती व्यवसायत आधुनिक पद्धतीचा अवलंब होत आहे. आधुनिकतेबरोबर कामांमधील नियमितताही आवश्यक आहे. शेतकरी अन् कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समरस होऊन काम करताना दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. कार्यालयाचे काम संगणीकृत करण्यात आले आहे. मात्र एवढे करूनही वेळेअभावी शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसल्याची खंत आहे. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत येथील कृषी कार्यालयाची कार्यप्रणाली बदलली असून कामाची सरूवात सकाळी वाजल्यापासून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समधान होत असून हीच आमच्या कामाची पावती आहे.