शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शेतकऱ्यांच्या सेवेत २४ तासही कमीच

By admin | Updated: March 10, 2016 00:16 IST

राजेश खराडे , बीड दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी

राजेश खराडे , बीडदुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी यामधला दुवा म्हणून काम करताना २४ तासही कमी पडतात. फक्त झोकून देऊन काम करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.वर्षभरापूर्वी येथील तालुका कृषी कार्यालयात योजनांचा लाभ घेण्याच्या प्रस्तावापेक्षा अधिकाऱ्याबद्दलच्या तक्रारी अर्जांची संख्या अधिक होती. केवळ शेतकरीच नव्हे तर कार्यालयातील कर्मचारीही मनमानी कारभाराला वैतागले होते. आठ महिन्यांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून दिलीप जाधव कारभार पाहत आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्याला जलयुक्त अभियनांतर्गत निधी मिळालेला नाही नियमित योजनांच्या आधारेच कामे झाली आहेत. एवढेच नाही तर यंदा जलयुक्त शिवार अभियनांतर्गतच्या कामांचे निविदाप्रमाणे वाटप होणार आहे. याची सुरूवातही बीड तालुका कृषी कार्यालयातूनच झाली आहे. १०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी ६० कामांना मंजुरीही मिळाली असल्याचे जाधव म्हणाले. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियनातून ४, महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी योजनेतून ५, भरड धान्य विकास कार्यक्रमातून १ अशी ३४ बाय ३४ ची शेततळी तर मनरेगांतर्गत ५८ शेततळी उभारली आहेत. खीळ बसलेली एकात्मिक पाणलोट विकासाच्या कामांना नव्याने सुरूवात करण्यात आली आहेत. प्रशासकीय योजनांच्या कामात तत्परता आणण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक असने गरजेचे आहे. शेती व्यवसायत आधुनिक पद्धतीचा अवलंब होत आहे. आधुनिकतेबरोबर कामांमधील नियमितताही आवश्यक आहे. शेतकरी अन् कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समरस होऊन काम करताना दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. कार्यालयाचे काम संगणीकृत करण्यात आले आहे. मात्र एवढे करूनही वेळेअभावी शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसल्याची खंत आहे. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत येथील कृषी कार्यालयाची कार्यप्रणाली बदलली असून कामाची सरूवात सकाळी वाजल्यापासून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समधान होत असून हीच आमच्या कामाची पावती आहे.