मुंबई : आजारपणात अवाढव्य येणारा खर्च याचा कधी ना कधी फटका बसतो. यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, हा विमा काढण्याची वयोमर्यादा लक्षात घेता वयाची काही बंधने पाळल्यास तो आणखी फायद्याचा ठरू शकतो. तिशी गाठायच्या आधीच आरोग्य विमा काढल्यास नेहमी चांगले असते, कारण कोणत्याही मेडिकल इमरजन्सीला तोंड देणे सोपे जाते. बऱ्याचदा सल्लागार लोकांना कमी वयातच आरोग्य विमा काढण्यास सांगतात. ते असे का सांगतात, याची पाच कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
1) जेवढे लवकर कमी वयात तुम्ही आरोग्य विमा खरेदी कराल तेवढा त्याच्या प्रिमिअम कमी बसणार आहे. जर तुम्ही 25 व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी करत असाल तर 5 हजार रुपये वार्षिक द्यावे लागतील. तर 35 व्या वर्षी हिच रक्कम जवळपास 6 ते 8 हजाराच्या घरात जाईल.
2) आरोग्य विमा कधीही काढणे फायद्याचे असते कारण आजारपण कधी सांगून येत नाही. अचानक एखादा आजार उद्भवल्यास उपचारांसाठी लाखो रुपये लागतात. आरोग्य विमा असल्यास एवढे पैसे गोळा करण्याचा तणाव राहणार नाही.
4) बरेचजण नोकरी करत असलेली कंपनी देत असलेल्या विम्यावरच अबलंबून राहतात. मात्र, नोकरीत बदल झाल्यास हे कव्हर जाते. अशा वेळी कुटुंबात आजारपण आल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. तसेच या कंपन्या 50 हजारांपासून 5 लाखांपर्यंत विम्याचे संरक्षण देतात, जे भविष्यात कमी पडू शकते. यामुळे खासगी विमाही काढलेला फायद्याचा ठरतो.