शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 11:23 IST

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो.

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो. असे फार कमी लोकं असतात त्यांना खाण्याच्या दरम्यान कधी पाणी प्यायचं आणि कधी पाणी नाही प्यायचं हे माहीत असतं. जेवणानंतर पाण्याचे सेवन करतं असताना ते कधी करायचं हे माहित नसल्यामुळे  नकळतपणे पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घ्या पाणी अयोग्य वेळी प्यायल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात.

(image credit- mordern ghana)

आयुर्वेदानुसार आपण जे काही खात असतो ते अन्न नाभीच्या विरूद्ध बाजूला जठराग्नीमध्ये पचत असतो. तसंच हा जठर अग्नी जेवल्यानंतर एक तास सक्रीय राहत असतो. त्यामुळे  भूक लागल्यानंतर लगेच जेवल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास जठराग्नी हा शांत होत असतो. त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. म्हणून असं म्हणतात की जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नसतं. 

जेवणात समावेश असलेले व्हिटामीन्स आणि इतर पोषक तत्व शरीरात शोषून घेण्यासाठी  थोडावेळ देणं गरजेचं  असतं. तसंच जर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने  आपल्या पचनक्रीयेवर त्याचा परीणाम होत असतो. त्यामुळे काही खाल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिणं टाळायला हवं. 

न्यूट्रिशनिस्टच्यामते  जेवण केल्यानंतर ते पचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत  असतो. त्यानंतर खाल्लेलं अन्न मलाच्या स्वरूपात तयार होत असतं. या दरम्यान पाणी  जेवल्यानंतर लगेचच प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. तसंच खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे अपचन, गॅस, एसिडीटी  अशा पोटाच्या समस्या उद्भवतात. तापमान प्रभावित होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. 

(image credit-east coast daily english)

जर तुम्ही खाल्ल्यानंतर लगेचचं पाण्याचं सेवन करत असाल तर अन्न मोठ्या प्रमाणात पोटात पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण वाढून मधूमेह होण्याची शक्यता असते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. जर तुम्ही गोड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पित असाल तर ही गोष्ट शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स