शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 11:23 IST

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो.

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो. असे फार कमी लोकं असतात त्यांना खाण्याच्या दरम्यान कधी पाणी प्यायचं आणि कधी पाणी नाही प्यायचं हे माहीत असतं. जेवणानंतर पाण्याचे सेवन करतं असताना ते कधी करायचं हे माहित नसल्यामुळे  नकळतपणे पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घ्या पाणी अयोग्य वेळी प्यायल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात.

(image credit- mordern ghana)

आयुर्वेदानुसार आपण जे काही खात असतो ते अन्न नाभीच्या विरूद्ध बाजूला जठराग्नीमध्ये पचत असतो. तसंच हा जठर अग्नी जेवल्यानंतर एक तास सक्रीय राहत असतो. त्यामुळे  भूक लागल्यानंतर लगेच जेवल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास जठराग्नी हा शांत होत असतो. त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. म्हणून असं म्हणतात की जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नसतं. 

जेवणात समावेश असलेले व्हिटामीन्स आणि इतर पोषक तत्व शरीरात शोषून घेण्यासाठी  थोडावेळ देणं गरजेचं  असतं. तसंच जर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने  आपल्या पचनक्रीयेवर त्याचा परीणाम होत असतो. त्यामुळे काही खाल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिणं टाळायला हवं. 

न्यूट्रिशनिस्टच्यामते  जेवण केल्यानंतर ते पचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत  असतो. त्यानंतर खाल्लेलं अन्न मलाच्या स्वरूपात तयार होत असतं. या दरम्यान पाणी  जेवल्यानंतर लगेचच प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. तसंच खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे अपचन, गॅस, एसिडीटी  अशा पोटाच्या समस्या उद्भवतात. तापमान प्रभावित होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. 

(image credit-east coast daily english)

जर तुम्ही खाल्ल्यानंतर लगेचचं पाण्याचं सेवन करत असाल तर अन्न मोठ्या प्रमाणात पोटात पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण वाढून मधूमेह होण्याची शक्यता असते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. जर तुम्ही गोड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पित असाल तर ही गोष्ट शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स