शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:08 IST

आयुष्य आनंदानं उपभोगायचं असेल, तर ही किल्ली शोधायलाच हवी..

ठळक मुद्देमाणसांचं हसणं दिवसेंदिवस होतंय कमी कमी.ताणतणावांमुळे जगण्याचा दर्जा खालावतोय.प्रसन्न राहिलात तरच मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी

- मयूर पठाडेरोजच्या कामाच्या धबडग्यात एनर्जी आणायची तरी कुठून?.. बरं हे काही एका वेळेचं नाही, रोजचाच झगडा आहे तो.. वेळ पुरत नाही.. कामाचा रगाडा तर रोजचाच. कितीही उरकलं तरी उरकत नाही..रोजची टेन्शन्स तरी किती? त्याचा तुमच्या शरीर, मनावर परिणाम होतोच. त्याचा आता अतिरेक होत चालला आहे, असे अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यासाठी मनाला, स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय प्रत्येकानं शोधले पाहिजेत असा सल्लाही या अभ्यासकांनी दिला आहे.अलीकडच्या काळात यासंदर्भात अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यातील अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका आणि आॅस्ट्रेलियातील अभ्यास सांगतो की माणसांचं हसणं दिवसेंदिवस कमी झालं आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचं आयुष्य भलेही वाढलं असेल, पण त्याचा दर्जा मात्र सातत्यानं खालावतोच आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रसन्न राहाण्याची कला शिकून घेणं. प्रसन्नतेची ही गुरुकिल्लीच तुमचं आयुष्य सुखी, समाधानी करील. नाहीतर ताणतणावांच्या घेºयात आयुष्याचा खरा उपभोग तुम्हाला घेताच येणार नाही.त्यासाठी या अभ्यासकांनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट किंवा तुम्हाला दु:ख देणारी जरी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा, तुमच्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट अवघड आह, पण अशक्यही नाही.तुम्ही कोणत्याही इझमचे असा, कोणत्याही प्रवृत्तीचे असा, दैववादी असा किंवा नसा.. तुमच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना भले कोणतंही नाव द्या.. जे काही घडतं ते निसर्गाच्या इच्छेनं होतं म्हणा, देवाच्या इच्छेनं होतं म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेनं होतं म्हणा किंवा आपणच या साºया गोष्टींना कारणीभूत आहोत असं म्हणा.. पण चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा.. प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याचकडे आहे, ती शोधा.. त्यातूनच तुमच्या जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.. असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. त्याकडे आपणही सकारात्मकतेनं पाहायलाच हवं.