शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:08 IST

आयुष्य आनंदानं उपभोगायचं असेल, तर ही किल्ली शोधायलाच हवी..

ठळक मुद्देमाणसांचं हसणं दिवसेंदिवस होतंय कमी कमी.ताणतणावांमुळे जगण्याचा दर्जा खालावतोय.प्रसन्न राहिलात तरच मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी

- मयूर पठाडेरोजच्या कामाच्या धबडग्यात एनर्जी आणायची तरी कुठून?.. बरं हे काही एका वेळेचं नाही, रोजचाच झगडा आहे तो.. वेळ पुरत नाही.. कामाचा रगाडा तर रोजचाच. कितीही उरकलं तरी उरकत नाही..रोजची टेन्शन्स तरी किती? त्याचा तुमच्या शरीर, मनावर परिणाम होतोच. त्याचा आता अतिरेक होत चालला आहे, असे अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यासाठी मनाला, स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय प्रत्येकानं शोधले पाहिजेत असा सल्लाही या अभ्यासकांनी दिला आहे.अलीकडच्या काळात यासंदर्भात अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यातील अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका आणि आॅस्ट्रेलियातील अभ्यास सांगतो की माणसांचं हसणं दिवसेंदिवस कमी झालं आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचं आयुष्य भलेही वाढलं असेल, पण त्याचा दर्जा मात्र सातत्यानं खालावतोच आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रसन्न राहाण्याची कला शिकून घेणं. प्रसन्नतेची ही गुरुकिल्लीच तुमचं आयुष्य सुखी, समाधानी करील. नाहीतर ताणतणावांच्या घेºयात आयुष्याचा खरा उपभोग तुम्हाला घेताच येणार नाही.त्यासाठी या अभ्यासकांनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट किंवा तुम्हाला दु:ख देणारी जरी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा, तुमच्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट अवघड आह, पण अशक्यही नाही.तुम्ही कोणत्याही इझमचे असा, कोणत्याही प्रवृत्तीचे असा, दैववादी असा किंवा नसा.. तुमच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना भले कोणतंही नाव द्या.. जे काही घडतं ते निसर्गाच्या इच्छेनं होतं म्हणा, देवाच्या इच्छेनं होतं म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेनं होतं म्हणा किंवा आपणच या साºया गोष्टींना कारणीभूत आहोत असं म्हणा.. पण चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा.. प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याचकडे आहे, ती शोधा.. त्यातूनच तुमच्या जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.. असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. त्याकडे आपणही सकारात्मकतेनं पाहायलाच हवं.