शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:08 IST

आयुष्य आनंदानं उपभोगायचं असेल, तर ही किल्ली शोधायलाच हवी..

ठळक मुद्देमाणसांचं हसणं दिवसेंदिवस होतंय कमी कमी.ताणतणावांमुळे जगण्याचा दर्जा खालावतोय.प्रसन्न राहिलात तरच मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी

- मयूर पठाडेरोजच्या कामाच्या धबडग्यात एनर्जी आणायची तरी कुठून?.. बरं हे काही एका वेळेचं नाही, रोजचाच झगडा आहे तो.. वेळ पुरत नाही.. कामाचा रगाडा तर रोजचाच. कितीही उरकलं तरी उरकत नाही..रोजची टेन्शन्स तरी किती? त्याचा तुमच्या शरीर, मनावर परिणाम होतोच. त्याचा आता अतिरेक होत चालला आहे, असे अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यासाठी मनाला, स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय प्रत्येकानं शोधले पाहिजेत असा सल्लाही या अभ्यासकांनी दिला आहे.अलीकडच्या काळात यासंदर्भात अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यातील अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका आणि आॅस्ट्रेलियातील अभ्यास सांगतो की माणसांचं हसणं दिवसेंदिवस कमी झालं आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचं आयुष्य भलेही वाढलं असेल, पण त्याचा दर्जा मात्र सातत्यानं खालावतोच आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रसन्न राहाण्याची कला शिकून घेणं. प्रसन्नतेची ही गुरुकिल्लीच तुमचं आयुष्य सुखी, समाधानी करील. नाहीतर ताणतणावांच्या घेºयात आयुष्याचा खरा उपभोग तुम्हाला घेताच येणार नाही.त्यासाठी या अभ्यासकांनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट किंवा तुम्हाला दु:ख देणारी जरी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा, तुमच्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट अवघड आह, पण अशक्यही नाही.तुम्ही कोणत्याही इझमचे असा, कोणत्याही प्रवृत्तीचे असा, दैववादी असा किंवा नसा.. तुमच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना भले कोणतंही नाव द्या.. जे काही घडतं ते निसर्गाच्या इच्छेनं होतं म्हणा, देवाच्या इच्छेनं होतं म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेनं होतं म्हणा किंवा आपणच या साºया गोष्टींना कारणीभूत आहोत असं म्हणा.. पण चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा.. प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याचकडे आहे, ती शोधा.. त्यातूनच तुमच्या जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.. असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. त्याकडे आपणही सकारात्मकतेनं पाहायलाच हवं.