शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत कडक गरम पाण्याने अंघोळ करणे पडेल महागात, वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:49 IST

थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते.

राज्यातील अनेक भागात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. ऋतुमानाप्रमाणे शरीरातही बदल व्हायला लागतात. त्वचा कोरडी पडते. थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते. त्वचा लाल होते, हातावर पुरळ येतात. या समस्या येऊ नयेत म्हणून अंघोळीच्या सवयी बदलण्याची गरज आहे. कमी तापमान असले की त्वचेवर लगेच परिणाम दिसतात त्यामुळे अंघोळ करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबतच्या सुचना त्वचेचे डॉक्टरही देतात. 

एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, थंडीत कोमट पाण्यानेच अंघोळ करावी. खूप गरम पाणी शरीराला सहन होत नाही. थंडीत गरम पाणी कितीही बरे वाटत असले तरी ते त्वचेला हानिकारक आहे. कोमट पाणीच त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुरळित होते. कोमट पाण्याने शरीराचा स्वच्छता ही चांगली होते आणि दिवसभर प्रसन्न वाटते. फक्त पाणी जास्त गरम नाही ना याची काळजी घ्यावी. 

थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी का ?

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे नुकसानकारक नाही असे डॉक्टर सांगतात. मात्र ज्यांना थंड पाण्याची सवय आहे त्यांनीच थंड पाण्याने अंघोळ करावी. अनेकांना थंड पाणी सहन होत नाही. श्वास घ्यायलाही त्रास होतो अशा लोकांनी चुकुनही थंड पाणी घेऊ नये. शेवटी काय तर कोणाला नेमके काय सहन होते हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून असते. 

जेवणानंतर लगेच अंघोळ करणे चुकीचे 

खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच अंघोळ करु नये. यामुळे पचनसंस्थेत अडचण येते. जर नुकतेच जेवण केले असेल तर किमान दोन तासांनी अंघोळ करावी असा सल्ला डॉक्टर देतात. नाहीतर तुम्हाला जॉइंट पेन ची समस्या सुद्धा येऊ शकते.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजी