शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

थंडीत कडक गरम पाण्याने अंघोळ करणे पडेल महागात, वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:49 IST

थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते.

राज्यातील अनेक भागात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. ऋतुमानाप्रमाणे शरीरातही बदल व्हायला लागतात. त्वचा कोरडी पडते. थंडीमुळे अंघोळीसाठी अगदी कडक गरम पाणी घेण्याची सवय अनेकांना असते. कडक गरम पाण्यामुळे शरीरावर लगेच रिअॅक्शन दिसते. त्वचा लाल होते, हातावर पुरळ येतात. या समस्या येऊ नयेत म्हणून अंघोळीच्या सवयी बदलण्याची गरज आहे. कमी तापमान असले की त्वचेवर लगेच परिणाम दिसतात त्यामुळे अंघोळ करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबतच्या सुचना त्वचेचे डॉक्टरही देतात. 

एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, थंडीत कोमट पाण्यानेच अंघोळ करावी. खूप गरम पाणी शरीराला सहन होत नाही. थंडीत गरम पाणी कितीही बरे वाटत असले तरी ते त्वचेला हानिकारक आहे. कोमट पाणीच त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुरळित होते. कोमट पाण्याने शरीराचा स्वच्छता ही चांगली होते आणि दिवसभर प्रसन्न वाटते. फक्त पाणी जास्त गरम नाही ना याची काळजी घ्यावी. 

थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी का ?

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे नुकसानकारक नाही असे डॉक्टर सांगतात. मात्र ज्यांना थंड पाण्याची सवय आहे त्यांनीच थंड पाण्याने अंघोळ करावी. अनेकांना थंड पाणी सहन होत नाही. श्वास घ्यायलाही त्रास होतो अशा लोकांनी चुकुनही थंड पाणी घेऊ नये. शेवटी काय तर कोणाला नेमके काय सहन होते हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून असते. 

जेवणानंतर लगेच अंघोळ करणे चुकीचे 

खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच अंघोळ करु नये. यामुळे पचनसंस्थेत अडचण येते. जर नुकतेच जेवण केले असेल तर किमान दोन तासांनी अंघोळ करावी असा सल्ला डॉक्टर देतात. नाहीतर तुम्हाला जॉइंट पेन ची समस्या सुद्धा येऊ शकते.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजी