शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य? पहा काय म्हणतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 20:41 IST

काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे.

पुर्वी फक्त कोरोनाच्या काळात सर्दी, ताप आणि खोकला जाण्यासाठी काढा प्यायला जायचा. पण आता इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा प्यायला जातो. सध्या प्रत्येक घरात काढा तयार होतो. मात्र, काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. काढा तयार करण्यासाठी लवंग, तुळस, दालचिनी, आले, काळी मिरी, हिंग, पुदिन्याचा पाने, सुंठ अशी बरीच मसाले वापरली जातात. यामुळे हंगामी संक्रमण आणि फ्लूशी लढायला मदत होते. याशिवाय संधिवात, डोकेदुखी, दमा, जंतुसंसर्गसारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.  न्युट्रिशनिस्ट डॉ. नेहा पठानिया यांनी याचे उत्तर दिले आहे. हेल्थशॉट्स या वेबसाईटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

कोरोना काळात काढा कसा फायदेशीर?रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा सर्वात उपयोगी आहे. काढ्यात औषधी वनस्पती आणि मसाले असतात. ज्यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. मात्र, जर काढ्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते अत्यंत हानीकारक आहे.

उन्हाळ्यात काढा पिणे योग्य की अयोग्य?उन्हाळ्यात प्रमाणातच काढा पिणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे शरीराला कोणताही अपाय होणार नाही. काढा शरीर निरोगी राहण्यासाठी उत्तम पेय आहे. त्यामुळे लक्षात घ्या, काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अ‍ॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाचे विकार उद्भवतात.

काढ्याचे सेवन अशाप्रकारे करा

  • दुपारी ४-५च्या सुमारास काढा पिणे फायदेशीर आहे.
  • काढा शक्यतो रिकाम्या पोटी पिऊ नये, यामुळे पित्त होऊ शकते. तसेच जेवल्यानंतरही लगेचच काढा पिणे टाळा.
  • एका वेळी 150 मिली पेक्षा जास्त काढा पिऊ नका.
  • शक्यतो काढ्यामध्ये मध टाका. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवणार नाही.
  • काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत.
  • काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
  • लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न