शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

'घरातून मासिक पाळी व्यवस्थापन शिकविणे गरजेचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:39 IST

मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली. 

मुंबई : मुंबईतील शाळा-समुदायांमध्ये आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृतीपर उपक्रम राबवित असताना मासिक पाळीविषयी असलेली उदासीनता अधोरेखित होते. त्यामुळे मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली आहे. आजही मुंबईसारख्या मेट्रो शहरांत मासिक पाळीविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे मुली-महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांविषयी बोलले जात नाही, याची खंतही अगस्ती यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षांपासून शहर, उपनगरांतील विविध समुदाय आणि शाळांमध्ये अवनी अगस्ती फाउंडेशन २४ या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात. त्यात मासिक पाळीविषयी माहिती, त्या काळातील स्वच्छता, लैंगिक शिक्षण, रजोनिवृत्ती, सॅनिटरी पॅडचे वितरण यावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. यासाठी संस्थेचे स्वयंसेवक वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूसह विविध वस्ती-समुदायांना भेट देत, याविषयी जनजागृती करण्यात येते.या विषयांबाबत अगदी सामान्यांची मानसिकता केंद्रस्थानी ठेवून हा बदल घडविण्यावर भर देत असल्याचे अगस्ती यांनी अधोरेखित केले.

असे चालते कामव्यवस्थापन प्रशिक्षण सत्रात मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करणे, पाळीच्या दरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना हाताळणे, त्या दिवसातील स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न योग्य पद्धतीने हाताळणे, अंधश्रद्धा दूर करणे व सल्ला या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते.  प्रशिक्षणाच्या म्यान मुली-मातांना मार्गदर्शन करण्यावर भर राहतो. पण त्यासाठी सुविधा आवश्यक ठरतात. म्हणून प्रत्येक शाळा – वाडी-वस्त्यांमधील स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहे परिपूर्ण असण्यावरही कटाक्ष आहे.   

व्हॅनद्वारे करण्यात येते वैद्यकीय तपासणीशहर उपनगरातील भाभा, कूपर रुग्णालयांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने संस्थेद्वारे मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून विविध परिसरांत वैद्यकीय तपासण्या - शिबिरे घेण्यात येतात. यावेळी मुली-महिलांच्या प्राथमिक आरोग्य तपासण्या, त्याचप्रमाणे कर्करोग, मौखिक आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात. 

या तपासण्यांदरम्यानही अनेकदा मुले-मुली, महिला पुढाकार घेताना कचरत असल्याचे दिसून आले. मात्र, संवाद-शंकांचे निरसन केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद समाधान देणारा असतो, अशी भावना अगस्ती यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Healthआरोग्य