शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

खरंच... नारळ पाणी प्यायल्याने कर्करोग बरा होतो ?, टाटा रुग्णालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 21:08 IST

सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात.

मुंबई : सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे कुठल्याही पातळीवर त्याची विश्वासार्हता तपासली जात नाही. परिणामी ‘व्हायरल’ मेसेजसचा ताप दिवसागणिक वाढतोय. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालय या ‘व्हायरल’ तापाला ब-याचदा सामोरे जाते. मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया नारळ पाणी उकळून प्यायल्यास कुठल्याही प्रकारचा कर्करोग बरा होत असल्याचा टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे मेसेज व्हायरल होत आहे. हा संदेश चुकीचा असल्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रकाद्वारे टाटा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.याविषयी, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पत्रकात म्हटले आहे की, टाटा कर्करोग वा माझ्या नावे सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेश साफ चुकीचा व खोटा आहे. नारळ पाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्यूमरचा समूळ नाश होत असल्याचे म्हटले आहे, मात्र हा दावा साफ चुकीचा आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे संशोधन झाले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या संदेश वा पोस्टची विश्वासार्हता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये वा अथवा फॉरवर्ड करू नये.यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या नावे अशा अनेक व्हायरल पोस्ट्समुळे कर्करोगाविषयी चुकीचे समज पसरत असल्याचे उघड झाले आहे. टाटा रुग्णालयाचे डॉ. मकरंद देशपांडे यांच्या नावेही असा चुकीचा संदेश व्हायरल झाला होता, मात्र या नावाचे कुणीही डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न नसून ती माहिती चुकीची असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला होता.