शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

खरंच... नारळ पाणी प्यायल्याने कर्करोग बरा होतो ?, टाटा रुग्णालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 21:08 IST

सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात.

मुंबई : सोशल मीडियामुळे ब-याचदा महत्त्वाच्या विषयांची गांभीर्यता न पडताळत ते फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे कुठल्याही पातळीवर त्याची विश्वासार्हता तपासली जात नाही. परिणामी ‘व्हायरल’ मेसेजसचा ताप दिवसागणिक वाढतोय. परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालय या ‘व्हायरल’ तापाला ब-याचदा सामोरे जाते. मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया नारळ पाणी उकळून प्यायल्यास कुठल्याही प्रकारचा कर्करोग बरा होत असल्याचा टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे मेसेज व्हायरल होत आहे. हा संदेश चुकीचा असल्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रकाद्वारे टाटा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.याविषयी, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पत्रकात म्हटले आहे की, टाटा कर्करोग वा माझ्या नावे सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेश साफ चुकीचा व खोटा आहे. नारळ पाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्यूमरचा समूळ नाश होत असल्याचे म्हटले आहे, मात्र हा दावा साफ चुकीचा आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे संशोधन झाले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या संदेश वा पोस्टची विश्वासार्हता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये वा अथवा फॉरवर्ड करू नये.यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या नावे अशा अनेक व्हायरल पोस्ट्समुळे कर्करोगाविषयी चुकीचे समज पसरत असल्याचे उघड झाले आहे. टाटा रुग्णालयाचे डॉ. मकरंद देशपांडे यांच्या नावेही असा चुकीचा संदेश व्हायरल झाला होता, मात्र या नावाचे कुणीही डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न नसून ती माहिती चुकीची असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला होता.