शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

​कॉफी पिण्याची सतत सवय असल्यास सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 12:23 IST

अनेकांना दिवसातून पाच-सहा कप ​कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीच्या अतिसेवनाने शरीरावर नक्कीच परिणाम होतो.

सकाळी उठल्या उठल्या कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांना फ्रेशच वाटत नाही. कॉफी प्यायल्यानंतर शरीराला मिळणारा तजेला काही वेगळाच असतो. ऑफिसमध्ये असताना देखील आरामात चार-पाच कप कॉफीचे प्यायले जातात. तुम्हाला थकवा आला असेल किंवा काम करताना झोप येत असेल तर त्यावर कॉफी हा रामबाण उपाय मानला जातो. पण कॉफीचे सतत सेवन करणे हे शरीरासाठी घातक असते. अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये कलाकार सतत कॉफीचे घोट घेत असताना आपल्याला दिसतात. तसेच आपले आवडते कलाकार कॉफीची जाहिरात करतात. त्यामुळे काही जण आपला आवडता कलाकार ज्या ब्रँडची जाहिरात करतो. त्या ब्रँडची कॉफी पितात. काही जण तर कॉफी पिणे हे स्टेटस सिम्बॉल मानतात. सध्या सगळीकडे कॉफी शॉपचे पेव फुटले आहे. कॉफी शॉपमध्ये कितीही तास बसून मजा-मस्ती करता येते. त्यामुळे तरुण तर या कॉफी शॉपला पहिली पसंती देतात. तसेच चित्रपटांमध्ये कॉफी डेटवर जोडपी जाताना दिसतात. त्यामुळे या कॉफी डेटचे फॅड देखील चांगलेच वाढले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, कॉफीचे अतिसेवन केल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉफी मध्ये कॅफिन असते. कॅफिनचे अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असते. अनेक वेळा रात्री अभ्यास करायचा असल्यास अथवा काम करायचे असल्यास कॉफीचे सेवन केले जाते. याचे कारण म्हणजे कॉफी हे निद्रानाश करते. त्यामुळे ज्यांना झोप कमी येत असेल त्यांनी तर कॉफीचे सेवन कधीच करू नये.  कॉफी जास्त वेळा प्यायली तर तुम्हाला प्रचंड अॅसिडीटी देखील होते. तसेच कॉफीमुळे अनेकवेळा तुम्हाला भूक देखील लागत नाही. कॉफीचे अनेक दुष्परिणान असल्याने या सगळ्या कारणांमुळे कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.  कॉफी शरीरास अपायकारक आहे म्हणून ती पिऊच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण अनेकांना दिवसातून सहा-सात कप कॉफी पिण्याची सवय असते. त्यांनी ती सवय बदलण्याची गरज आहे. दिवसातून एखाद कप कॉफी प्यायली तर काहीही फरक पडत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती गोष्ट शरीराला त्रासच देते ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.