शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:08 IST

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो.

(Image Credit : www.apollopharmacy.in)

अनेकांना सतत गाणी गुणगुणत राहण्याची सवय असते किंवा असे म्हणुया की, आवड असते. ही आवड असणाऱ्यांना त्यांच्या सवयीने चांगलं वाटतं. सतत त्यांचा मूड चांगला राहतो, त्यांना आनंद मिळतो. पण याचे केवळ इतकेच फायदे नाहीत. गाणी गुणगुणत राहणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो. स्वीडनमध्ये ८०० महिलांवर हा रिसर्च करण्यात आला. या महिलांचं वय सरासरी ४७ वर्षे इतकं होतं. 

न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, मानसिक प्रक्रियांमध्ये वाचणे, गाणी गुणगुणत राहणे, वाद्य वाजवणे, सामूहिक गायन करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाणे यांचा समावेश होतो. 

स्वीडनच्या गोदनबर्ग विश्वविद्यालयातील जेन्ना नजर म्हणाल्या की, 'मध्यम वयातील प्रक्रियांमुळे वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली राहणे आणि ओळख पटवण्याची क्षमता सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावला जातो. हे फारच आश्चर्यकारक आहे. कारण हे लोक फार सहजपणे आणि फार जास्त पैसे खर्च न करता या गोष्टींचा जीवनात समावेश करू शकतात. 

स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय

वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरतात याचे खुलासे झाले आहेत. अनेकदा पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्याने आणि  वाढत्या वयामुळेही आपली स्मरणशक्ती कमी होते. अशात कमकुवत झालेली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खालील उपाय करता येतील...

फळ-भाज्यांचे सेवन

फळं आणि हिरव्या भाज्यांमध्ये असणारे अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स मेंदूच्या रक्त नलिका आणखी मजबूत आणि लवचिक करतात. तसेच फळ-भाज्यांच्या सेवनामुळे डोक्याला फॉलिक अ‍ॅंसिड आणि व्हिटॅमिन मिळतात. जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गरजेचे आहेत. यासोबतच वांगी खाण्याचाही मोठा फायदा होऊ शकतो. 

रोज प्राणायाम करा

ध्यान, प्राणायाम आणि व्यायामाने तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन, रक्त आणि पोषक तत्व मिळतात. या सगळ्या गोष्टींमुळे स्मरणशक्ती वाढते.

पुरेशी झोप घ्या

जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. झोपेमुळे आपण आपल्या डोक्यातील अनेक गोष्टींना आठवू शकतो. चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती कायम ठेवण्याच्या क्षमतेची वाढ होते.

बदाम आणि अक्रोड

स्मरणशक्ती वाढण्यासाठी बदाम खाणं फार उपयोगी मानलं जातं. बदाममधील पोषक तत्व जसेकी प्रोटीन, मॅगनीज, कॉपर आणि रायबोफ्लाविन अल्झायमर हे अनेक रोगांना दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रोज रात्री 5 बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स