शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तरुणांच्या समस्यांवरील होमिओपॅथी उपचार पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 18:05 IST

सध्याच्या धावपळीच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

-Ravindra More 
सध्याच्या धावपळीच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही शारीरिक त्रास जाणवल्यास लागलीच डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब करुन औषधोपचार केल्याने आपल्याला बरेही वाटते. या वेगवेगळ्या उपचार पद्धतीत होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आजच्या सदरात आपण होमिओपॅथी आणि तरुणाईच्या समस्या याबाबत जाणून घेऊया...
ज्यावेळी सोरा, सिफीलीस व सायकोसिस या तीन मायझम्स (त्रिदोष) च्या संतुलनात बिघाड होतो, त्यावेळी सम: समं शमयंती या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षण स्वरुप सारखे होमिओपॅथीक औषध दिले जाते व औषधाने या तिन्ही मायझममध्ये समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समूळ नष्ट होतो.  
होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णाच्या मनावर कोण-कोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण त्या घटनेचा कसा विचार करतो यासारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात.   
होमिओपॅथी ही खूप लवकर, कमी वेळेते रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबून आहे. जसे थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालवता येतो. 
परंतू गंभीर आजार जीर्ण झाल्यावर आजाराची गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास ती गुंता सोडवण्यास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अ‍ॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रकिया न करता बरे केले जातात व आजार परत उद्भवू नये यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते.  
या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास फार सोपे असून चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. या आधुनिक  होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार झाल्याने रुग्णांचा कल या उपचार पद्धतीकडे वाढला आहे. त्यामुळे आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसारख्या आजारांवर होमिओपॅथी प्रभावशाली ठरतेय.  
तरुणाई व होमिओपॅथी 
सध्याच्या धावपळीच्या व धकाकीच्या जीवनात पौगंडावस्थेतील चिडचिड, अभ्यासात लक्ष न लागणे, डिप्रेशन, प्रेमभंगातून निर्माण होणारे मानसिक आजार वाढत आहेत. यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धतीने मनाची लक्षणे व शारीरिक लक्षणे याची सांगड घालून आजार पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. 
बदलत्या जीवनशैलीनूसार तरुणांनी योग्य व्यायामाबरोबरच संतुलित आहार, खानपानावरदेखील विशेष लक्ष दिले पाहीजे. अन्यथा कमी वयातच लठ्ठपणा, उच्च रक्त दाब यासारखे आजार उद्भवू शकतात.  
किशोरावस्थेत शरीरातील हार्मोन्सच्या बदलावामुळे चेहºयावरील मुरुम (तारुण्यपिटीका) येण्यास सुरूवात होते व त्यामुळे स्वत:बद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. तर  हार्मोन्सच्या बदलावामुळे मासिक चक्र नियमित न येणे व त्यामुळे येणारा शारीरिक थकवा तसेच पीसीओडी सारख्या आजारांमुळे मुलींना चेहºयावर अनावश्यक केस वाढणे व वजन वाढणे यासारख्या समस्या भेडसावू शकतात. 
अशा प्रकारच्या तरुणाईच्या व्याधींमध्ये होमिओपॅथी उपचाराने आजार कमी वेळात सोप्या पद्धतीने समुळ नष्ट होतात आणि मन व शरीर निरोगी बनते