शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 14:31 IST

Cancer Risk : रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती.

Cancer Risk : जर आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर जसजसं वय वाढत जातं तसतशा आरोग्यासंबंधी समस्याही वाढू लागतात. एका वयानंतर लाइफस्टाईलस, खाण्या-पिण्याकडे खास लक्ष द्यावं लागतं. जर असं केलं नाही तर महागातही पडू शकतं. तुम्ही जर ४० वयाचे असाल तर तुम्हीही तुमच्या खाण्याच्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. नाही तर तुमहाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. असं आम्ही म्हणत नाही तर एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॅन्सरच्या २० टक्के केसेस ४० वयाच्या पुरूष आणि महिलांमध्ये आढळतात. दिल्‍लीतील कॅन्सर मुक्‍त भारत फाउंडेशनमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे की, ४० पेक्षा कमी वयाच्या कॅन्सर रूग्णामध्ये ६० टक्के पुरूष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट आशीष गुप्‍ता यांनी सांगितलं की, यामागे खराब लाइफस्टाईल आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं अधिक सेवन हे कारण आहे.

हा रिसर्च भारतातील १३६८ कॅन्सर रूग्णांवर करण्यात आला. रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती. ब्रेस्‍ट कॅन्सरच्या केसेस १५ टक्के तर ब्लड कॅन्सरच्या केसेस ९ टक्के समोर आल्या आहेत.

काय खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे ज्यात मीठ, साखर, आर्टिफिशियल कलर, फॅट आणि प्रिजर्वेटिव्स सारखे तत्व जास्त असतात. हे पदार्थ फॅट, स्‍टार्च आणि अतिरिक्‍त साखर टाकून बनवले जातात. फ्रोजन फूड, सॉफ्ट ड्रिंक, हॉट डॉग, पॅकेज्‍ड स्‍नॅक्‍स आणि फास्‍ट फूड अल्‍ट्राप्रोसेस्‍ड फूडमध्ये येतात. द लॅंसेटच्या रिपोर्टनुसार, अल्‍ट्राप्रोसेस्‍ड फूडचं जास्त सेवन कॅन्सरचं कारण बनत आहे.

कॅन्सर कसा टाळावा

तरूणांनी हेल्दी आणि फिट असल्यावरही नियमितपणे व्यायाम करावा. अल्ट्रा प्रोसेस्‍ड फूड खाणं बंद करावं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. तसेच तंबाखू आणि मद्यसेवन शक्य तेवढं कमी करा. ३० वयाचे झाल्यावर कॅन्सरची टेस्ट करा.

वेगवेगळे एक्सपर्ट वेळोवेळी हेच सांगत असतात की, लहान मुलांनी, तरूणांनी किंवा मोठ्यांनी कुणीही फास्ट फूडसारख्या वेगवेगळ्या पदार्थांच सेवन करू नये. कारण याने वजन वाढतं आणि लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीर आपोआप वेगवेगळ्या आजारांचं घर ठरतं. हे आता लोकांनी ऐकलं पाहिजे. कारण याने जीवाला धोकाही होऊ शकतो.

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स