शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

हृदय प्रत्यारोपणाचे रुग्ण जगतायत ‘नॉर्मल’ आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 08:46 IST

जागतिक हृदय दिन : पालकांनी मानले अवयवदात्या कुटुंबाचे आभार

- संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैद्यकीय विश्वात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्यामुळे आता अवयव निकामी झालेल्या रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८ रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची (हार्ट ट्रान्स्प्लांट) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील रुग्णांवर काही वर्षांपूर्वी  हृदय प्रत्यारोपणाच्या  शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ते सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. त्यांच्या पालकांनी अवयवदात्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.    

हृदयविकारामुळे हृदय निकामी झालेल्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय असतो. याकरिता त्यांना मेंदुमृत दात्याचे हृदय मिळणे अपेक्षित असते. काही प्रमाणात मेंदुमृत अवयदानास सुरुवात झाली असली तरी हृदय निकामी झालेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे.  

राज्य अवयव आणि ऊती पेशी प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, २०२३ या वर्षात राज्यात मेंदुमृत अवयवदात्यांकडून ३३ हृदयांचे दान करण्यात आले, तसेच ३० हृदय निकामी झालेल्या रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही वेळा राज्यात हृदय उपलब्ध असते. मात्र, घेणारा रुग्ण त्यावेळी नसतो त्यावेळी ते अन्य राज्यात पाठविले जाते.

वांद्रेतील हवोवी होमजीचे आयुष्य आनंदात...  वांद्रे येथील हवोवी होमजी या मुलीला हृदयविकार होता. दहा वर्षांपूर्वी तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिचे आयुष्य सुरळीत सुरू आहे. हावोवीची आई अर्नायटी म्हणाल्या, ‘आज हावोवी चांगले आयुष्य जगत आहे. मात्र, त्याचे सर्व श्रेय ज्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली त्यांना आहे. त्यांच्यामुळे माझ्या मुलीला आज सर्वसाधारण आयुष्य जगता येत आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि नियमित उपचारांमुळे आज ती दैनंदिन कामे करत आहे.’ 

नवी मुंबईची आराध्या शिक्षणात रमलीय...नवी मुंबईतील आराध्यावर सात वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती आता शाळेत शिक्षण घेत आहे. तिचे वडील योगेश म्हणाले, ‘हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी वरदान आहे. त्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या मुलीचा दुसरा जन्म झाला आहे.  त्या कुटुंबीयांनी अवयदानाचा निर्णय त्यांच्या दुःखाच्या काळात घेतला. मी त्यांचा मनापासून आभारी आहे.’  

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण चांगले आयुष्य जगत आहेत.   सरकारी रुग्णालयांत मेंदुमृत अवयदान वाढणे गरजेचे आहे. अधिक अवयव मिळाले, तर प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना अवयव लवकर मिळू शकतील. अवयदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबांचा शासनाने सन्मान केला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे चार ते पाच रुग्णांना जीवदान मिळते.   - डॉ. के.आर. बालकृष्णन (७०० पेक्षा अधिक हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ)

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग